शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६६९० कृषीपंपांची वीज तोडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:29 IST

जिल्ह्यातील कृषीपंप धारकांसह घरगुती ग्राहकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली असून, ३० आॅक्टोबरपर्यंत ६९९० कृषीपंपांची वीजजोडणी तोडण्यात आली आहे.

जालना : जिल्ह्यातील कृषीपंप धारकांसह घरगुती ग्राहकांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली असून, ३० आॅक्टोबरपर्यंत ६९९० कृषीपंपांची वीजजोडणी तोडण्यात आली आहे. त्यांच्याकडे ४३ कोटी ६५ लाख ५७ हजार रुपयांची थकबाकी आहे. ऐन रबी हंगामात पाण्याची गरज असताना वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.उत्पन्न व खर्च यात प्रचंड तूट निर्माण झाल्याने महावितरणकडून संपूर्ण राज्यभरात थकबाकीदारांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कृषीपंपधारकांकडे जवळपास ४४ कोटी आणि घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांकडे ३४ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरूनच आदेश आल्याने जिल्ह्यात धडक कारवाई सुरू करण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता अशोक हामने यांनी सांगितले. वारंवार सूचना देऊनही याकडे करणा-यांची वीज जोडणी तोडण्यात आल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. पंधरा-पंधरा दिवसांची मुदत देऊनही ग्राहकांनी थकबाकी भरलेली नसल्याचे धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात तीन वर्षांपासून ६९९० वीजपंप ग्राहकांकडे ४३ कोटी ६५ लाख ५७ हजार रुपयांची थकबाकी आहे. पैकी ४६२ ग्राहकांनी १८ लाख ६५ हजार रुपयांची थकबाकी भरली आहे. त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तर दुसरीकडे २० हजार ८५३ घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहक असून, त्यापैकी ४४८९ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ कोटी ५३ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित १५ हजार ६८३ ग्राहकांकडे ३३ कोटी ३० लाख ३० हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यांच्यावर आगामी काळात कारवाई केली जाणार असल्याचे जालना विभागाचे अधीक्षक अभियंता अशोक हामने यांनी सांगितले.................................जालना, परतूर, जाफराबाद थकबाकीत पुढेजिल्ह्यातील जालना, परतूर आणि जाफराबाद हे तीन तालुके थकबाकीत आघाडीवर असल्याचे महावितरणची आकडेवारी सांगते. जाफराबाद तालुक्यातील ९४७ कृषीपंप धारकांकडे ८ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे. जालना तालुक्यातील १६६० ग्राहकांकडे ४ कोटी ४७ लाख, तर परतूर तालुक्यातील ११६० ग्राहकांकडे ११ कोटी ८४ लाख ७४ हजार रुपयांची थकबाकी आहे. याच्या वसुलीसाठी महावितरणने वीजतोडणीची कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.