शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

तुरीचे ६४ कोटी अडकले

By admin | Updated: June 26, 2017 00:36 IST

बीड : नाफेड आणि शासनाच्या वतीने सहा महिन्यात खरेदी केलेल्या ४ लाख ३८ हजार क्विंटल तुरीपैकी १ लाख २८ हजार ३६८ क्विंटल तुरीचे सुमारे ६४ कोटी रुपयांच्या धनादेशाची उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

अनिल भंडारी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हयात नाफेड आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागील सहा महिन्यात खरेदी केलेल्या ४ लाख ३८ हजार क्विंटल तुरीपैकी १ लाख २८ हजार ३६८ क्विंटल तुरीचे सुमारे ६४ कोटी रुपयांच्या धनादेशाची तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. तर खरेदी केलेली ४० हजार क्विंटल तूर साठविण्यासाठी औरंगाबाद, उदगीर येथील गोदामात पाठविली जात आहे. मागील वर्षी चांगल्या पावसामुळे तुरीचे बंपर पीक आले होते. खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून शासनाने प्रती क्विंटल ४ हजार ६२५ आणि बोनस ४२५ रुपये असा हमीदर जाहीर केला होता. बीड जिल्ह्यात अकरा खरेदी केंद्रांवरुन सुरुवातीला नाफेड आणि नंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने तूर खरेदी करण्यात आली. १६ डिसेंबर ते १० जूनपर्यंत ३७ हजार २४४ क्विंटल तूर खरेदी झाली. तूर खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने आणि पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने वजन मापे होण्यासाठी लागणारा विलंब तसेच टोकन घेण्यापासून तुरीचे माप होईपर्यंत शेतकऱ्यांना रात्रंदिवस स्वत: राखण करावी लागली. खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी गोदामांची कमतरता, बारदान्याचा अभाव यामुळे शासनाकडून तूर खरेदी बंद करण्याचे आदेश निघायचे, त्यामुळे संभ्रमाचे वातावरण राहिले. या सर्व बाबींमुळे तूर उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर वारंवार उमटत होता.सहा महिन्यात ३७ हजार २४४ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची रक्कम २२१ कोटी ३५ लाख ५० हजार रुपये होते. शासनाला तूर विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील उत्पादकांना एवढी रक्कम मिळणे अपेक्षित आहे. यापैकी ३ लाख ९ हजार ९५७ क्विंटल तुरीचे १५६ कोटी ५२ लाख ८७ हजार रुपयांचे धनादेश संबंधित शेतकऱ्यांना वाटप झाल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव यांनी सांगितले. दरम्यान खरेदी केलेल्या एकुण तुरीपैकी १ लाख २८ हजार ३६८ क्विंटल तुरीचे सुमारे ६४ कोटी ८२ लाख ६२ हजार रुपये शासनाकडून मिळणे बाकी आहे. १० जून रोजी तूर खरेदी बंद झाली. खरेदी केलेल्या तुरीची बीड, गेवराई, वडवणी, परळीतील वखार महामंडळाच्या गोदामात साठवणूक झाली आहे. खरेदी केलेल्या ४० हजार क्विंटल तुरीची साठवणुक कशी करायची असा स्थानिक व्यवस्थापनापुढे पेच उभा राहिला. गोदाम भरल्याने राहिलेली उर्वरित तूर साठविण्यासाठी औरंगाबाद, उदगीर येथील गोदामात पाठविली जात आहे.