शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

आठ महिन्यांत ६३० आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:49 IST

गेल्या आठ महिन्यांत एकट्या मराठवाड्यात एक नाही, दोन नाही, तब्बल ६३० शेतकºयांनी आत्महत्या करून स्वत:ला संपवून टाकले.

स. सो. खंडाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याला पडलेला शेतकरी आत्महत्यांचा विळखा कायम असून, आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नाही. उलट त्यात भरच पडत चालली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील भयाचे वातावरण निवळता निवळत नाही. त्यातच शासकीय पातळीवर आत्महत्यांची नोंद घेण्यापलीकडे दुसरा असा ठोस कार्यक्रमही दिसत नाही. गेल्या आठ महिन्यांत एकट्या मराठवाड्यात एक नाही, दोन नाही, तब्बल ६३० शेतकºयांनी आत्महत्या करून स्वत:ला संपवून टाकले. कारणे अनेक असतील; परंतु बळीराजा स्वत:ला संपवून घेतोय, हे शिवाजी महाराजांच्या महाराष्टÑाला किती शोभनीय, हा प्रश्न शिल्लकउरतोच.महसूल यंत्रणेला या आत्महत्यांच्या संदर्भात विशेष काही कार्यक्रम आहे, असे दिसत नाही. त्याच पारंपरिक पद्धतीने नोंदणी करणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, अटी व शर्तीत प्रकरण बसले तर पात्र ठरवणे या पलीकडे महसूल यंत्रणा वेगळे काही करताना दिसत नाही. यातही नकारात्मताच अधिक असल्याने जीव गमावून बसलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियांना फार काही दिलासा मिळत नाही.आत्महत्यांचे सत्र एवढे वाढले आहे की, आता शेतकºयांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय न बनता जणू विविध तर्कवितर्कांचा विषय बनू लागला आहे. त्यामुळे जबाबदार नेत्यांकडून शेतकºयांच्या आत्महत्यांबद्दल अनुद्गार ऐकावयास मिळालेले आहेत.जानेवारी २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७ या कालावधीत मराठवाड्यात सुमारे ६३० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे आठही जिल्ह्यांमध्ये या आत्महत्या झालेल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्यांचा जिल्हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यात या वर्षात आतापर्यंत १२७ शेतकºयांना आत्महत्या करावी लागली आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यात आत्महत्यांनी शंभरी गाठली आहे.उस्मानाबाद- ८६, औरंगाबाद-८४, परभणी- ८२, लातूर- ६०, जालना-५८, हिंगोली-३३ अशी आत्महत्यांची नोंदवली गेलेली आकडेवारी आहे. यापैकी आत्महत्यांची ४२५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरलेली आहेत. १०३ प्रकरणे अपात्र ठरलेली आहेत.जीव तर गेला; पण त्या शेतकºयांच्या कुटुंबाला दमडीचीही मदत मिळणार नाही, अशी ही १०३ प्रकरणे आहेत. आत्महत्या करून शेतकरी संपलेला असतो; पण त्याच्या आत्महत्येच्या चौकशी व्हायची असते. अशी १०२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.