शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

६२ हजार ग्रामस्थांनी केले श्रमदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 00:42 IST

कळंब : तालुक्यातील बारा गावात पाणी फाउंडेशन वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावाला पाणीदार करण्यासाठी हजारो हात सरसावले.

बालाजी आडसूळ। लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यातील बारा गावात पाणी फाउंडेशन वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावाला पाणीदार करण्यासाठी हजारो हात सरसावले. पवार्तील ४५ दिवसांत उपरोक्त गावांतील ६२ हजार ७५० लोकांनी श्रमदान केले. श्रमदान व यंत्रसामुग्रीद्वारे तब्बल ३ लाख ७३ हजार ३१७ घनमिटर एवढे जलसंधारणाचे काम करण्यात आले आहे.कळंब तालुका हा अनियमित पर्जन्याचा भाग. तालुक्याच्या अर्थकारणावर शेतीचा जीतका प्रभाव तीतकाच शेतीवर लहरी निसगार्चा प्रभाव आहे.यातच जलसिंचनाची कोणतीही शाश्वत साधने उपलब्ध नसल्याने या बेभरवशाच्या पावसावरच सर्वस्वी अवलंबून रहावे लागत होते. यातूनच बिघडलेल्या अर्थकारणामुळे मध्यंतरी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेला तालुका म्हणूनही कळंबकडे पाहिले जात होते. अशा कठीण स्थितीत सिंचनाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी जलसंधारणाची कामे होणे गरजेचे होते.मोठ्या प्रकल्पासाठी ‘साइट’ नसल्याने भूउपचाराची लहान-मोठी कामे करून गावचा व गावशिवारातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचा मुद्दा समोर आला. हाच धागा पकडून पाणी फाउंडेशनने ‘वॉटर कप’ पर्व दोनसाठी कळंब तालुक्याची निवड केली. यानंतर फाउंडेशनच्या वतीने याभागातील लोकजीवन, भौगोलिक स्थिती यांचा सखोल अभ्यास करून एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखला. फाउंडेशनचे विभागीय समन्वयक इरफान शेख, संतोष शिनगारे यांनी यासाठी क्षमता बांधणीचा, नेतृत्व विकासाचा व जलसाठवण तंत्राची शास्त्रोक्त ओळख करून देणारा वेगवेगळ्या टप्यावरील प्रशिक्षण कार्यक्रम तालुक्यात राबवला.यात जवळपास ७० गावातून चांगले जलदूत समोर आले. या टिमने गावा-गावात जलजागृती करून अधिकाधिक लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेतल्याने कळंब तालुक्यात जलसंधारणाच्या नव्या चळवळीने उभारी घेतल्याचे चीत्र निर्माण झाले.