शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

६२ हजार ग्रामस्थांनी केले श्रमदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 00:42 IST

कळंब : तालुक्यातील बारा गावात पाणी फाउंडेशन वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावाला पाणीदार करण्यासाठी हजारो हात सरसावले.

बालाजी आडसूळ। लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यातील बारा गावात पाणी फाउंडेशन वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावाला पाणीदार करण्यासाठी हजारो हात सरसावले. पवार्तील ४५ दिवसांत उपरोक्त गावांतील ६२ हजार ७५० लोकांनी श्रमदान केले. श्रमदान व यंत्रसामुग्रीद्वारे तब्बल ३ लाख ७३ हजार ३१७ घनमिटर एवढे जलसंधारणाचे काम करण्यात आले आहे.कळंब तालुका हा अनियमित पर्जन्याचा भाग. तालुक्याच्या अर्थकारणावर शेतीचा जीतका प्रभाव तीतकाच शेतीवर लहरी निसगार्चा प्रभाव आहे.यातच जलसिंचनाची कोणतीही शाश्वत साधने उपलब्ध नसल्याने या बेभरवशाच्या पावसावरच सर्वस्वी अवलंबून रहावे लागत होते. यातूनच बिघडलेल्या अर्थकारणामुळे मध्यंतरी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेला तालुका म्हणूनही कळंबकडे पाहिले जात होते. अशा कठीण स्थितीत सिंचनाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी जलसंधारणाची कामे होणे गरजेचे होते.मोठ्या प्रकल्पासाठी ‘साइट’ नसल्याने भूउपचाराची लहान-मोठी कामे करून गावचा व गावशिवारातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचा मुद्दा समोर आला. हाच धागा पकडून पाणी फाउंडेशनने ‘वॉटर कप’ पर्व दोनसाठी कळंब तालुक्याची निवड केली. यानंतर फाउंडेशनच्या वतीने याभागातील लोकजीवन, भौगोलिक स्थिती यांचा सखोल अभ्यास करून एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखला. फाउंडेशनचे विभागीय समन्वयक इरफान शेख, संतोष शिनगारे यांनी यासाठी क्षमता बांधणीचा, नेतृत्व विकासाचा व जलसाठवण तंत्राची शास्त्रोक्त ओळख करून देणारा वेगवेगळ्या टप्यावरील प्रशिक्षण कार्यक्रम तालुक्यात राबवला.यात जवळपास ७० गावातून चांगले जलदूत समोर आले. या टिमने गावा-गावात जलजागृती करून अधिकाधिक लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेतल्याने कळंब तालुक्यात जलसंधारणाच्या नव्या चळवळीने उभारी घेतल्याचे चीत्र निर्माण झाले.