शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

६२ हजार ग्रामस्थांनी केले श्रमदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 00:42 IST

कळंब : तालुक्यातील बारा गावात पाणी फाउंडेशन वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावाला पाणीदार करण्यासाठी हजारो हात सरसावले.

बालाजी आडसूळ। लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यातील बारा गावात पाणी फाउंडेशन वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावाला पाणीदार करण्यासाठी हजारो हात सरसावले. पवार्तील ४५ दिवसांत उपरोक्त गावांतील ६२ हजार ७५० लोकांनी श्रमदान केले. श्रमदान व यंत्रसामुग्रीद्वारे तब्बल ३ लाख ७३ हजार ३१७ घनमिटर एवढे जलसंधारणाचे काम करण्यात आले आहे.कळंब तालुका हा अनियमित पर्जन्याचा भाग. तालुक्याच्या अर्थकारणावर शेतीचा जीतका प्रभाव तीतकाच शेतीवर लहरी निसगार्चा प्रभाव आहे.यातच जलसिंचनाची कोणतीही शाश्वत साधने उपलब्ध नसल्याने या बेभरवशाच्या पावसावरच सर्वस्वी अवलंबून रहावे लागत होते. यातूनच बिघडलेल्या अर्थकारणामुळे मध्यंतरी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेला तालुका म्हणूनही कळंबकडे पाहिले जात होते. अशा कठीण स्थितीत सिंचनाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी जलसंधारणाची कामे होणे गरजेचे होते.मोठ्या प्रकल्पासाठी ‘साइट’ नसल्याने भूउपचाराची लहान-मोठी कामे करून गावचा व गावशिवारातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचा मुद्दा समोर आला. हाच धागा पकडून पाणी फाउंडेशनने ‘वॉटर कप’ पर्व दोनसाठी कळंब तालुक्याची निवड केली. यानंतर फाउंडेशनच्या वतीने याभागातील लोकजीवन, भौगोलिक स्थिती यांचा सखोल अभ्यास करून एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखला. फाउंडेशनचे विभागीय समन्वयक इरफान शेख, संतोष शिनगारे यांनी यासाठी क्षमता बांधणीचा, नेतृत्व विकासाचा व जलसाठवण तंत्राची शास्त्रोक्त ओळख करून देणारा वेगवेगळ्या टप्यावरील प्रशिक्षण कार्यक्रम तालुक्यात राबवला.यात जवळपास ७० गावातून चांगले जलदूत समोर आले. या टिमने गावा-गावात जलजागृती करून अधिकाधिक लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेतल्याने कळंब तालुक्यात जलसंधारणाच्या नव्या चळवळीने उभारी घेतल्याचे चीत्र निर्माण झाले.