शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निवीर भरतीसाठी रोज ६ हजार तरुण, अन्न-पाण्यावाचून हाल; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:03 IST

भरती यंत्रणेची घेतली बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना

औरंगाबाद : अग्निवीरच्या भरतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडांगणावर सुरुवात झाली. यासाठी ८६ हजार तरुणांनी नोंदणी केली आहे. भरतीसाठी आलेल्या तरुणांचे अन्न-पाण्यावाचून हाल झाल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या १८ ऑगस्टच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भरतीचे समन्वयक म्हणून सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या.

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा प्रशासन भरती प्रक्रियेत समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना अल्पोपाहार देण्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जवळपास ८६ हजार तरुणांनी भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शनिवारी १३०० तरुण भरतीसाठी सहभागी झाले होते, तर १४ ऑगस्टपासून दररोज ६ हजार तरुण सहभागी होत आहेत. विद्यापीठाच्या क्रीडांगणावर तरुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे. भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अनेक सामाजिक संस्थांची बैठक घेऊन त्यांना यामध्ये सहभागी करून घेतले आहे. जे तरुण शारीरिक चाचणी पूर्ण करून पात्र ठरतील, अशा तरुणांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी अपात्र ठरत आहेत, त्यांच्याही अल्पोपाहाराची व्यवस्था सामाजिक संस्थांनी केली आहे. ही भरती ९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

तो तरुण चाचणीपूर्वीच खाली पडलाकरण नामदेव पवार (वय २०, रा. कन्नड) हा मैदान चाचणीपूर्वीच खाली पडला. त्यातच त्याच्या हृदयावर दबाव आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. भरतीसाठी आलेल्या प्रत्येकाला संबंधित अधिकारी सूचना देत आहेत. कुणालाही काही इतर आजार असेल तर त्याबाबतही विचारणा करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndian Armyभारतीय जवान