शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

अग्निवीर भरतीसाठी रोज ६ हजार तरुण, अन्न-पाण्यावाचून हाल; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:03 IST

भरती यंत्रणेची घेतली बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना

औरंगाबाद : अग्निवीरच्या भरतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडांगणावर सुरुवात झाली. यासाठी ८६ हजार तरुणांनी नोंदणी केली आहे. भरतीसाठी आलेल्या तरुणांचे अन्न-पाण्यावाचून हाल झाल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या १८ ऑगस्टच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भरतीचे समन्वयक म्हणून सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या.

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा प्रशासन भरती प्रक्रियेत समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना अल्पोपाहार देण्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जवळपास ८६ हजार तरुणांनी भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शनिवारी १३०० तरुण भरतीसाठी सहभागी झाले होते, तर १४ ऑगस्टपासून दररोज ६ हजार तरुण सहभागी होत आहेत. विद्यापीठाच्या क्रीडांगणावर तरुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे. भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अनेक सामाजिक संस्थांची बैठक घेऊन त्यांना यामध्ये सहभागी करून घेतले आहे. जे तरुण शारीरिक चाचणी पूर्ण करून पात्र ठरतील, अशा तरुणांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी अपात्र ठरत आहेत, त्यांच्याही अल्पोपाहाराची व्यवस्था सामाजिक संस्थांनी केली आहे. ही भरती ९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

तो तरुण चाचणीपूर्वीच खाली पडलाकरण नामदेव पवार (वय २०, रा. कन्नड) हा मैदान चाचणीपूर्वीच खाली पडला. त्यातच त्याच्या हृदयावर दबाव आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. भरतीसाठी आलेल्या प्रत्येकाला संबंधित अधिकारी सूचना देत आहेत. कुणालाही काही इतर आजार असेल तर त्याबाबतही विचारणा करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndian Armyभारतीय जवान