शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

अग्निवीर भरतीसाठी रोज ६ हजार तरुण, अन्न-पाण्यावाचून हाल; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:03 IST

भरती यंत्रणेची घेतली बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना

औरंगाबाद : अग्निवीरच्या भरतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडांगणावर सुरुवात झाली. यासाठी ८६ हजार तरुणांनी नोंदणी केली आहे. भरतीसाठी आलेल्या तरुणांचे अन्न-पाण्यावाचून हाल झाल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या १८ ऑगस्टच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भरतीचे समन्वयक म्हणून सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या.

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा प्रशासन भरती प्रक्रियेत समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना अल्पोपाहार देण्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जवळपास ८६ हजार तरुणांनी भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शनिवारी १३०० तरुण भरतीसाठी सहभागी झाले होते, तर १४ ऑगस्टपासून दररोज ६ हजार तरुण सहभागी होत आहेत. विद्यापीठाच्या क्रीडांगणावर तरुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे. भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अनेक सामाजिक संस्थांची बैठक घेऊन त्यांना यामध्ये सहभागी करून घेतले आहे. जे तरुण शारीरिक चाचणी पूर्ण करून पात्र ठरतील, अशा तरुणांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी अपात्र ठरत आहेत, त्यांच्याही अल्पोपाहाराची व्यवस्था सामाजिक संस्थांनी केली आहे. ही भरती ९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

तो तरुण चाचणीपूर्वीच खाली पडलाकरण नामदेव पवार (वय २०, रा. कन्नड) हा मैदान चाचणीपूर्वीच खाली पडला. त्यातच त्याच्या हृदयावर दबाव आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. भरतीसाठी आलेल्या प्रत्येकाला संबंधित अधिकारी सूचना देत आहेत. कुणालाही काही इतर आजार असेल तर त्याबाबतही विचारणा करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndian Armyभारतीय जवान