शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नाताळ-नववर्षानिमित्त ६० हजार छत्रपती संभाजीनगरवासीय पर्यटनाला; 'या' ठिकाणांना पसंती

By संतोष हिरेमठ | Updated: December 22, 2023 13:52 IST

पर्यटनाच्या प्लॅनिंगने विमान, रेल्वे, बसगाड्यांची बुकिंग होतेय फुल

 

छत्रपती संभाजीनगर : नाताळ आणि नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी शहरवासीयांची पावले विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे वळणार आहेत. त्यासाठी विमान, रेल्वे, बसगाड्यांची बुकिंग करण्यावर भर दिला जात आहे. आगामी १० दिवसांत किमान ६० हजार शहरवासीय विविध ठिकाणी पर्यटनाला जातील, असे टूर्स व्यावसायिकांनी सांगितले.

नाताळ सण, वीकेण्ड आणि त्यानंतर सरत्या वर्षाला निरोप असा तिहेरी योग जुळून आल्याने सुट्यांचा आनंद पर्यटनाच्या ठिकाणी घेण्याकडे शहरवासीयांचा ओढा दिसून येत आहे. अनेकांनी काही महिन्यांआधीच पर्यटनाचे नियोजन केलेले असल्याने त्यांना अगदी कमी दरात सहलीचा आनंद घेता येणार आहे; परंतु ऐनवेळी नियोजन करणाऱ्यांना अधिक रक्कम मोजावी लागत आहे. पर्यटनाच्या प्लॅनिंगने विमान, रेल्वे, बसगाड्यांची बुकिंग होत असल्याचे सांगण्यात आले.

कोणत्या ठिकाणांना पसंती?गोवा, कोकण, काश्मीर, राजस्थान, बंगळुरू, हम्पी, बदामी, स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्थळांकडे पर्यटकांचा ओढा आहे. त्याबरोबर तिरुपती बालाजी, अयोध्या या ठिकाणाकडेही ओढा आहे. कोरोनामुळे केरळ चर्चेत असले असले तरी पर्यटकांचा ओढा केरळकडे कायम असल्याचेही सांगण्यात आले.

गोव्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याकडे दुर्लक्षचनाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गाेव्याला जाण्यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, गोव्यासाठी विशेष रेल्वेच्या मागणीकडे दुर्लक्षच करण्यात आल्याने या ठिकाणी जाण्यासाठी ट्रॅव्हल्स, खाजगी वाहनाने अथवा अन्य शहर गाठून रेल्वेने प्रवास करावा लागत आहे.

४ ते ५ दिवसांच्या पर्यटनाला पसंतीनाताळच्या वेळी सलग सुट्या आल्या आहेत. त्यामुळे ४ ते ५ दिवसांत होणाऱ्या पर्यटनाला पसंती दिली जात आहे. नववर्षापर्यंत किमान शहरातून जवळपास ६० हजार नागरिक विविध ठिकाणी पर्यटनाला जातील. अयोध्याला जाण्याकडेही कल वाढला आहे.- मंगेश कपोते, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनChristmasनाताळ