शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:53 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळात होरपळतो आहे. १३७२ पैकी ७०० गावे आणि २५८ वाड्यांत पिण्याचे पाणी ...

ठळक मुद्देजायकवाडी मृतसाठ्यात : १६ लाख नागरिकांची पाण्यासाठी वणवण

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळात होरपळतो आहे. १३७२ पैकी ७०० गावे आणि २५८ वाड्यांत पिण्याचे पाणी शिल्लक नाही. टँकरविना पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. १६ लाख नागरिकांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. १०५० टँकर जिल्ह्यात सध्या सुरू आहेत. २०१२ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला भयावह दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे.जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. जायकवाडी धरण मृतसाठ्यात आहे, तर १६ मध्यम प्रकल्पांत २.२० टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. ९३ लघु प्रकल्पांतही अत्यल्प पाणीसाठी शिल्लक आहे. बंधारे, नदीपात्र कोरडे पडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील ६ हजार ४२८ जनावरे चारा छावण्यांमध्ये आहेत. १५ छावण्या सुरू करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात १० लाख ६७ हजार ४१२ जनावरांची संख्या आहे. सिल्लोडमध्ये १७९, गंगापूर तालुक्यात १६६, वैजापूर तालुक्यात १५६ टँकरने, तर औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक १९६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या चारा छावण्यांसाठी शासनाने ५९ लाख ७९ हजार ९०५ रुपये इतके अनुदान दिले आहे. ७५ टक्के रक्कम उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच छावणी संयोजकांना अनुदानाची मागणी करता येणार आहे.४७४ विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यातील ४७३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १२७ विहिरी टँकर व्यतिरिक्त आहेत. टँकरसाठी ३४६ विहिरींचे अधिग्रहण शासनाने केले आहे. ३९४ विहिरी गावांतील आहेत. २५८ वाड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. औरंगाबाद तालुक्यातील पावणेतीन लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. फुलंब्रीतील दीड लाख, पैठण सव्वादोन लाख, गंगापूर अडीच लाख, वैजापूर दोन लाख, खुलताबाद ८५ हजार , कन्नड २ लाख, सिल्लोड तीन लाख, सोयगाव तालुक्यातील १५ हजार नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने द्यावे लागते आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई