शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:53 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळात होरपळतो आहे. १३७२ पैकी ७०० गावे आणि २५८ वाड्यांत पिण्याचे पाणी ...

ठळक मुद्देजायकवाडी मृतसाठ्यात : १६ लाख नागरिकांची पाण्यासाठी वणवण

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळात होरपळतो आहे. १३७२ पैकी ७०० गावे आणि २५८ वाड्यांत पिण्याचे पाणी शिल्लक नाही. टँकरविना पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. १६ लाख नागरिकांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. १०५० टँकर जिल्ह्यात सध्या सुरू आहेत. २०१२ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला भयावह दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे.जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. जायकवाडी धरण मृतसाठ्यात आहे, तर १६ मध्यम प्रकल्पांत २.२० टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. ९३ लघु प्रकल्पांतही अत्यल्प पाणीसाठी शिल्लक आहे. बंधारे, नदीपात्र कोरडे पडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील ६ हजार ४२८ जनावरे चारा छावण्यांमध्ये आहेत. १५ छावण्या सुरू करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात १० लाख ६७ हजार ४१२ जनावरांची संख्या आहे. सिल्लोडमध्ये १७९, गंगापूर तालुक्यात १६६, वैजापूर तालुक्यात १५६ टँकरने, तर औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक १९६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या चारा छावण्यांसाठी शासनाने ५९ लाख ७९ हजार ९०५ रुपये इतके अनुदान दिले आहे. ७५ टक्के रक्कम उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच छावणी संयोजकांना अनुदानाची मागणी करता येणार आहे.४७४ विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यातील ४७३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १२७ विहिरी टँकर व्यतिरिक्त आहेत. टँकरसाठी ३४६ विहिरींचे अधिग्रहण शासनाने केले आहे. ३९४ विहिरी गावांतील आहेत. २५८ वाड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. औरंगाबाद तालुक्यातील पावणेतीन लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. फुलंब्रीतील दीड लाख, पैठण सव्वादोन लाख, गंगापूर अडीच लाख, वैजापूर दोन लाख, खुलताबाद ८५ हजार , कन्नड २ लाख, सिल्लोड तीन लाख, सोयगाव तालुक्यातील १५ हजार नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने द्यावे लागते आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई