शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:53 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळात होरपळतो आहे. १३७२ पैकी ७०० गावे आणि २५८ वाड्यांत पिण्याचे पाणी ...

ठळक मुद्देजायकवाडी मृतसाठ्यात : १६ लाख नागरिकांची पाण्यासाठी वणवण

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामीण भाग दुष्काळात होरपळतो आहे. १३७२ पैकी ७०० गावे आणि २५८ वाड्यांत पिण्याचे पाणी शिल्लक नाही. टँकरविना पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. १६ लाख नागरिकांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. १०५० टँकर जिल्ह्यात सध्या सुरू आहेत. २०१२ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला भयावह दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे.जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. जायकवाडी धरण मृतसाठ्यात आहे, तर १६ मध्यम प्रकल्पांत २.२० टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. ९३ लघु प्रकल्पांतही अत्यल्प पाणीसाठी शिल्लक आहे. बंधारे, नदीपात्र कोरडे पडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील ६ हजार ४२८ जनावरे चारा छावण्यांमध्ये आहेत. १५ छावण्या सुरू करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात १० लाख ६७ हजार ४१२ जनावरांची संख्या आहे. सिल्लोडमध्ये १७९, गंगापूर तालुक्यात १६६, वैजापूर तालुक्यात १५६ टँकरने, तर औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक १९६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या चारा छावण्यांसाठी शासनाने ५९ लाख ७९ हजार ९०५ रुपये इतके अनुदान दिले आहे. ७५ टक्के रक्कम उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच छावणी संयोजकांना अनुदानाची मागणी करता येणार आहे.४७४ विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यातील ४७३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १२७ विहिरी टँकर व्यतिरिक्त आहेत. टँकरसाठी ३४६ विहिरींचे अधिग्रहण शासनाने केले आहे. ३९४ विहिरी गावांतील आहेत. २५८ वाड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. औरंगाबाद तालुक्यातील पावणेतीन लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. फुलंब्रीतील दीड लाख, पैठण सव्वादोन लाख, गंगापूर अडीच लाख, वैजापूर दोन लाख, खुलताबाद ८५ हजार , कन्नड २ लाख, सिल्लोड तीन लाख, सोयगाव तालुक्यातील १५ हजार नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने द्यावे लागते आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई