शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मराठवाड्याच्या हक्काचे ५.६ टीएमसी पाणी रोखले;आदेशाची अंमलबजावणी पाचव्या दिवशीही नाही

By बापू सोळुंके | Updated: November 4, 2023 12:21 IST

सध्या पाणी सोडू नका, शासनाचे महामंडळाला आदेश

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील समूह धरणातून ५.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३० ऑक्टोबर रोजी घेतला. मात्र, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याने या आदेशाची अंमलबजावणी सध्या करू नका, असे स्पष्ट आदेश शासनाने महामंडळाला दिल्याची माहिती उच्च पदस्थ सूत्रांकडून मिळाली. परिणामी मराठवाड्याला पाच दिवसानंतर ही हक्काचे पाणी मिळाले नाही.

अत्यल्प पाऊस पडल्यामुळे मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. आगामी काळात मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा भीषण संकटाचे संकेत आजच मिळत आहेत. अशा परिस्थितीत समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असेल तर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील समूह धरणातून मराठवाड्यासाठी गोदापात्रात पाणी सोडावे, असा नियम आहे. याबाबतचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानेही दिलेला आहे. यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी ३० ऑक्टोबर रोजी मराठवाड्यासाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील विविध धरणांतून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात कोणत्या धरणातून किती पाणी सोडायचे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही कार्यकारी संचालकांच्या आदेशाने नाशिकच्या मुख्य अभियंत्यांची आहे. 

मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय होताच अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही जणांनी पाणी सोडण्यास विरोध केला. याच दरम्यान राज्य सरकारने पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नका, असे आदेश महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दोन दिवसांपूर्वी दिले. राज्यातील आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे कारण यासाठी देण्यात आल्याचे सूत्रांनी दिले. परिणामी, मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय होऊनही पाच दिवसानंतर या निर्णयाची अंमलबजावणी जलसंपदा विभागाने केली नाही.

शासनाकडून निर्देश येतीलअहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील समूह धरणातून मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील आंदोलनामुळे थांबली होती. आता दोन दिवसांत याविषयी शासनाकडून निर्देश येतील आणि सोडण्यासंदर्भात पुढील कार्यवाही होईल.- संतोष तिरमनवार, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद