शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मराठवाड्याच्या हक्काचे ५.६ टीएमसी पाणी रोखले;आदेशाची अंमलबजावणी पाचव्या दिवशीही नाही

By बापू सोळुंके | Updated: November 4, 2023 12:21 IST

सध्या पाणी सोडू नका, शासनाचे महामंडळाला आदेश

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील समूह धरणातून ५.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३० ऑक्टोबर रोजी घेतला. मात्र, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याने या आदेशाची अंमलबजावणी सध्या करू नका, असे स्पष्ट आदेश शासनाने महामंडळाला दिल्याची माहिती उच्च पदस्थ सूत्रांकडून मिळाली. परिणामी मराठवाड्याला पाच दिवसानंतर ही हक्काचे पाणी मिळाले नाही.

अत्यल्प पाऊस पडल्यामुळे मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. आगामी काळात मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा भीषण संकटाचे संकेत आजच मिळत आहेत. अशा परिस्थितीत समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असेल तर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील समूह धरणातून मराठवाड्यासाठी गोदापात्रात पाणी सोडावे, असा नियम आहे. याबाबतचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानेही दिलेला आहे. यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी ३० ऑक्टोबर रोजी मराठवाड्यासाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील विविध धरणांतून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात कोणत्या धरणातून किती पाणी सोडायचे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही कार्यकारी संचालकांच्या आदेशाने नाशिकच्या मुख्य अभियंत्यांची आहे. 

मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय होताच अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही जणांनी पाणी सोडण्यास विरोध केला. याच दरम्यान राज्य सरकारने पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नका, असे आदेश महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दोन दिवसांपूर्वी दिले. राज्यातील आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे कारण यासाठी देण्यात आल्याचे सूत्रांनी दिले. परिणामी, मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय होऊनही पाच दिवसानंतर या निर्णयाची अंमलबजावणी जलसंपदा विभागाने केली नाही.

शासनाकडून निर्देश येतीलअहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील समूह धरणातून मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील आंदोलनामुळे थांबली होती. आता दोन दिवसांत याविषयी शासनाकडून निर्देश येतील आणि सोडण्यासंदर्भात पुढील कार्यवाही होईल.- संतोष तिरमनवार, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद