शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

किसान सन्मान योजनेतील ५२ बोगस लाभार्थ्यांकडून ५ लाख वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 19:47 IST

5 lakh paid by 52 bogus beneficiaries of Kisan Sanman Yojana नोटीस बजावलेल्या ८२ पैकी ५२ अपात्र लाभार्थ्यांची सुनावणी झाली

ठळक मुद्देगैरहजर बोगस लाभार्थ्यांना पुन्हा नोटीस५२ शेतकऱ्यांकडून ४ लक्ष ९८ हजार इतकी रक्कम जागेवरच वसूल करण्यात आली आहे.

सोयगाव: किसान सन्मान योजनेत अपात्र असतानाही लाभ घेतलेल्या ४०१ शेतकऱ्यांना शासनाने नोटीस बजावली होती. सोमवारी सोयगाव मंडळातील १७ गावातील अशा बोगस लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली सुनावणी तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. यामध्ये नोटीस बजावलेल्या ८२ पैकी ५२ अपात्र लाभार्थ्यांची सुनावणी घेवून फेरतपासणी करण्यात आली. सोयगाव मंडळातील नोटीसा बजावलेले सर्व ८२ शेतकरी अपात्र ठरले. या शेतकऱ्यांनी उचलेल्या ७ लक्ष ६९ हजार इतक्या लाभापैकी ४ लक्ष ९८ हजार इतकी रक्कम ५२ लाभार्थ्यांनी भरणा केली आहे. पहिल्याच सुनावणीत ३० शेतकरी गैरहजर राहिले आहेत. शासनाच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली.

किसान सन्मान योजनेत चुकीची माहिती भरून करदाते आणि पती-पत्नी या लाभार्थ्यांनी बोगस लाभ घेत असल्याचे शासनाच्या अंतिम सर्वेक्षणात उघड झाले होते. त्या अनुषंगाने सोयगाव तालुक्यात ४०१ शेतकऱ्यांनी खोटा लाभ उच्झाल केल्याचे निष्पन्न झाल्यावरून सोमवारी सोयगाव मंडळातील १७ गावांच्या लाभार्थ्यांची सुनावणी घेण्यात आली या सुनावणीत ८२ पैकी ५२ शेतकरी हजर राहिल्याने या ५२ शेतकऱ्यांकडून ४ लक्ष ९८ हजार इतकी रक्कम जागेवरच वसूल करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या किसान सन्मान योजनेच्या सुनावणीसाठी करदाते यांनाच सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते.

गैरहजर बोगस लाभार्थ्यांना पुन्हा नोटीससोयगाव मंडळातील सुनावणीत गैरहजर राहिलेल्या ३० शेतकऱ्यांना पुन्हा नोटीस काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली. सोमवारी झालेल्या सुनावणीत कागदपत्रांच्या फेरतपासणीत चुकून एकही अपात्र ठरलेला लाभार्थी पात्र ठरला नव्हता त्यामुळे ५२ लाभार्थी अपात्रच असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले.

बोगस शेतकरी योजनेतून बादसोयगाव तहसील कार्यालयात झालेल्या किसान सन्मान योजनेच्या पहिल्याच सुनावणीत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्याने रक्कमेचा भरणा करताच त्याची भरणा केलेली पावती घेवून योजनेच्या संकेतस्थळावर पुन्हा अपलोड करून या बोगस लाभार्थ्यांना योजनेतूनच बाद करण्यात आले आहे.त्यामुळे किसान सन्मान योजनेचा पुढील हप्त्याची रक्कम यापुढे या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार नसल्याची रननीती या सुनावणीत आखण्यात आली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद