शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

तीन वर्षांत ४८० आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:11 IST

शेतकरी आत्महत्यांचा विषय नवीन राहिलेला नाही. मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असे वाटत होते. मात्र ही अपेक्षाही फोल ठरल्याचेच दिसते. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल १०४ घटना घडल्या असून मागील तीन वर्षांत ४८० शेतकºयांनी मृत्युला कवटाळल्याचे खुद्द शासकीय आकडेवारीच सांगते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शेतकरी आत्महत्यांचा विषय नवीन राहिलेला नाही. मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असे वाटत होते. मात्र ही अपेक्षाही फोल ठरल्याचेच दिसते. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल १०४ घटना घडल्या असून मागील तीन वर्षांत ४८० शेतकºयांनी मृत्युला कवटाळल्याचे खुद्द शासकीय आकडेवारीच सांगते.नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि चांगले पीक हाती लागल्यानंतरही त्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल होतो. यातूनच तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. अशा स्थितीत कर्ता पुरुष गेल्याने शेतकºयांच्या कुटुंबाची स्थिती अधिकच दयनीय होत असल्याचे मागील काही वर्षांपासूनचे चित्र आहे. नांदेड जिल्हाही याला अपवाद नाही.मागील १३ वर्षांपासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु असले तरी मागील तीन वर्षांत अशा घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. २००३ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या २ घटना घडल्या होत्या. २००४ मध्ये ही संख्या २९ वर गेली. त्यानंतर २००५ मध्ये ११, २००६ मध्ये ६०, २००७ मध्ये ७२, २००८ मध्ये ५९, २००९ मध्ये ६०, २०१० मध्ये ५५, २०११ मध्ये ३३, २०१२ मध्ये ३९ तर २०१३ मध्ये शेतकरी आत्महत्येच्या जिल्ह्यात ४६ घटना घडल्या.अलीकडील तीन वर्षांत या घटनांत वाढ झाली आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल ११८ घटना पुढे आल्या आहेत. हीच परिस्थिती २०१५ मध्येही कायम राहिली. या वर्षात १९० शेतकºयांनी मृत्यूस कवटाळले. तर २०१६ मध्ये १८० शेतकºयांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या घटनांचा अभ्यास केला असता अनेकांनी विषारी औषध प्राशन केले. काहींनी गळफास घेतला तर काहींनी विहिरीत उडी मारुन आपले आयुष्य संपविल्याचे दिसते.मागील वर्षभरापासून शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने विविध स्तरावर चर्चा सुरु आहे. २४ जून २०१७ रोजी राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणाही केली.मात्र त्यानंतरही आत्महत्येच्या घटना थांबलेल्या नाहीत. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यातील १०४ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याने शेतकरी आत्महत्येच्या या प्रश्नाकडे राज्य शासनाने अधिक संवेदनशीलपणाने पाहण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. दरम्यान, मागील तेरा वर्षात जिल्ह्यात ९५४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असल्या तरी त्यातील ६६६ शेतकºयांच्या कुटुंबियांनाच शासकीय मदत मिळाली आहे.