शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तीन वर्षांत ४८० आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:11 IST

शेतकरी आत्महत्यांचा विषय नवीन राहिलेला नाही. मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असे वाटत होते. मात्र ही अपेक्षाही फोल ठरल्याचेच दिसते. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल १०४ घटना घडल्या असून मागील तीन वर्षांत ४८० शेतकºयांनी मृत्युला कवटाळल्याचे खुद्द शासकीय आकडेवारीच सांगते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शेतकरी आत्महत्यांचा विषय नवीन राहिलेला नाही. मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असे वाटत होते. मात्र ही अपेक्षाही फोल ठरल्याचेच दिसते. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल १०४ घटना घडल्या असून मागील तीन वर्षांत ४८० शेतकºयांनी मृत्युला कवटाळल्याचे खुद्द शासकीय आकडेवारीच सांगते.नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि चांगले पीक हाती लागल्यानंतरही त्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल होतो. यातूनच तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. अशा स्थितीत कर्ता पुरुष गेल्याने शेतकºयांच्या कुटुंबाची स्थिती अधिकच दयनीय होत असल्याचे मागील काही वर्षांपासूनचे चित्र आहे. नांदेड जिल्हाही याला अपवाद नाही.मागील १३ वर्षांपासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु असले तरी मागील तीन वर्षांत अशा घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. २००३ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या २ घटना घडल्या होत्या. २००४ मध्ये ही संख्या २९ वर गेली. त्यानंतर २००५ मध्ये ११, २००६ मध्ये ६०, २००७ मध्ये ७२, २००८ मध्ये ५९, २००९ मध्ये ६०, २०१० मध्ये ५५, २०११ मध्ये ३३, २०१२ मध्ये ३९ तर २०१३ मध्ये शेतकरी आत्महत्येच्या जिल्ह्यात ४६ घटना घडल्या.अलीकडील तीन वर्षांत या घटनांत वाढ झाली आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल ११८ घटना पुढे आल्या आहेत. हीच परिस्थिती २०१५ मध्येही कायम राहिली. या वर्षात १९० शेतकºयांनी मृत्यूस कवटाळले. तर २०१६ मध्ये १८० शेतकºयांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या घटनांचा अभ्यास केला असता अनेकांनी विषारी औषध प्राशन केले. काहींनी गळफास घेतला तर काहींनी विहिरीत उडी मारुन आपले आयुष्य संपविल्याचे दिसते.मागील वर्षभरापासून शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने विविध स्तरावर चर्चा सुरु आहे. २४ जून २०१७ रोजी राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणाही केली.मात्र त्यानंतरही आत्महत्येच्या घटना थांबलेल्या नाहीत. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यातील १०४ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याने शेतकरी आत्महत्येच्या या प्रश्नाकडे राज्य शासनाने अधिक संवेदनशीलपणाने पाहण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. दरम्यान, मागील तेरा वर्षात जिल्ह्यात ९५४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असल्या तरी त्यातील ६६६ शेतकºयांच्या कुटुंबियांनाच शासकीय मदत मिळाली आहे.