शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत ४८० आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:11 IST

शेतकरी आत्महत्यांचा विषय नवीन राहिलेला नाही. मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असे वाटत होते. मात्र ही अपेक्षाही फोल ठरल्याचेच दिसते. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल १०४ घटना घडल्या असून मागील तीन वर्षांत ४८० शेतकºयांनी मृत्युला कवटाळल्याचे खुद्द शासकीय आकडेवारीच सांगते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शेतकरी आत्महत्यांचा विषय नवीन राहिलेला नाही. मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असे वाटत होते. मात्र ही अपेक्षाही फोल ठरल्याचेच दिसते. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल १०४ घटना घडल्या असून मागील तीन वर्षांत ४८० शेतकºयांनी मृत्युला कवटाळल्याचे खुद्द शासकीय आकडेवारीच सांगते.नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि चांगले पीक हाती लागल्यानंतरही त्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल होतो. यातूनच तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. अशा स्थितीत कर्ता पुरुष गेल्याने शेतकºयांच्या कुटुंबाची स्थिती अधिकच दयनीय होत असल्याचे मागील काही वर्षांपासूनचे चित्र आहे. नांदेड जिल्हाही याला अपवाद नाही.मागील १३ वर्षांपासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु असले तरी मागील तीन वर्षांत अशा घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. २००३ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या २ घटना घडल्या होत्या. २००४ मध्ये ही संख्या २९ वर गेली. त्यानंतर २००५ मध्ये ११, २००६ मध्ये ६०, २००७ मध्ये ७२, २००८ मध्ये ५९, २००९ मध्ये ६०, २०१० मध्ये ५५, २०११ मध्ये ३३, २०१२ मध्ये ३९ तर २०१३ मध्ये शेतकरी आत्महत्येच्या जिल्ह्यात ४६ घटना घडल्या.अलीकडील तीन वर्षांत या घटनांत वाढ झाली आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल ११८ घटना पुढे आल्या आहेत. हीच परिस्थिती २०१५ मध्येही कायम राहिली. या वर्षात १९० शेतकºयांनी मृत्यूस कवटाळले. तर २०१६ मध्ये १८० शेतकºयांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या घटनांचा अभ्यास केला असता अनेकांनी विषारी औषध प्राशन केले. काहींनी गळफास घेतला तर काहींनी विहिरीत उडी मारुन आपले आयुष्य संपविल्याचे दिसते.मागील वर्षभरापासून शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने विविध स्तरावर चर्चा सुरु आहे. २४ जून २०१७ रोजी राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणाही केली.मात्र त्यानंतरही आत्महत्येच्या घटना थांबलेल्या नाहीत. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यातील १०४ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याने शेतकरी आत्महत्येच्या या प्रश्नाकडे राज्य शासनाने अधिक संवेदनशीलपणाने पाहण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. दरम्यान, मागील तेरा वर्षात जिल्ह्यात ९५४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असल्या तरी त्यातील ६६६ शेतकºयांच्या कुटुंबियांनाच शासकीय मदत मिळाली आहे.