शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध वसाहतींमध्ये २४१ कंपन्या करणार ४,६६१ कोटींंची गुंतवणूक

By बापू सोळुंके | Updated: March 14, 2024 18:13 IST

डीआयसीच्या गुंतवणूक परिषदेला प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत तब्बल २४१ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या करारांनुसार आपल्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी कंपन्यांनी ४ हजार ४६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे नमूद केले. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शनिवारी हे सामंजस्य करार करण्यात आले.

ऑरिक सिटी, शेंद्रा पंचतारांकित वसाहत, वाळूज, पैठण, चिकलठाणा आणि ऑरिक सिटींतर्गत असलेल्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये औद्योगिक विश्वाला भरभराटीची संधी आहे. जास्तीत जास्त उद्योजकांनी येथील औद्योगिक वसाहतींमध्ये गुंतवणूक करावी, यासाठी उद्योग विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी उद्योगांना वीजबिल, जीएसटीमध्ये अनुदान तसेच भूखंडांची रजिस्ट्री करण्यासाठीही स्टॅम्प ड्यूटीमध्ये सवलत दिली जाते. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दि. ९ मार्च रोजी चिकलठाणा येथील मासिआच्या सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप स्वामी अध्यक्षस्थानी होते. 

या परिषदेमध्ये २४१ उद्योग घटकांसोबत ४ हजार ६६१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे येथील १५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे उद्योग विभागाच्या वतीने सांगण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, रोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, मासिआचे अध्यक्ष अनिल पाटील, सीएमआयएचे अध्यक्ष दुष्यंत पाटील उपस्थित होते. परिषदेच्या प्रारंभिक उद्योग सहसंचालक, यशवंते यांनी शासनाचे नवीन आयटी धोरण आणि उद्योगांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन योजनांची माहिती दिली. गिरासे यांनी उद्योग उभारणीसाठी एमआयडीसीचे योगदान अधोरेखित केले.

१५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणारविविध औद्योगिक वसाहतींमध्ये कार्यरत असलेल्या जुन्या कंपन्यांनी विस्तार करीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. तसेच, काही लहान कंपन्यांनी छोटे भूखंड खरेदी करून तेथे उद्योग थाटण्याचा निर्णय घेतला. अशा सुमारे २४१ कंपन्या जिल्ह्यातील विविध वसाहतींमधील कंपन्यांत तब्बल ४ हजार ४६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहेत. यातून १५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी