शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध वसाहतींमध्ये २४१ कंपन्या करणार ४,६६१ कोटींंची गुंतवणूक

By बापू सोळुंके | Updated: March 14, 2024 18:13 IST

डीआयसीच्या गुंतवणूक परिषदेला प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत तब्बल २४१ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या करारांनुसार आपल्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी कंपन्यांनी ४ हजार ४६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे नमूद केले. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शनिवारी हे सामंजस्य करार करण्यात आले.

ऑरिक सिटी, शेंद्रा पंचतारांकित वसाहत, वाळूज, पैठण, चिकलठाणा आणि ऑरिक सिटींतर्गत असलेल्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये औद्योगिक विश्वाला भरभराटीची संधी आहे. जास्तीत जास्त उद्योजकांनी येथील औद्योगिक वसाहतींमध्ये गुंतवणूक करावी, यासाठी उद्योग विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी उद्योगांना वीजबिल, जीएसटीमध्ये अनुदान तसेच भूखंडांची रजिस्ट्री करण्यासाठीही स्टॅम्प ड्यूटीमध्ये सवलत दिली जाते. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दि. ९ मार्च रोजी चिकलठाणा येथील मासिआच्या सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप स्वामी अध्यक्षस्थानी होते. 

या परिषदेमध्ये २४१ उद्योग घटकांसोबत ४ हजार ६६१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे येथील १५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे उद्योग विभागाच्या वतीने सांगण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, रोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, मासिआचे अध्यक्ष अनिल पाटील, सीएमआयएचे अध्यक्ष दुष्यंत पाटील उपस्थित होते. परिषदेच्या प्रारंभिक उद्योग सहसंचालक, यशवंते यांनी शासनाचे नवीन आयटी धोरण आणि उद्योगांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन योजनांची माहिती दिली. गिरासे यांनी उद्योग उभारणीसाठी एमआयडीसीचे योगदान अधोरेखित केले.

१५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणारविविध औद्योगिक वसाहतींमध्ये कार्यरत असलेल्या जुन्या कंपन्यांनी विस्तार करीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. तसेच, काही लहान कंपन्यांनी छोटे भूखंड खरेदी करून तेथे उद्योग थाटण्याचा निर्णय घेतला. अशा सुमारे २४१ कंपन्या जिल्ह्यातील विविध वसाहतींमधील कंपन्यांत तब्बल ४ हजार ४६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहेत. यातून १५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी