शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध वसाहतींमध्ये २४१ कंपन्या करणार ४,६६१ कोटींंची गुंतवणूक

By बापू सोळुंके | Updated: March 14, 2024 18:13 IST

डीआयसीच्या गुंतवणूक परिषदेला प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत तब्बल २४१ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या करारांनुसार आपल्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी कंपन्यांनी ४ हजार ४६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे नमूद केले. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शनिवारी हे सामंजस्य करार करण्यात आले.

ऑरिक सिटी, शेंद्रा पंचतारांकित वसाहत, वाळूज, पैठण, चिकलठाणा आणि ऑरिक सिटींतर्गत असलेल्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये औद्योगिक विश्वाला भरभराटीची संधी आहे. जास्तीत जास्त उद्योजकांनी येथील औद्योगिक वसाहतींमध्ये गुंतवणूक करावी, यासाठी उद्योग विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी उद्योगांना वीजबिल, जीएसटीमध्ये अनुदान तसेच भूखंडांची रजिस्ट्री करण्यासाठीही स्टॅम्प ड्यूटीमध्ये सवलत दिली जाते. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दि. ९ मार्च रोजी चिकलठाणा येथील मासिआच्या सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप स्वामी अध्यक्षस्थानी होते. 

या परिषदेमध्ये २४१ उद्योग घटकांसोबत ४ हजार ६६१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे येथील १५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे उद्योग विभागाच्या वतीने सांगण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, रोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, मासिआचे अध्यक्ष अनिल पाटील, सीएमआयएचे अध्यक्ष दुष्यंत पाटील उपस्थित होते. परिषदेच्या प्रारंभिक उद्योग सहसंचालक, यशवंते यांनी शासनाचे नवीन आयटी धोरण आणि उद्योगांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन योजनांची माहिती दिली. गिरासे यांनी उद्योग उभारणीसाठी एमआयडीसीचे योगदान अधोरेखित केले.

१५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणारविविध औद्योगिक वसाहतींमध्ये कार्यरत असलेल्या जुन्या कंपन्यांनी विस्तार करीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. तसेच, काही लहान कंपन्यांनी छोटे भूखंड खरेदी करून तेथे उद्योग थाटण्याचा निर्णय घेतला. अशा सुमारे २४१ कंपन्या जिल्ह्यातील विविध वसाहतींमधील कंपन्यांत तब्बल ४ हजार ४६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहेत. यातून १५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी