शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध वसाहतींमध्ये २४१ कंपन्या करणार ४,६६१ कोटींंची गुंतवणूक

By बापू सोळुंके | Updated: March 14, 2024 18:13 IST

डीआयसीच्या गुंतवणूक परिषदेला प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत तब्बल २४१ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या करारांनुसार आपल्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी कंपन्यांनी ४ हजार ४६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे नमूद केले. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शनिवारी हे सामंजस्य करार करण्यात आले.

ऑरिक सिटी, शेंद्रा पंचतारांकित वसाहत, वाळूज, पैठण, चिकलठाणा आणि ऑरिक सिटींतर्गत असलेल्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये औद्योगिक विश्वाला भरभराटीची संधी आहे. जास्तीत जास्त उद्योजकांनी येथील औद्योगिक वसाहतींमध्ये गुंतवणूक करावी, यासाठी उद्योग विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी उद्योगांना वीजबिल, जीएसटीमध्ये अनुदान तसेच भूखंडांची रजिस्ट्री करण्यासाठीही स्टॅम्प ड्यूटीमध्ये सवलत दिली जाते. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दि. ९ मार्च रोजी चिकलठाणा येथील मासिआच्या सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप स्वामी अध्यक्षस्थानी होते. 

या परिषदेमध्ये २४१ उद्योग घटकांसोबत ४ हजार ६६१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे येथील १५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे उद्योग विभागाच्या वतीने सांगण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, रोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, मासिआचे अध्यक्ष अनिल पाटील, सीएमआयएचे अध्यक्ष दुष्यंत पाटील उपस्थित होते. परिषदेच्या प्रारंभिक उद्योग सहसंचालक, यशवंते यांनी शासनाचे नवीन आयटी धोरण आणि उद्योगांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन योजनांची माहिती दिली. गिरासे यांनी उद्योग उभारणीसाठी एमआयडीसीचे योगदान अधोरेखित केले.

१५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणारविविध औद्योगिक वसाहतींमध्ये कार्यरत असलेल्या जुन्या कंपन्यांनी विस्तार करीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. तसेच, काही लहान कंपन्यांनी छोटे भूखंड खरेदी करून तेथे उद्योग थाटण्याचा निर्णय घेतला. अशा सुमारे २४१ कंपन्या जिल्ह्यातील विविध वसाहतींमधील कंपन्यांत तब्बल ४ हजार ४६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहेत. यातून १५ हजार ६६५ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी