शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

४२४ वर्षांपूर्वी संत भानुदास महाराजांनी पैठणहून काढली पहिली दिंडी; यावर्षी ७० दिंड्या रवाना

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 17, 2023 20:02 IST

‘पाऊले चालती पंढरीची वाट....'श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांत तिसरा मान पैठणच्या दिंडीला असतो.

छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या विठोबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून हजारो दिंड्या पंढरपूरला जात आहेत. मात्र, पंढरपूरला वारीसाठी ४२३ वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातून पहिली दिंडी काढण्याचा मान संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांना जातो. या दिंडीच्या परंपरेला यंदा ४२४ वर्षे पूर्ण होत आहेत. पैठण येथून शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांची पादुका दिंडी पंढरपूरला प्रस्थान झाली आणि त्यापाठोपाठ जिल्ह्यातील ७० लहान-मोठ्या दिंड्यांतील हजारो भाविकांची पावले पंढरपूरच्या दिशेने वेगाने पडत आहेत. श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांत तिसरा मान पैठणच्या दिंडीला असतो. शनिवारी ही दिंडी वाजत-गाजत पंढरपूरला निघाली. याच दिंडीत जिल्हाभरातून आलेल्या आणखी २० दिंड्या सहभागी झाल्या आहेत.

पंढरपुरात विठ्ठलाची मूर्ती आली भानुदास महाराजांमुळे. विजयनगरचा राजा कृष्णराय यांनी विठ्ठलाची मूर्ती पंढरपुराहून आपल्या राजधानीत नेली होती. संत एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी विजयनगरला जाऊन तिथून विठ्ठलाची मूर्ती पुन्हा पंढरपुरात आणली व मंदिरात स्थापन केली. याची कथा आजही कीर्तनातून सांगितली जाते. यामुळे पैठणमधून निघणाऱ्या दिंडीला पंढरपुरात मानाचे स्थान लाभले आहे.

यंदा १४ नवीन दिंड्यांची पडली भरदरवर्षी जिल्ह्यातून ५६ दिंड्या पंढरपूरला प्रस्थान होत असतात. मात्र, यंदा आणखी नवीन १४ दिंड्यांची भर पडली आहे. यामुळे यंदा दिंड्यांची संख्या वाढून ७० झाली आहे. जिल्ह्यातील ३५ हजारांपेक्षा अधिक भाविक या दिंड्यांद्वारे पंढरपूरच्या दिशेने पायी चालत आहेत.

जिल्ह्यातील मानाच्या दिंड्याजिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मानाची दिंडी म्हणजे पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांची पादुका दिंडी होय. याशिवाय दौलताबाद येथील संत जनार्दन स्वामींची पालखी (बाबासाहेब आनंदे महाराज), गंगापूर येथील रामभाऊ राऊत महाराज (विठ्ठल आश्रम) यांची दिंडी, शिरूर येथील संत बहिणाबाई महाराज दिंडी, संत शंकरस्वामी महाराज दिंडी, देवगड येथील श्री दत्त देवस्थानची (भास्करगिरी महाराज) दिंडी यासह अन्य मानाच्या दिंड्या आहेत. त्या दरवर्षी पंढरपूर वारीत सहभागी होत असतात.

३० वर्षांत दोन वर्षीच दिंडीची परंपरा खंडितमागील ३० वर्षांपासून आम्ही नियमित आषाढी एकादशीच्या दिंडीसोबत पंढरपूरला जात आहोत. दरवर्षी श्रीविठ्ठलाचे दर्शन होते. पण कोरोना काळात सलग दोन वर्षे दिंडी परंपरा खंडित झाली होती. यामुळे विठ्ठलाचे दर्शन झाले नव्हते. मात्र, त्या काळातही आम्ही घरीच भजन, नामस्मरण करीत होतो. देहाने जरी घरी असलो तरी तेव्हा मनाने पंढरपुरातच होतो.-हभप प्रभाकर बोरसे महाराज

सर्वांत आनंदाचा क्षण१९ दिवसांचा पायी प्रवास छत्रपती संभाजीनगरातून आम्ही मागील ३८ वर्षांपासून पंढरपूरला दिंडीत जात आहोत. मधील दोन वर्षे कोरोनामुळे जाता आले नाही. १९ व्या दिवशी आम्ही पंढरपुरात पोहोचतो. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी आम्ही तिथे असतो. मंदिराबाहेर १२ ते २३ तास रांगेत उभे राहून जेव्हा विठ्ठलाचे दर्शन घडते, तो क्षण जीवनातील सर्वांत आनंदाचा ठरतो.- हरिश्चंद्र दांडगे, वारकरी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022spiritualअध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारी