शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

४२४ वर्षांपूर्वी संत भानुदास महाराजांनी पैठणहून काढली पहिली दिंडी; यावर्षी ७० दिंड्या रवाना

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 17, 2023 20:02 IST

‘पाऊले चालती पंढरीची वाट....'श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांत तिसरा मान पैठणच्या दिंडीला असतो.

छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या विठोबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून हजारो दिंड्या पंढरपूरला जात आहेत. मात्र, पंढरपूरला वारीसाठी ४२३ वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातून पहिली दिंडी काढण्याचा मान संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांना जातो. या दिंडीच्या परंपरेला यंदा ४२४ वर्षे पूर्ण होत आहेत. पैठण येथून शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांची पादुका दिंडी पंढरपूरला प्रस्थान झाली आणि त्यापाठोपाठ जिल्ह्यातील ७० लहान-मोठ्या दिंड्यांतील हजारो भाविकांची पावले पंढरपूरच्या दिशेने वेगाने पडत आहेत. श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांत तिसरा मान पैठणच्या दिंडीला असतो. शनिवारी ही दिंडी वाजत-गाजत पंढरपूरला निघाली. याच दिंडीत जिल्हाभरातून आलेल्या आणखी २० दिंड्या सहभागी झाल्या आहेत.

पंढरपुरात विठ्ठलाची मूर्ती आली भानुदास महाराजांमुळे. विजयनगरचा राजा कृष्णराय यांनी विठ्ठलाची मूर्ती पंढरपुराहून आपल्या राजधानीत नेली होती. संत एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी विजयनगरला जाऊन तिथून विठ्ठलाची मूर्ती पुन्हा पंढरपुरात आणली व मंदिरात स्थापन केली. याची कथा आजही कीर्तनातून सांगितली जाते. यामुळे पैठणमधून निघणाऱ्या दिंडीला पंढरपुरात मानाचे स्थान लाभले आहे.

यंदा १४ नवीन दिंड्यांची पडली भरदरवर्षी जिल्ह्यातून ५६ दिंड्या पंढरपूरला प्रस्थान होत असतात. मात्र, यंदा आणखी नवीन १४ दिंड्यांची भर पडली आहे. यामुळे यंदा दिंड्यांची संख्या वाढून ७० झाली आहे. जिल्ह्यातील ३५ हजारांपेक्षा अधिक भाविक या दिंड्यांद्वारे पंढरपूरच्या दिशेने पायी चालत आहेत.

जिल्ह्यातील मानाच्या दिंड्याजिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मानाची दिंडी म्हणजे पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांची पादुका दिंडी होय. याशिवाय दौलताबाद येथील संत जनार्दन स्वामींची पालखी (बाबासाहेब आनंदे महाराज), गंगापूर येथील रामभाऊ राऊत महाराज (विठ्ठल आश्रम) यांची दिंडी, शिरूर येथील संत बहिणाबाई महाराज दिंडी, संत शंकरस्वामी महाराज दिंडी, देवगड येथील श्री दत्त देवस्थानची (भास्करगिरी महाराज) दिंडी यासह अन्य मानाच्या दिंड्या आहेत. त्या दरवर्षी पंढरपूर वारीत सहभागी होत असतात.

३० वर्षांत दोन वर्षीच दिंडीची परंपरा खंडितमागील ३० वर्षांपासून आम्ही नियमित आषाढी एकादशीच्या दिंडीसोबत पंढरपूरला जात आहोत. दरवर्षी श्रीविठ्ठलाचे दर्शन होते. पण कोरोना काळात सलग दोन वर्षे दिंडी परंपरा खंडित झाली होती. यामुळे विठ्ठलाचे दर्शन झाले नव्हते. मात्र, त्या काळातही आम्ही घरीच भजन, नामस्मरण करीत होतो. देहाने जरी घरी असलो तरी तेव्हा मनाने पंढरपुरातच होतो.-हभप प्रभाकर बोरसे महाराज

सर्वांत आनंदाचा क्षण१९ दिवसांचा पायी प्रवास छत्रपती संभाजीनगरातून आम्ही मागील ३८ वर्षांपासून पंढरपूरला दिंडीत जात आहोत. मधील दोन वर्षे कोरोनामुळे जाता आले नाही. १९ व्या दिवशी आम्ही पंढरपुरात पोहोचतो. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी आम्ही तिथे असतो. मंदिराबाहेर १२ ते २३ तास रांगेत उभे राहून जेव्हा विठ्ठलाचे दर्शन घडते, तो क्षण जीवनातील सर्वांत आनंदाचा ठरतो.- हरिश्चंद्र दांडगे, वारकरी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022spiritualअध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारी