शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूत कमाईचा लोभ नडला; दीड वर्षात अडकले ४१ पोलीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 19:16 IST

लाचेचे सापळे टाळण्यासाठी वाळूसंबंधी कोर्ट केसमध्ये ठाणेदारांनी हजर राहावे

औरंगाबाद : वाळूचे जप्त वाहन सोडविण्यासाठी वाहनमालकाच्या बाजूचा अहवाल न्यायालयात देण्यासाठी पोलीस पैशांची मागणी करतात आणि लाचेच्या जाळ्यात अडकतात. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये दीड वर्षात वाळू प्रकरणात ७ अधिकाऱ्यांसह ४१ पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यामुळे पोलिसांवरील लाचखोरीचे गुन्हे रोखण्यासाठी वाळू, अपघातातील वाहने सोडण्यासंदर्भात ठाणेदारांनी स्वत: न्यायालयात उत्तर दाखल करावे, असे निर्देश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंगल यांनी दिले.

लाचखोर सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडले जाते. बऱ्याचदा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आपल्या मागावर असल्याचा संशय आल्यानंतर सरकारी अधिकारी, कर्मचारी लाचेची मागणी केल्यानंतर रक्कम स्वीकारत नाही. तरीसुद्धा संबंधितांवर गुन्हा नोंदविला जातो. लाचखोरीत पोलीस विभागाचा दुसरा क्रमांक आहे. औरंगाबाद परिक्षेत्रातील औरंगाबाद ग्रामीणमध्ये यावर्षी १ अधिकारी आणि १२ पोलीस कर्मचारी लाच घेताना पकडले गेले. जालना जिल्ह्यात ३ अधिकारी आणि ९ पोलीस कर्मचारी तर बीड जिल्ह्यात १ पोलीस अधिकारी आणि ५ कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात २ पोलीस अधिकारी आणि ८ कर्मचाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. दीड वर्षाच्या कालावधीत एकूण ४२ पोलीस अधिकारी कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेले बहुतांश पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाळूचे जप्त वाहन सोडविण्यासाठी पैशांची मागणी केल्याचे समोर आले. 

या पार्श्वभूमीवर औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंगल यांनी परिक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून पोलीस विभागातील लाचखोरी रोखण्यासाठी निर्देश दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसार अपघात अथवा वाळूचे जप्त वाहन सोडविण्यासंदर्भात पोलिसांना म्हणणे सादर करण्याविषयी न्यायालयाचे आदेश ठाणेदारांनी स्वत:कडे घ्यावेत आणि स्वत: अथवा त्यांच्या लेखनिकामार्फत याविषयी न्यायालयात म्हणणे सादर करावे, अशी सूचना केली.

प्रलंबित प्रकरणाचा आढावा घ्यावाबऱ्याचदा न्यायालयाकडून आलेल्या आदेशानुसार तातडीने आपले म्हणणे मांडणे संबंधित ठाणेप्रमुखांचे कर्तव्य असते. मात्र, जोपर्यंत वाहनमालक येऊन भेटत नाही तोपर्यंत संबंधित तपास अधिकारी त्यांचे म्हणणे न्यायालयात सादर करीत नाही. यातूनच पुढे लाचखोरीचा जन्म होतो. हे प्र्रकार रोखण्यासाठी अशा प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेण्याचे निर्देशही विशेष पोलीस महानिरीक्षक सिंगल यांनी दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक