शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

वर्षाला ४० जणांचा आवाज होतोय गप्प; स्वर यंत्राच्या कर्करोगाचा ओरडून व्यवसाय करणाऱ्यांना धोका

By संतोष हिरेमठ | Updated: June 21, 2023 13:56 IST

स्वर यंत्र हे श्वासनलिकेवर असल्यामुळे शरीरातील अनेक महत्त्वाच्या क्रियांमध्ये त्याचा सहभाग असतो.

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा आवाज हा आवडीचा असतो. एकाने आवाज दिल्यानंतर त्याला दुसरा व्यक्ती प्रतिसाद देतो; परंतु वर्षाला जवळपास ४० जणांचा आवाजच गप्प होताे. कारण स्वर यंत्राचा कर्करोग. एकट्या शासकीय कर्करोग रुग्णालयात वर्षभरात किमान ४० जणांवर स्वर यंत्र काढण्याची शस्त्रक्रिया होतात. चिंताजनक म्हणजे शिक्षक, गायक, ओरडून व्यवसाय करणाऱ्यांच्या स्वर यंत्रावर सर्वाधिक ताण पडत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

स्वर यंत्र हे श्वासनलिकेवर असल्यामुळे शरीरातील अनेक महत्त्वाच्या क्रियांमध्ये त्याचा सहभाग असतो. श्वास घेण्याच्या अथवा सोडण्याच्या स्थितीमध्ये स्वर तारा पूर्णपणे एकमेकींपासून लांब जाऊन श्वासनलिका पूर्ण उघडी करतात. त्यामुळे व्यक्ती विना अडथळा श्वास घेतो. या उलट गिळताना किंवा आवाजाची निर्मिती करताना स्वर तारा एकमेकींच्या जवळ येऊन श्वासनलिका पूर्ण बंद करतात. स्वर तंतूंच्या या हालचालींमध्ये थोडादेखील बदल झाल्यास त्याचा परिणाम श्वास घेण्यावर, गिळण्यावर किंवा आवाजाच्या निर्मितीवर होतो. त्यामुळे स्वर यंत्राची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

कोणाला धोका? काही व्यसन असेल तर कर्करोग होतो, असा सामान्यपणे समज आहे. धूम्रपान, मद्यपानासह अनेक कारणांनी स्वर यंत्राचा कर्करोग होऊ शकतो. पण, इतर निर्व्यसनी लोकांनाही तो होऊ शकतो. उच्चार करणे आणि श्वास घेणे हे स्वर यंत्राचे कार्य आहे. स्वर यंत्राचा कर्करोग झाला की, ही कार्य करायला त्रास होतो.

या लक्षणांकडे दुर्लक्ष नको- अचानक आवाज घोगरा होणे.- आवाज बंद होणे.- आवाज बारीक होणे.

...तर फक्त रेडिएशनअगदी सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले तर केवळ रेडिएशनची गरज पडते. त्यातून आवाज पूर्वीप्रमाणे होऊ शकतो. शिक्षक, गायक, ओरडून व्यवसाय करणाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे.- डाॅ. बालाजी शेवाळकर, रेडिओथेरपी विभागप्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय.

जवळपास १५ जणांना कृत्रिम स्वर यंत्रकर्करोग ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर स्वर यंत्र काढावे लागते. वर्षभरात ३० ते ४० रुग्णांचे स्वर यंत्र काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते. तर जवळपास १५ जणांना कृत्रिम स्वर यंत्र बसविले जाते. स्वर यंत्राच्या आराेग्यासाठी भरपूर पाणी पिले पाहिजे. सतत बोलण्याचे काम असेल तर पुरेशी विश्रांतीही घेतली पाहिजे.- डाॅ. महेंद्र कटरे, शासकीय कर्करोग रुग्णालय

आवाजाचा योग्य वापर करावाआवाजाचा योग्य वापर केला पाहिजे. सतत मोठ्याने बोलल्यामुळे स्वर यंत्रावर परिणाम होतो. मोठ्याने बोलल्याने स्वर यंत्राचा कर्करोग होतो, हे अजून तरी सिद्ध झालेले नाही. परंतु तंबाखू, धुम्रपान याबाबी त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.- डाॅ. सुनील देशमुख, कान-नाक- घसा विभागप्रमुख, घाटी

टॅग्स :cancerकर्करोगAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य