शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वर्षाला ४० जणांचा आवाज होतोय गप्प; स्वर यंत्राच्या कर्करोगाचा ओरडून व्यवसाय करणाऱ्यांना धोका

By संतोष हिरेमठ | Updated: June 21, 2023 13:56 IST

स्वर यंत्र हे श्वासनलिकेवर असल्यामुळे शरीरातील अनेक महत्त्वाच्या क्रियांमध्ये त्याचा सहभाग असतो.

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा आवाज हा आवडीचा असतो. एकाने आवाज दिल्यानंतर त्याला दुसरा व्यक्ती प्रतिसाद देतो; परंतु वर्षाला जवळपास ४० जणांचा आवाजच गप्प होताे. कारण स्वर यंत्राचा कर्करोग. एकट्या शासकीय कर्करोग रुग्णालयात वर्षभरात किमान ४० जणांवर स्वर यंत्र काढण्याची शस्त्रक्रिया होतात. चिंताजनक म्हणजे शिक्षक, गायक, ओरडून व्यवसाय करणाऱ्यांच्या स्वर यंत्रावर सर्वाधिक ताण पडत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

स्वर यंत्र हे श्वासनलिकेवर असल्यामुळे शरीरातील अनेक महत्त्वाच्या क्रियांमध्ये त्याचा सहभाग असतो. श्वास घेण्याच्या अथवा सोडण्याच्या स्थितीमध्ये स्वर तारा पूर्णपणे एकमेकींपासून लांब जाऊन श्वासनलिका पूर्ण उघडी करतात. त्यामुळे व्यक्ती विना अडथळा श्वास घेतो. या उलट गिळताना किंवा आवाजाची निर्मिती करताना स्वर तारा एकमेकींच्या जवळ येऊन श्वासनलिका पूर्ण बंद करतात. स्वर तंतूंच्या या हालचालींमध्ये थोडादेखील बदल झाल्यास त्याचा परिणाम श्वास घेण्यावर, गिळण्यावर किंवा आवाजाच्या निर्मितीवर होतो. त्यामुळे स्वर यंत्राची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

कोणाला धोका? काही व्यसन असेल तर कर्करोग होतो, असा सामान्यपणे समज आहे. धूम्रपान, मद्यपानासह अनेक कारणांनी स्वर यंत्राचा कर्करोग होऊ शकतो. पण, इतर निर्व्यसनी लोकांनाही तो होऊ शकतो. उच्चार करणे आणि श्वास घेणे हे स्वर यंत्राचे कार्य आहे. स्वर यंत्राचा कर्करोग झाला की, ही कार्य करायला त्रास होतो.

या लक्षणांकडे दुर्लक्ष नको- अचानक आवाज घोगरा होणे.- आवाज बंद होणे.- आवाज बारीक होणे.

...तर फक्त रेडिएशनअगदी सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले तर केवळ रेडिएशनची गरज पडते. त्यातून आवाज पूर्वीप्रमाणे होऊ शकतो. शिक्षक, गायक, ओरडून व्यवसाय करणाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे.- डाॅ. बालाजी शेवाळकर, रेडिओथेरपी विभागप्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय.

जवळपास १५ जणांना कृत्रिम स्वर यंत्रकर्करोग ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर स्वर यंत्र काढावे लागते. वर्षभरात ३० ते ४० रुग्णांचे स्वर यंत्र काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते. तर जवळपास १५ जणांना कृत्रिम स्वर यंत्र बसविले जाते. स्वर यंत्राच्या आराेग्यासाठी भरपूर पाणी पिले पाहिजे. सतत बोलण्याचे काम असेल तर पुरेशी विश्रांतीही घेतली पाहिजे.- डाॅ. महेंद्र कटरे, शासकीय कर्करोग रुग्णालय

आवाजाचा योग्य वापर करावाआवाजाचा योग्य वापर केला पाहिजे. सतत मोठ्याने बोलल्यामुळे स्वर यंत्रावर परिणाम होतो. मोठ्याने बोलल्याने स्वर यंत्राचा कर्करोग होतो, हे अजून तरी सिद्ध झालेले नाही. परंतु तंबाखू, धुम्रपान याबाबी त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.- डाॅ. सुनील देशमुख, कान-नाक- घसा विभागप्रमुख, घाटी

टॅग्स :cancerकर्करोगAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य