शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

परीक्षा शुल्काचे ४ कोटी ५४ लाख महाविद्यालयांनी हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:20 IST

शासनाकडून ४ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्राप्त झाला होता. हा निधी विद्यापीठाने महाविद्यालयांना पाठविला. मात्र, हा निधी महाविद्यालयांनी हडप केल्याचा आरोप मराठवाडा लॉ कृती समितीने केला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे राज्य सरकारने २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला होता. यानुसार शासनाकडून ४ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्राप्त झाला होता. हा निधी विद्यापीठाने महाविद्यालयांना पाठविला. मात्र, हा निधी महाविद्यालयांनी हडप केल्याचा आरोप मराठवाडा लॉ कृती समितीने केला आहे.

महाविद्यालयांनी परीक्षा शुल्काच्या मिळालेल्या निधीचे वाटप विद्यार्थ्यांना केले नाही. तसेच शासनालाही परत पाठविला नाही. सर्व निधी महाविद्यालयांकडेच अखर्चित आहे. या निधीचे महाविद्यालयांनी काय केले, याची माहितीही संबंधितांकडे उपलब्ध नाही. ही रक्कम हडप करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांना देण्यात आले. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे पैसे संबंधितांना देण्याची जबाबदारी महाविद्यालयांची असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उच्चशिक्षण विभागाची असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या पैशांचा योग्य तो शोध घेऊन संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांना त्याचे १५ दिवसांत वाटप करण्यात यावे, अन्यथा विद्यापीठ, महाविद्यालय आणि उच्चशिक्षण विभागाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नवनाथ देवकते, राम टकले, रवी गिते, विश्वजित बडे, अजहर पटेल, अश्फाक पठाण, ऋषभ लोहाडे, सुदर्शन धुमक, मनोहर जाधव, मनीषा हाडे, कृष्णा साबळे, दीपक डोईफोडे, विजय काळे, शिल्पा मुंडे, ऋचा कुलकर्णी, अलका मुंडे, पराग रणदिवे, अजय मरसाळे यांच्या स्वाक्षºया आहेत.--------------

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद