शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

परीक्षा शुल्काचे ४ कोटी ५४ लाख महाविद्यालयांनी हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:20 IST

शासनाकडून ४ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्राप्त झाला होता. हा निधी विद्यापीठाने महाविद्यालयांना पाठविला. मात्र, हा निधी महाविद्यालयांनी हडप केल्याचा आरोप मराठवाडा लॉ कृती समितीने केला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे राज्य सरकारने २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला होता. यानुसार शासनाकडून ४ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्राप्त झाला होता. हा निधी विद्यापीठाने महाविद्यालयांना पाठविला. मात्र, हा निधी महाविद्यालयांनी हडप केल्याचा आरोप मराठवाडा लॉ कृती समितीने केला आहे.

महाविद्यालयांनी परीक्षा शुल्काच्या मिळालेल्या निधीचे वाटप विद्यार्थ्यांना केले नाही. तसेच शासनालाही परत पाठविला नाही. सर्व निधी महाविद्यालयांकडेच अखर्चित आहे. या निधीचे महाविद्यालयांनी काय केले, याची माहितीही संबंधितांकडे उपलब्ध नाही. ही रक्कम हडप करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांना देण्यात आले. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे पैसे संबंधितांना देण्याची जबाबदारी महाविद्यालयांची असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उच्चशिक्षण विभागाची असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या पैशांचा योग्य तो शोध घेऊन संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांना त्याचे १५ दिवसांत वाटप करण्यात यावे, अन्यथा विद्यापीठ, महाविद्यालय आणि उच्चशिक्षण विभागाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नवनाथ देवकते, राम टकले, रवी गिते, विश्वजित बडे, अजहर पटेल, अश्फाक पठाण, ऋषभ लोहाडे, सुदर्शन धुमक, मनोहर जाधव, मनीषा हाडे, कृष्णा साबळे, दीपक डोईफोडे, विजय काळे, शिल्पा मुंडे, ऋचा कुलकर्णी, अलका मुंडे, पराग रणदिवे, अजय मरसाळे यांच्या स्वाक्षºया आहेत.--------------

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद