शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

औरंगाबादमधील ३७७ मोबाईल टॉवर अनधिकृत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 17:36 IST

महानगरपालिका मूग गिळून

ठळक मुद्देमहापालिकेने केले कारवाईचे नाट्य कोट्यवधी रुपयांचा कर थकीत

औरंगाबाद : ग्राहकाचे नेट पॅक संपताच मध्यरात्रीपासून सेवा खंडित करण्याचे काम मोबाईल कंपन्या करतात. शंभर टक्के व्यावसायिक बनून काम करणाऱ्या कंपन्यांचे शहरात ३७७ मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ३० कोटींपेक्षा जास्तीची रक्कम मोबाईल कंपन्यांकडे थकीत असतानाही महापालिका अजिबात कारवाई करीत नाही. एक-दोन टॉवर सील करण्याचे नाट्य प्रशासनाकडून नेहमीच रंगविण्यात येते. मात्र, वसुलीसाठी ठोस कारवाई होत नाही, हे विशेष.

महापालिकेच्या नऊ झोन कार्यालयांतर्गत ४६३ मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. त्यातील ८६ मोबाईल टॉवरसाठी मनपाची परवानगी घेण्यात आली आहे. उर्वरित ३७७ टॉवर अनधिकृत आहेत. परवानगी घेतलेल्या टॉवरला जास्तीचा कर लावल्याचा आरोप सातत्याने मोबाईल कंपन्यांकडून करण्यात येत आहे. दरमहा कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या मोबाईल कंपन्या मनपाकडे कर भरायला तयार नाहीत. मोबाईल कंपन्या सर्वसामान्य ग्राहकांना नेटपॅक संपले की, एक सेकंदाचाही वेळ न लावता त्याची सेवा बंद करतात.या व्यावसायिक कंपन्या आहेत. मग त्यांनी पालिकेचा कर हा भरायलाच हवा, असे मत महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी माध्यमांसमोर व्यक्त केले. 

यापुढे मोबाईल कंपन्यांनी टॉवरच्या कराचा भरणा केला नाही, तर ते सील करण्याची कारवाई पालिकेकडून केली जाईल. अनधिकृत टॉवरच्या मालमत्ता कराची थकबाकी १९ कोटी ६२ लाख ५८ हजार रुपये आहे. चालू आर्थिक वर्षातील कर ११ कोटी ७६ लाख रुपये येणे अपेक्षित आहे. यापैकी ४ कोटी ३ लाख रुपये पाच कंपन्यांनी भरले आहेत. बाकी थकीत रक्कम जमा करण्यास मोबाईल कंपन्यांनी टाळाटाळ चालविली आहे. तब्बल २६ कोटी रुपये अजून येणे बाकी आहे. 

अनेकदा निव्वळ घोषणामोबाईल टॉवर हा विषय मनपातील अधिकारी, राजकीय मंडळींसाठी अलीकडे हिरवेगार कुरण बनले आहे. मागील दहा वर्षांमध्ये महापालिकेने मोबाईल कंपन्यांवर धाडसी कारवाई केली नाही. कारवाईचे निव्वळ नाट्य रंगविण्यात येते. मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी येऊन भेटल्यास कारवाईला स्थगिती देण्यात येते. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही मोबाईल कंपन्यांना मनपाकडूनच अभय देण्यात येत आहे.

एका कंपनीची न्यायालयात धावपालिकेने अनधिकृत टॉवरला दुप्पट कर आकारल्यावर आक्षेप घेत एका मोबाईल कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने संबंधित कंपनीच्या टॉवरला सील लावू नये म्हणून नुकतीच स्थगिती दिली आहे. याप्रकरणी महापौरांनी कर निर्धारक व संकलक अधिकारी करणकुमार चव्हाण, विधि सल्लागार अपर्णा थेटे यांना न्यायालयात योग्य बाजू मांडण्याच्या सूचना केल्या. इतर कंपन्यांचे मोबाईल टॉवर युद्धपातळीवर सील करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरAurangabadऔरंगाबादMobileमोबाइल