शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

३७ प्रवासी बालंबाल बचावले

By admin | Updated: September 25, 2016 23:57 IST

जालना : खराब रस्त्यांमुळे अपघात होण्याबरोबरच बसेसचे नुकसान होत आहे. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत असून, खडतर प्रवास करावा लागत आहे

जालना : खराब रस्त्यांमुळे अपघात होण्याबरोबरच बसेसचे नुकसान होत आहे. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत असून, खडतर प्रवास करावा लागत आहे. हाच धागा पकडून रस्ते दुरूस्ती करण्यासंदर्भात जालना आगारप्रमुखांनी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. परंतु अद्याप याची दखल घेतलेली नाही. जिल्ह्यात खराब रस्त्यांमुळे आजही अनेक ठिकाणी बससेवा पोहचली नाही. तर दुसऱ्या बाजूला प्रवाशांच्या सेवेसाठी नाईलाजास्तव रापमला खड्डेमय रस्त्यांवरून बसेस सोडण्याची वेळ आली आहे. परंतु यामुळे बसेस पंक्चर होणे, स्टेअरींग रॉड तुटने, पत्र्यांचे रिबीट तुटने, आसण व्यवस्था खिळखिळी होणे, बोल्ट निकामी होणे, डिझेल टँकला धोका पोहचणे यासह अनेक समस्यांमुळे प्रवाशांना नेहमी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या खराब रस्त्यांबाबत राज्य परिवहन महामंडळाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु त्यांनी याची गांभीर्याने कधीच दखल घेतली नाही. सा.बां.विभागाच्या दुर्लक्षामुळेच आज प्रवाशांना खडतर प्रवास करण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी) सोलापूर-औरंगाबार महामार्गावर महाकाळा पाटीजवळ दोन दिवसांपूर्वीच खड्डयांमध्ये बस आदळल्याने स्टेअरींग रॉड तुटून बस महामार्गालगतच्या खड्डयांत जाऊन पलटी झाली होती. परंतु बसेसचा वेग नियंत्रणात असल्याने सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. या बसेसमधील ३७ प्रवासी या अपघातात बालंबाल बचावले होते. यापूर्वीही खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात झालेले असतानाही रस्ते दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे.