शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

३७ प्रवासी बालंबाल बचावले

By admin | Updated: September 25, 2016 23:57 IST

जालना : खराब रस्त्यांमुळे अपघात होण्याबरोबरच बसेसचे नुकसान होत आहे. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत असून, खडतर प्रवास करावा लागत आहे

जालना : खराब रस्त्यांमुळे अपघात होण्याबरोबरच बसेसचे नुकसान होत आहे. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत असून, खडतर प्रवास करावा लागत आहे. हाच धागा पकडून रस्ते दुरूस्ती करण्यासंदर्भात जालना आगारप्रमुखांनी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. परंतु अद्याप याची दखल घेतलेली नाही. जिल्ह्यात खराब रस्त्यांमुळे आजही अनेक ठिकाणी बससेवा पोहचली नाही. तर दुसऱ्या बाजूला प्रवाशांच्या सेवेसाठी नाईलाजास्तव रापमला खड्डेमय रस्त्यांवरून बसेस सोडण्याची वेळ आली आहे. परंतु यामुळे बसेस पंक्चर होणे, स्टेअरींग रॉड तुटने, पत्र्यांचे रिबीट तुटने, आसण व्यवस्था खिळखिळी होणे, बोल्ट निकामी होणे, डिझेल टँकला धोका पोहचणे यासह अनेक समस्यांमुळे प्रवाशांना नेहमी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या खराब रस्त्यांबाबत राज्य परिवहन महामंडळाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु त्यांनी याची गांभीर्याने कधीच दखल घेतली नाही. सा.बां.विभागाच्या दुर्लक्षामुळेच आज प्रवाशांना खडतर प्रवास करण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी) सोलापूर-औरंगाबार महामार्गावर महाकाळा पाटीजवळ दोन दिवसांपूर्वीच खड्डयांमध्ये बस आदळल्याने स्टेअरींग रॉड तुटून बस महामार्गालगतच्या खड्डयांत जाऊन पलटी झाली होती. परंतु बसेसचा वेग नियंत्रणात असल्याने सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. या बसेसमधील ३७ प्रवासी या अपघातात बालंबाल बचावले होते. यापूर्वीही खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात झालेले असतानाही रस्ते दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे.