शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर फवारणी करताना औरंगाबाद जिल्ह्यात ३७ शेतकऱ्यांना बाधा; पिके वाचविण्यासाठी बळीराजाचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 13:38 IST

पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना तब्बल ३७ शेतकऱ्यांना बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी आणि अन्य कारणांमुळे पिकांवर कि डींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कीटकनाशके फवारली जातात.फवारणी करताना जहाल कीटकनाशकांची बळीराजालाच बाधा होत आहे

औरंगाबाद : दुष्काळ, कर्जाचा डोंगर आणि पावसाचा लहरीपणा अशा अनेक संकटांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव शेतातील पिके वाचविण्याच्या प्रयत्नात धोक्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना तब्बल ३७ शेतकऱ्यांना बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पावसाअभावी आणि अन्य कारणांमुळे पिकांवर कि डींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कीटकनाशके फवारली जातात. पिक ांवरील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी नवनवीन कीटकनाशके वापरात. ही फवारणी शेतकऱ्यांसाठी जीवघेणी ठरू पाहत आहे. फवारणी करताना जहाल कीटकनाशकांची बळीराजालाच बाधा होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. पिकांवरील फवारणीनंतर अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात धाव घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. फवारणी करताना श्वासाद्वारे कीटकनाशक शरीरात जाते; परंतु ते वेळीच लक्षात येत नाही. उलटी, मळमळ अशा त्रासानंतर कीटकनाशकाची बाधा झाल्याचे निदर्शनास येत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत तब्बल ३७ शेतकऱ्यांना फवारणीदरम्यान कीटकनाशकाची बाधा झाली. या सर्वांवर उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांत उपचार करण्यात आले. सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात सर्वाधिक १२ शेतकऱ्यांवर उपचार करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. ही सर्व आकडेवारी सरकारी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही अनेकांनी उपचार घेतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कीटकनाशकाची बाधा झाल्यानंतर उलटी, मळमळ, चक्कर येणे, डोळ्यांना जळजळ हा त्रास सुरू होतो. फवारणी करताना तोंडाला कापड लावले तर श्वास घेता येत नाही. बूट घातले, तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राज्यातील शेती पिकावर कीटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आरोग्य प्रमाणपत्र देण्याची सूचना करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत.जिल्ह्यातील परिस्थिती जिल्ह्यात फवारणीदरम्यान कीटकनाशकाची बाधा झाल्यानंतर उपचार घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या अशी आहे. गंगापूर उपजिल्हा रुग्णालय-३, वैजापूर उपजिल्हा रुग्णालय-१, सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय-१२, ग्रामीण रुग्णालय कन्नड-३,  फुलंब्री-१, पिशोर-३, अजिंठा-३, सोयगाव-६, पाचोड-२, करमाड-२, बिडकीन-१.

अशी घ्यावी खबरदारीपिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी. कीटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावेत. हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल, तोंडाला मास्क अथवा रुमाल या साहित्यांचा वापर करावा.  फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा नेमून दिलेल्या मापानुसार घ्यावी. कीटकनाशकाचे डबे सुरक्षितरीत्या नष्ट केले पाहिजेत.

काळजी घ्यावीपिकांवर कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. वाऱ्याची दिशा पाहून कीटकनाशक श्वासाद्वारे शरीरात जाणार नाही, याची काळजी घेण्यावर भर द्यावा. कीटकनाशकाची बाधा झाल्यास तात्काळ ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावेत.-एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रhospitalहॉस्पिटल