शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

औरंगाबादमधील ५३ पैकी ३१ वाहतूक सिग्नल बंद; दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 19:57 IST

सुरू असलेल्या २२ सिग्नलचे टाईमर बंद पडल्याचे समोर आले. 

ठळक मुद्दे सायंकाळी ६ ते ८ दरम्यान सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णयवाहतूक नियमन करण्यासाठी पोलीस विभागाची स्वतंत्र वाहतूक शाखा

औरंगाबाद :  शहरातील वाहतूक नियमन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी तब्बल ५३ चौकांत  वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत. या सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेली महापालिका या सिग्नलविषयी काहीही देणे घेणे नाही, असा व्यवहार करीत असते. परिणामी शहरातील तब्बल ३१ सिग्नल बंद पडले आहेत तर सुरू असलेल्या २२ सिग्नलचे टाईमर बंद पडल्याचे समोर आले. 

शहरातील वाहतूक नियमन करण्यासाठी पोलीस विभागाची स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यरत आहे. वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेने शहरातील तब्बल ५३ चौकांत वाहतूक सिग्नल बसविले आहेत. शहरात नुकतेच रुजू झालेले वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस  आयुक्त सुरेश वानखेडे यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला तेव्हा ५३ पैकी केवळ २२ सिग्नल सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या सिग्नलचेही टाईमर नादुरुस्त असल्याचे त्यांना दिसले. या सिग्नलची दुरुस्ती तातडीने करावी याकरिता त्यांनी मनपा शहर अभियंता कोल्हे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना सोबत  घेऊन शहरातील चौकातील वाहतूक समस्येची पाहणी केली. 

जालना रोडवरील वाहतूक विना अडथळा सुरळीत सुरू राहावी याकरिता शासकीय दूध डेअरी चौकाप्रमाणे  आकाशवाणी चौकातील वाहतूक सिग्नल सायंकाळी ६ ते ८ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.  या निर्णयाची २१ ते २७  नोव्हेंबर या कालावधीत प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी होत आहे. शहरातील वाहतूक नियमन करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होताना दिसते. सिग्नल बंद असल्यामुळे पोलिसांना हाताने आणि शिटी वाजवून वाहतूक नियमन करावे लागते. परंतु सिग्नल जर व्यवस्थित सुरू असेल तर वाहतूक पोलिसाला दिलासा मिळतो आणि सिग्नल तोडून पळणाऱ्यांची संख्याही कमी होते. शिवाय नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे पोलिसांना शक्य होते. 

सर्व सिग्नल सुरु ठेवणे आवश्यक शहरातील रस्ते जैसे थे आहेत. वाहने मात्र प्रचंड वाढली आहेत. यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्व वाहतूक सिग्नल सुरू ठेवणे आवश्यक आहे. - सुरेश वानखेडे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक.  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी