शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

३०७ गावे तर २०३ वाड्यांवर टँकरने पाणी

By admin | Updated: May 13, 2015 00:28 IST

बीड : जिल्ह्यात ३८१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून यामध्ये ३०७ गावे तर २०३ वाड्यांचा समावेश आहे. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भीक्ष वाढत आहे.

बीड : जिल्ह्यात ३८१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून यामध्ये ३०७ गावे तर २०३ वाड्यांचा समावेश आहे. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भीक्ष वाढत आहे. जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ८६ टँकर सुरू आहेत. आजघडीला जिल्ह्यात पाच लाख ६२ हजार ७०७ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी पेक्षा यंदा टंचाईची तीव्रता जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या गावांमध्ये ३०७ गावे व २०३ वाड्यांचा समावेश आहे. यामध्ये बीड तालुक्यात ७३ गावे तर १९ वाड्या आहेत. या शिवाय ६२६ विहिरी व बोअर यांचे शासनाने अधिग्रहण केले आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खालावली जात असल्याने फेब्रुवारी- मार्च दरम्यान अधिग्रहीत केलेल्या काही विहिरींचे जलस्त्रोत आटत आहेत. यामुळे नवीन उद्भव शोधण्याचे आव्हान संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांपुढे उभे ठाकले आहे. मंगळवारपर्यंत २५ च्या जवळपास गावांमधून टँकरची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पाणीपुरवठ्याची योजना राबविलेल्या गावांमधूनही टँकरची मागणी होत आहे. एप्रिलमध्ये राज्याच्या प्रधानसचिवांनी टंचाईबाबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी ज्या गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या योजना राबविलेल्या आहेत. त्या गावांमधून टँकरची मागणी होतेच कशी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. सध्या अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे. बहुतांश गावात यापूर्वी पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाण्याचे दुर्भीक्ष आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. मात्र कार्यकर्ते आमदारांच्या शिफारशी आणून टँकर मंजुरीसाठी दबाव टाकत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.