शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

३०७ गावे तर २०३ वाड्यांवर टँकरने पाणी

By admin | Updated: May 13, 2015 00:28 IST

बीड : जिल्ह्यात ३८१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून यामध्ये ३०७ गावे तर २०३ वाड्यांचा समावेश आहे. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भीक्ष वाढत आहे.

बीड : जिल्ह्यात ३८१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून यामध्ये ३०७ गावे तर २०३ वाड्यांचा समावेश आहे. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भीक्ष वाढत आहे. जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ८६ टँकर सुरू आहेत. आजघडीला जिल्ह्यात पाच लाख ६२ हजार ७०७ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी पेक्षा यंदा टंचाईची तीव्रता जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या गावांमध्ये ३०७ गावे व २०३ वाड्यांचा समावेश आहे. यामध्ये बीड तालुक्यात ७३ गावे तर १९ वाड्या आहेत. या शिवाय ६२६ विहिरी व बोअर यांचे शासनाने अधिग्रहण केले आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खालावली जात असल्याने फेब्रुवारी- मार्च दरम्यान अधिग्रहीत केलेल्या काही विहिरींचे जलस्त्रोत आटत आहेत. यामुळे नवीन उद्भव शोधण्याचे आव्हान संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांपुढे उभे ठाकले आहे. मंगळवारपर्यंत २५ च्या जवळपास गावांमधून टँकरची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पाणीपुरवठ्याची योजना राबविलेल्या गावांमधूनही टँकरची मागणी होत आहे. एप्रिलमध्ये राज्याच्या प्रधानसचिवांनी टंचाईबाबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी ज्या गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या योजना राबविलेल्या आहेत. त्या गावांमधून टँकरची मागणी होतेच कशी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. सध्या अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे. बहुतांश गावात यापूर्वी पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाण्याचे दुर्भीक्ष आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. मात्र कार्यकर्ते आमदारांच्या शिफारशी आणून टँकर मंजुरीसाठी दबाव टाकत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.