शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

३०७ गावे तर २०३ वाड्यांवर टँकरने पाणी

By admin | Updated: May 13, 2015 00:28 IST

बीड : जिल्ह्यात ३८१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून यामध्ये ३०७ गावे तर २०३ वाड्यांचा समावेश आहे. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भीक्ष वाढत आहे.

बीड : जिल्ह्यात ३८१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून यामध्ये ३०७ गावे तर २०३ वाड्यांचा समावेश आहे. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भीक्ष वाढत आहे. जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ८६ टँकर सुरू आहेत. आजघडीला जिल्ह्यात पाच लाख ६२ हजार ७०७ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी पेक्षा यंदा टंचाईची तीव्रता जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या गावांमध्ये ३०७ गावे व २०३ वाड्यांचा समावेश आहे. यामध्ये बीड तालुक्यात ७३ गावे तर १९ वाड्या आहेत. या शिवाय ६२६ विहिरी व बोअर यांचे शासनाने अधिग्रहण केले आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खालावली जात असल्याने फेब्रुवारी- मार्च दरम्यान अधिग्रहीत केलेल्या काही विहिरींचे जलस्त्रोत आटत आहेत. यामुळे नवीन उद्भव शोधण्याचे आव्हान संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांपुढे उभे ठाकले आहे. मंगळवारपर्यंत २५ च्या जवळपास गावांमधून टँकरची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पाणीपुरवठ्याची योजना राबविलेल्या गावांमधूनही टँकरची मागणी होत आहे. एप्रिलमध्ये राज्याच्या प्रधानसचिवांनी टंचाईबाबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी ज्या गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या योजना राबविलेल्या आहेत. त्या गावांमधून टँकरची मागणी होतेच कशी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. सध्या अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे. बहुतांश गावात यापूर्वी पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाण्याचे दुर्भीक्ष आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. मात्र कार्यकर्ते आमदारांच्या शिफारशी आणून टँकर मंजुरीसाठी दबाव टाकत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.