शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडे ३ हजार कोटी बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:45 IST

औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत ३ लाख ४० हजार ८०४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे २ हजार ७६१ कोटी ५७ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. कृषिपंपांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी महावितरणने यापूर्वी अनेकदा राबविलेल्या कृषी संजीवनी योजनेलाही शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी महावितरणने १० हजार ५४० कृषिपंपांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केला आहे.

ठळक मुद्देमहावितरण : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांत प्रचंड उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत ३ लाख ४० हजार ८०४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे २ हजार ७६१ कोटी ५७ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. कृषिपंपांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी महावितरणने यापूर्वी अनेकदा राबविलेल्या कृषी संजीवनी योजनेलाही शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी महावितरणने १० हजार ५४० कृषिपंपांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केला आहे.यासंदर्भात औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, कृषिपंपांना सवलतीच्या व नाममात्र दरात वीजपुरवठा केला जातो. तरीही अनेक शेतकरी वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वीज बिलाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असून, महावितरणला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.कृषिपंपांकडे असलेली वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी सातत्याने मोहिमा राबविल्या जातात; पण अपेक्षित थकबाकी व वीज बिलांची वसुली होत नाही, तर दुसरीकडे वीज खरेदी, पुरवठा यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती, कर्मचाºयांवर महावितरणला खर्च करावा लागतो.वीज खरेदीसाठी पूर्वीसारखी उधारीची परिस्थिती राहिलेली नाही. वेळच्या वेळी वीज खरेदीचे बिल महावितरणला चुकते करावे लागते.औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. त्यामुळे कृषी संजीवनी ही व्याज व दंडाची ५० टक्के रक्कम माफ करणाºया योजनेला मुदतवाढ मिळते का, याकडे आमचे लक्ष आहे. सध्या केवळ घरगुती, व्यापारी, औद्योगिक, पाणीपुरवठा, आदी ग्राहकाचीे थकबाकी वसुलीला प्राधान्य दिले असून, वीज चोरी व गळती रोखण्यावर भर आहे.दोन जिल्ह्यांतील कृषिपंपांची सद्य:स्थितीऔरंगाबाद परिमंडळात औरंगाबाद शहर मंडळ, औरंगाबाद ग्रामीण मंडळ आणि जालना मंडळाचा समावेश आहे. औरंगाबाद शहर मंडळामध्ये सध्या २ हजार १४२ कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरू असून, त्यांच्याकडे १७ कोटी ५९ लाख रुपये थकबाकी आहे, तर कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या कृषिपंपांची संख्या ४८५ एवढी असून, त्यांच्याकडे १ कोटी ९ लाख रुपये थकबाकी आहे.औरंगाबाद ग्रामीण मंडळात वीजपुरवठा चालू असलेले २ लाख १५ हजार ४८४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे १,६१९ कोटी २३ लाख रुपये थकबाकी आहे, तर कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या कृषिपंपांची संख्या ७ हजार ८६८ एवढी असून, त्यांच्याकडे १३ कोटी ७७ लाख रुपये थकबाकी आहे.जालना मंडळात सध्या वीजपुरवठा चालू असलेले १ लाख २३ हजार १७८ कृषिपंप असून, त्यांच्याकडे १ हजार १२४ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी आहे, तर कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेले २ हजार १८७ कृषिपंप असून, त्यांच्याकडे ३ कोटी ८ लाख रुपये थकबाकी आहे.दोन्ही जिल्ह्यांतील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या कृषिपंपांची संख्या १० हजार ५४० एवढी असून, त्यांच्याकडे १७ कोटी ९४ लाख रुपये थकबाकी आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र