शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

२७१ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:26 IST

लाभक्षेत्रातील सिंचन आणि बिगर सिंचन मिळून तब्बल २७१ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यामध्ये सिंचनाची १०० कोटी, तर पाणीपुरवठा योजनांची तब्बल १७१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लाभक्षेत्रातील सिंचन आणि बिगर सिंचन मिळून तब्बल २७१ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यामध्ये सिंचनाची १०० कोटी, तर पाणीपुरवठा योजनांची तब्बल १७१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा)अंतर्गत धरणांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामध्ये पाणी सोडण्यापासून ते पाणीपट्टी वसुलीची कामे होतात. गेल्या काही वर्षांत केवळ चालू पाणीपट्टीकडे कल आहे. जुन्या थकबाकीकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. मोठे, मध्यम आणि लघु अशा प्रकल्पांद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याची थकबाकी वर्षानुवर्षे तशीच राहत आहे. दरवर्षी मार्च अखेरीस वसुलीवर अधिक भर देण्यात येतो. गतवर्षी ४० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यामध्ये ९५ टक्के म्हणजे ३८ कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली. यामध्ये अनेक कारणांमुळे जुनी थकबाकी वसूल होत नसल्याची परिस्थिती आहे. चालू पाणीपट्टी वसुलीवरच भर दिला जात आहे. उद्योग आणि घरगुती वापरासाठी दिलेल्या पाण्याच्या शुल्काची (पाणीपट्टी) तुलनेत बरी आहे; परंतु सिंचनासाठीची पाणीपट्टी कमी प्रमाणात वसूल होत आहे. ‘कडा’ कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद मनपाकडे ३१ मे अखेर तब्बल ६ कोटी १५ लाख ७ हजार रुपये पाणीपट्टी थकीत आहे. याबरोबर औद्योगिक वापरापोटी २ कोटी १२ लाख १९ हजार रुपयांची थकबाकी आहे. वाळूज एमआयडीसीकडे १२ कोटी ४७ लाख ४७ हजार रुपये पाणीपट्टी थकीत आहे.

टॅग्स :billबिलWaterपाणी