शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मराठवाड्यातील २७ तालुक्यांना दुष्काळाची कळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:15 IST

: मराठवाड्यातील ७६ पैकी २७ तालुक्यांत दुष्काळाची दुसरी कळ (ट्रिगर) लागू झाल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. २७ तालुक्यांत गंभीर, तर १४ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे सरकारी जुमला : शास्त्रीय पद्धतीच्या मूल्यांकनामुळे नुकसान होण्याची दाट शक्यता

औरंगाबाद : मराठवाड्यातील ७६ पैकी २७ तालुक्यांत दुष्काळाची दुसरी कळ (ट्रिगर) लागू झाल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. २७ तालुक्यांत गंभीर, तर १४ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शास्त्रीय मूल्यांकनाआधारे दुष्काळ पाहण्याच्या सरकारी पद्धतीमुळे विभागातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.महाराष्ट्र सुदूर संवेदन यंत्रणे(एमआरसॅक)कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांची यादी राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने जाहीर केली आहे. एमआरसॅक सॅटेलाईटनुसार काम करणारी यंत्रणा आहे. त्याआधारे शासनाने मराठवाड्यातील २७ तालुक्यांना दुसरी कळ लागू केली आहे. गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ त्याअंतर्गत विचारात घेतला गेला आहे.दुष्काळ मोजण्यासाठी कळ जी लावली आहे, ती तालुक्याला लावली आहे. तालुक्याच्या विवरणानुसार दुष्काळाचे मूल्यमापन कसे होणार. कोणत्याही तालुक्याचे उदाहरण घेतले, तर असे दिसते की, तेथे पाण्याखाली १० टक्के किती गावे असतील. उर्वरित ९० टक्के गावे कशी मोजणार याची अडचण येत आहे. मंडळनिहाय, सजानिहाय गावांची अवस्था पाहिली जात नाही. शितावरून भाताची परीक्षा अशा पद्धतीने दुष्काळाचे मूल्यमापन होत असल्याचा आरोप होतो आहे.दुष्काळाची दुसरी कळ अशीऔरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर या तालुक्यांत गंभीर दुष्काळ आहे, तर कन्नड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे.बीड जिल्ह्यातील आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर, वडवणी तालुक्यांत गंभीर, तर अंबाजोगई, केज, परळी, पाटोदा तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे.हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगावमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे.जालना जिल्ह्यातील अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी तालुक्यांत गंभीर स्वरूपाची, तर जाफ्राबाद, जालना आणि परतूर तालुक्यांत मध्यम स्वरूपाची दुष्काळ परिस्थिती आहे.परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सोनपेठमध्ये गंभीर दुष्काळी स्थिती आहे, तर पालम, परभणी, सेलू तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे सांगण्यात आले.नांदेड जिल्ह्यातील मुखेड, उमरी तालुक्यांत गंभीर, तर देगलूर तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.लातूर, उस्मानाबाद सुजलाम्...सुफलाम्लातूर आणि उस्मानाबाद हे दोन्ही जिल्हे सुजलाम् सुफलाम् असल्याचे दुष्काळच्या दुसºया कळीनुसार सांगण्यात येत आहे. लातूरमधील शिरूर अनंतपाळ परिसरात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे, तर उस्मानाबादमधील लोहारा भागात तशीच स्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाdroughtदुष्काळ