शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

हिरडपुरी बंधाऱ्यातून २६७६१ क्युसेस विसर्ग; अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 18:55 IST

मंगळवारी सकाळपासून बालानगर, विहामांडवा, आडूळ, पाचोड, नांदर, दावरवाडी, परिसरास पावसाने झोडपून काढले.

ठळक मुद्देपैठण तालुक्यात जोरदार पाऊस गोदावरी काठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पैठण : तालुक्यास पावसाने झोडपून काढले असून वीरभ्रदासह इतर नद्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विरभद्रा नदीला आलेल्या पुरामुळे आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्याचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात २६७६१ क्युसेस क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे गोदावरीला नदीला पुर आला असून नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून  सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पैठण तालुक्यात  हलक्या ते मध्यम पावसास सोमवारी रात्री पासून सुरवात झाली. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून बालानगर, विहामांडवा, आडूळ, पाचोड, नांदर, दावरवाडी, परिसरास पावसाने झोडपून काढले. पुर आल्याने या भागातील नदीनाले एक झाले. तालुक्यातील प्रमुख नदी असलेल्या वीरभ्रदा नदीला महापूर आल्याने विविध ठिकाणचे पुल पाण्याखाली गेले, अनेक गावांचा संपर्क तुटला. नांदर येथील पुलावरून पाणी वहात असल्याने नांदरचा संपर्क मंगळवारी सकाळपासून तुटलेला आहे. हार्षी येथील नदीला पुर आल्याने हार्षी व सोनवाडीचा संपर्क तुटला याच प्रमाणे कुतुबखेडा नदीला पुर आल्याने या गावाचाही संपर्क तुटलेला आहे.

हिरडपुरी बंधाऱ्यातून मोठा विसर्ग..... नद्या नाल्यांना पुर आल्याने गोदावरी पात्रातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यातून आज सकाळी विसर्ग करण्यात आला. हिरडपुरी बंधारा १००% भरत आल्याने सकाळी ८.३० वा. बंधाऱ्याचे चार दरवाजे वर उचलून दरवाजातून २६७६१ क्युसेक्स ईतक्या मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात आला या मुळे हिरडपुरी खालील गोदावरी नदीस महापूर आला आहे. दरम्यान आपेगाव बंधारा दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान १००% भरल्याने या बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडून १४४५० क्युसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आल्याचे अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. 

मराठवाड्यात पावसाचे दमदार पुनरागमन; ६७ मंडळात अतिवृष्टीची नोंद, अनेक गावांचा संपर्क तुटला

नागरिकांना सावधानतेचा इशारा.... हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पुर आला असून नदी काठच्या गावांना सावधानतेचा ईशारा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिला आहे. गोदाकाठच्या गावात तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल यांना गावात राहण्या बाबत सूचना तहसील प्रशासनाने दिल्या आहेत. 

जायकवाडी धरणात २४१३ क्युसेस आवक...... जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे २४१३ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी धरणाचा जलसाठा ४२.२९% झाला होता. धरणाच्या स्थानिक पाणलोटक्षेत्रात पाऊस सुरू असून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासा तालुक्यातून सध्या मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. गेल्या २४ तासात ६ दलघमी जलसाठ्यात वाढ झाली असून १ जून पासून धरणात ३३० दलघमी (११.६५ टिएमसी) ची वाढ झाली आहे. सध्या धरणात १६५६.१६२ (५८.४८ टिएमसी) एकूण जलसाठा असून उपयुक्त जलसाठा ९१८.०५६ दलघमी (३२.४१ टिएमसी) ईतका आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथून अद्याप अपेक्षित आवक झालेली नाही. सध्या नाशिक जिल्ह्यातील येणारे पाणी बंद आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद