शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

सुट्यांमुळे तुंबले तब्बल २५ हजार धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:19 IST

सलग आलेल्या तीन सुट्यांमुळे बँकांमधील व्यवहार खोळंबले. निम्मे एटीएमसुद्धा रिकामे झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सलग आलेल्या तीन सुट्यांमुळे बँकांमधील व्यवहार खोळंबले. निम्मे एटीएमसुद्धा रिकामे झाले होते. बुधवारी बँक उघडताच खातेदारांनी एकच गर्दी केली. आता पुन्हा गुरुवारी (दि.१७)‘पतेती’ असल्याने बँकांना सुटी राहणार आहे. मागील शुक्रवारी क्लिअरिंगसाठी दाखल केलेले सुमारे २५ हजार धनादेश सुट्यांमुळे अजूनही वटले नाहीत. रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात बँकेला सव्वाशे ते दीडशे कोटी पाठविल्याने सध्या पैशाची अडचण मात्र नाही.मागील आठवड्यात १२ आॅगस्टला दुसरा शनिवार, १३ आॅगस्टला रविवार असल्याने दोन दिवस बँका बंद होत्या. त्यानंतर १४ रोजी सोमवारी बँका सुरू होत्या. पुन्हा मंगळवारी १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सुटी आली होती. अनेकांनी सुट्यांमुळे सहलीला जाण्याचे बेत आखले होते. अनेक सरकारी कर्मचारी, अधिकाºयांनी सोमवारची सुटी टाकली होती. यामुळे त्यांना सलग चार दिवस सुट्या मिळाल्या. सुट्यांमुळे बँकाही बंद राहणार असल्यामुळे अनेकांनी एटीएममधून पैसे काढणे सुरू केले. परिणामी रविवारी शहरातील निम्म्यापेक्षा अधिक एटीएम रिकामे झाले. सोमवारी बँका सुरू होत्या, पण एटीएममध्ये पुरेशी रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे त्या दिवशी सायंकाळपर्यंत २५० पेक्षा अधिक एटीएममधील रक्कम संपली होती. एटीएममध्ये रक्कम नसल्याने अनेकांना मंगळवारी ध्वजवंदनानंतर सहलीला जाण्याचा बेत रद्द करावा लागला. सहलीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या लोकांचेही तेथील एटीएम रिकामे झाल्याने हाल झाले.बुधवारी सकाळी बँका सुरू झाल्या तेव्हा काही मिनिटांतच काऊंटरसमोर रांगा लागल्या. मात्र, पगारी आठवडा संपल्याने कमीच गर्दी दिसून आली. काऊंटरवर खातेदारांना आवश्यक रक्कम मिळत होती. यात १०० व ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण अधिक होते.एका बँक अधिकाºयाने सांगितले की, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने ११ आॅगस्टला एसबीआयला ९६ कोटी रुपये तर अन्य तीन बँकांच्या करन्सीचेस्टला सर्व मिळून सुमारे दीडशे कोटी रुपये पाठविले. यामुळे शुक्रवारी बहुतांश एटीएममध्ये मुबलक पैसे होते. पण पैसे काढणाºयांची संख्या एवढी होती की, रविवारी एटीएम रिकामे झाले. शुक्रवारी सुमारे २५ हजार धनादेश बँकांमध्ये जमा झाले. ते आज सायंकाळपर्यंत वटविण्याचे काम सुरू होते. गुरुवारी सुटी आली आहे. त्यामुळे ज्यांनी मागील शुक्रवारी धनादेश बँकेत जमा केले, ते १८ रोजीच म्हणजे आठवडाभरानंतर संबंधितांच्या खात्यात जमा होतील. मात्र, ज्यांनी बुधवारी धनादेश जमा केले ते शुक्रवारी सायंकाळपर्यंत वटविले जातील.