शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

‘समृद्धी’चे २५ टक्के परप्रांतीय मजूर गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कोरोनामुळे समृद्धी महामार्गाचे काम प्रभावित झाले आहे. या महामार्गावर काम करणारे २५ टक्के परप्रांतीय मजूर होळीच्या सणासाठी ...

औरंगाबाद : कोरोनामुळे समृद्धी महामार्गाचे काम प्रभावित झाले आहे. या महामार्गावर काम करणारे २५ टक्के परप्रांतीय मजूर होळीच्या सणासाठी गावी गेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला घाबरून ते अद्यापही कामावर परतलेले नाहीत. तथापि, या महामार्गावर जिल्ह्यात दोन कंत्राटदार संस्थांमार्फत काम केले जात असून, ‘एल अँड टी’ या कंत्राटदार संस्थेचे ८६ टक्के, तर मेगा इंजिनिअरिंगचे ६६ टक्के काम पूर्ण झाले आहे. या महामार्गावर काम करीत असलेले पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातील मजूर होळीच्या सणासाठी गावी गेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात कोरोनाची मोठी लाट आली. त्यामुळे गावी गेलेले मजूर कोरोनाला घाबरून अजूनही कामावर परतलेले नाहीत. जिल्ह्यात ११२ किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर माळीवाड्यापासून पुढे ‘एल अँड टी’ आणि जालन्यापासून अलीकडे माळीवाड्यापर्यंत ‘मेगा इंजिनिअरिंग’ या दोन कंत्राटदार संस्थांमार्फत कामे सुरू आहेत. ‘एल अँड टी’चे ८६ टक्के, तर ‘मेगा’ इंजिनिअरिंगचे आतापर्यंत ६६ टक्के काम पूर्ण झाले आहे. लासूरस्टेशनजवळील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तेथे रेल्वेचा मेगा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या कामाला थोडा विलंब होत आहे, तर माळीवाडा जंक्शनचे कामही प्रगतिपथावर आहे. सावंगी येथे ‘मेगा’मार्फत इंटरचेंज जंक्शनचे काम सुरू आहे; परंतु तेथे भूसंपादनाबाबत थोडासा अडथळा आला आहे. १ मे पासून वाहतूक सुरळीत करण्यासाठी ६ पैकी ३ लेनचे काम पूर्ण करण्याचे या संस्थेचे नियोजन होते. बोगद्याचे कामही हीच संस्था करीत असून, ३०० पैकी २०० मीटर लांबीचे एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या बोगद्याचे कामही सोबतच सुरू आहे.

चौकट...

महामार्गावर सुविधांना प्राधान्य

या महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी दरम्यान वाहनधारकांना पेट्रोलपंप, चहा-पाणी, जेवण, वॉशरुमची सुविधा अत्यावश्यक आहे. ती देण्याबाबत ‘एमएसआरडीसी’ने हालचाली सुरू केल्या आहेत. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून या महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांचे लसीकरण करून घेतले आहे. दरम्यान, ‘एल अँड टी’ या कंत्राटदार संस्थेचे २५ मजूर कोरोनाबाधित होते. त्यापैकी १७ जण बरे होऊन कामावर परतले आहेत, तर ‘मेगा’चे ३० कामगार बाधित झाले होते. त्यापैकी २० जण बरे झाले आहेत. मजूर बाधित झाल्यामुळे नव्हे, तर कोरोनाला घाबरल्यामुळे कामावर परिणाम होत आहे, असे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले.