शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

विद्यापीठात २४ विहिरींचे पुनर्भरण

By admin | Updated: May 3, 2016 00:51 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिनी ‘जलयुक्त विद्यापीठ’ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिनी ‘जलयुक्त विद्यापीठ’ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठ परिसरातील २४ विहिरींचे पुनर्भरण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. अशोक तेजनकर, कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे, अरुनिमा फाऊंडेशनचे प्रमुख रघुनंदन लाहोटी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एम. नेटके व विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे यांचीही उपस्थिती होती. ‘पाण्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन’ या विषयावर प्रा. तेजनकर यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, गेल्या वर्षी सरासरीहून थोडाच कमी पाऊस पडला तरी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. पाण्याचे पुनर्भरण या बाबतीत अद्यापही लोक जागरूक झालेले नाहीत. पाण्याचा प्रत्येक थेंब वाहून न जाऊ देता तो त्याच ठिकाणी मुरविला पाहिजे. ज्या जमिनीत पाणी मुरण्यास अडचणी येत असतील तेथे कृत्रिमरीत्या पाण्याचे पुनर्भरण झाले पाहिेजे.पाणी संकल्प हेच मोठे समाजकार्यप्रत्येकाने ‘पाणी संकल्प’ तयार करून राबविणे हे मोठे समाजकार्य आहे, असे यावेळी लाहोटी म्हणाले. रोहणवाडी परिसरात संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी लिटर पाणी साठविले असेही ते म्हणाले. ‘जलयुक्त विद्यापीठ’ उपक्रम २०१६-१७ चे ब्रीद असून आम्ही ‘स्मार्ट व्हिलेज’ मध्ये या परिसराचे रूपांतर करणार आहोत, असे कुलगुरूचोपडे म्हणाले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. संजय शिंदे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर इतिहास वस्तुसंग्रहालयासमोर प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. यावेळी डॉ. किशन धाबे, डॉ. धर्मराज वीर, डॉ. अरुण खरात, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. स्मिता अवचार, स्मिता चावरे, डॉ. धनंजय माने आदींची उपस्थिती होती.