शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

२१.५ लाख पुस्तके मिळणार मोफत

By admin | Updated: June 15, 2014 00:57 IST

लातूर : पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी २१ लाख ५० हजार पुस्तके मोफत दिली जाणार आहेत.

लातूर : जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत चालू शैक्षणिक वर्षासाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी २१ लाख ५० हजार पुस्तके मोफत दिली जाणार आहेत. त्यामुळे १०० टक्के विद्यार्थ्यांच्या हातात शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके पडतील़ जिल्हा परिषदेने लातूर जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी २१ लाख ४६ हजार २२९ पाठ्यपुस्तकांची भांडार विभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारपर्यंत २० लाख ९४ हजार ७६७ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. याची टक्केवारी ९८ टक्के असली तरी सोमवारपर्यंत उर्वरित २ टक्के पुस्तकेही वाटप केले जातील, असे भांडार व्यवस्थापक भाऊसाहेब पवार यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील शाळांसाठी ७ लाख ९६ हजार ४३६ स्वाध्याय पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. पैकी ६ लाख ८२ हजार ४१८ स्वाध्याय पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. देवणी, उदगीर तालुक्यांसाठी शुक्रवारी उर्वरित स्वाध्याय पुस्तके पाठविण्यात आले. सर्वशिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना सोमवारी समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासनाने मोफत पाठ्यपुस्तक वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. (प्रतिनिधी) मुख्याध्यापकांवर जबाबदारी...पाठ्यपुस्तकांच्या योग्य नियोजनासाठी त्या-त्या तालुक्यातील अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात पहिल्या दिवशी पुस्तके पडावीत यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी सांगितले.२