शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

‘आदर्श’ पतसंस्थेतील २०२ कोटींचा घोटाळा, ठेवीदारांना पैसे परत मिळण्यास लागेल वर्ष

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 20, 2023 12:33 IST

प्रशासकाने कारभार सांभाळल्यावर सुरू होणार कार्यवाही

छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी पतसंस्थेत २०२ कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सर्व ठेवीदारांची झोप उडाली आहे. आपल्या मेहनतीचे लाखो रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पतसंस्थेचे सर्व सूत्र प्रशासक हाती घेणार असून त्यानंतर कर्ज वसुली, संपत्ती जप्तीच्या कारवाईला वेग येईल. मात्र, ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

२०१४ नंतर कायदा बदलला आणि पतसंस्थेला खाजगी ऑडिटरकडून ऑडिट करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर आदर्श नागरी पतसंस्थेत दरवर्षी खाजगी ऑडिटरकडून ऑडिट केले जात होते. कर्ज वाटपातील घोळ, व्यवहारातील अनियमितता याबद्दल ऑडिटरने सहकार उपनिबंधक कार्यालयास कळविणे अपेक्षित होते; पण त्याचा थांगपत्ताही या सरकारी कार्यालयाला लागू दिला नाही. संशय आल्याने अखेर जिल्हा उपनिबंधकांनी पतसंस्थेचे २०१६ पासूनचे ‘टेस्ट ऑडिट’ करण्याचे आदेश दिले. या ऑडिटच्या अहवालातून २०२ कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.

२०१६ पासून खाजगी ऑडिटरने पतसंस्थेतील अवाजवी कर्ज देण्याची व कामातील अनियमिततेची माहिती उपनिबंधक कार्यालयाला दिली नाही. दडवून ठेवल्याने खाजगी ऑडिटरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पतसंस्थेचे सूत्र प्रशासक हाती घेतील. त्यानंतर कर्जवसुली सुरू होईल. त्यानंतर पतसंस्थेची मालमत्ता सील करण्यात येईल, अध्यक्ष व संचालकांची मालमत्ताही जप्त करण्यात येईल. सरकारच्या आदेशानंतर या संपत्तीचा लिलाव होईल व त्यातून मिळालेली रक्कम ठेवीदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, यासाठी वर्ष लागू शकते. कर्जदार व बँकेच्या संचालक मंडळाची संपत्तीची माहिती असल्यास ठेवीदारांनी ती पोलिस किंवा सहकार उपनिबंधक कार्यालयात द्यावी. ठेवीदारांना पैसे मिळण्यासाठी विविध पातळीवर लढाई लढावी लागेल, असे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

संयम बाळगा, टोकाची भूमिका घेऊ नकाजिल्हा उपनिबंधक विभागही कायदेशीररीत्या एकेक पाऊल पुढे टाकत आहे. ठेवीदारांनी संयम ठेवावा. टोकाची भूमिका घेऊ नये.- डॉ. मुकेश बारहाते, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

जिल्ह्यात ७०३ पतसंस्था कार्यरतजिल्हा उपनिबंधकांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ७०३ पतसंस्था कार्यरत आहेत. अनेक पतसंस्थांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे. आदर्श नागरी पतसंस्था वगळता सध्या अन्य कोणत्याही पतसंस्थेच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबाद