शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

२० गावे रस्त्याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 9, 2014 00:39 IST

हदगाव : भारताला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली, परंतु हदगाव तालुक्यातील २० गावे अद्यापही पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत़

हदगाव : भारताला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली, परंतु हदगाव तालुक्यातील २० गावे अद्यापही पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत़ गावाचा विकास करण्यासाठी दळणवळण मार्ग महत्त्वाचा दुवा आहे़ विज्ञानामुळे संपूर्ण मानव जिवन बदलले आहे खरे, परंतु या गावांना ६७ वर्षापासून पक्का रस्ताच मिळाला नसल्याने विकासाचे देणे-घेणे या गावांना नाही़ यामधये गायतोंड, पळसवाडी, जगापूर, सावदगाव-डोंगरकडा, बरडशेवाळा-पांगरी, मार्लेगाव-कोळी, रावणगाव-कृष्णापूर, जांभळा-रावणगाव, नाव्हा-तामसा, राळावाडी, भाटेगाव-उमरी, मरडगा आदी गावांचा समावेश आहे़ही गावे २ ते ६ हजार लोकसंख्या असलेली गावे आहेत़ सर्कलच्या गावापासून २ ते ६-१० कि़मी़ अंतरावरील गावे आहेत़ २ किंवा ३ कि़मी़ लांबीचा पक्का रस्ता मिळण्यासाठी ६७ वर्षे वाट पहावी लागते़ हीच तालुक्यातील लोकप्रतिनिधीची शोकांतिका आहे़ लोकांचे दरडोई उत्पन्न वाढले़ त्यामुळे त्यांच्याकडे स्वत:ची दुचाकी, चारचाकी वाहने आली़ परंतु या गावातील लोक आदिवासी वा बहुजन असल्यामुळे त्यांचा आवाज लोकप्रतिनिधींच्या कानावरूनच जातो़ त्यांचा आवाज कोण्याही नेत्याच्या हृदयाला साद घालत नाही़ ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधींचे आक्रमक कार्यकर्ते वा सोयरेधायरे आहेत, त्या ठिकाणी आवश्यकता दुबार-तिबार रस्त्याचे काम मंजूर होते़ परंतु या गावांना एकदाही रस्ता झालाच नाही़ त्या गावांना प्राधान्य द्यावे असे कोणत्याही कार्यकर्त्याला वाटत नाही़बी-बियाणे, खत-औषधी दोन महिन्यापूर्वीच न्यावी लागते़ कारण पैसे मोजूनही रस्त्यामुळे वाहन यायला तयार नसतात़ अनेक गावांत १ कि़मी़ काम झाले़ परंतु पुढील काम मंजूर होईपर्यंत या कामाची वाट लागली़ रस्त्यामुळे अनेक मुलामुलींचे शिक्षण अर्धवट राहिले़ पूर्वी नोकरीची संधी तरुणांच्या हुकल्या़ अनेक संस्था शहरात वेगवेगळे उपक्रम राबवून शहराच्या विकासाला हातभार लावतात़ मग या खेड्यांना दत्तक घेवून त्याचा विकास करण्याचा पायंडा कोणी पाडत नाही़ रस्ता झाला तर अनेक सुखसोयींचा फायदा या खेडूतांना होईल़ (वार्ताहर)रस्ता नसल्यामुळे अनेकांना सर्पदंश, साथरोग, बाळंतपण यासाठी वाहनांची सोय न होवून उपचाराला विलंब झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला़ अशा अनेक घटना प्रत्येक गावात घडल्या़ शेतकऱ्यांना शेतीमाल शेतातून घरी वा बाजारात विक्रीला नेण्यासाठी अनेक अडचणी येतात़ यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बैलांना दुखापत होवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले़