शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

२० गावे रस्त्याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 9, 2014 00:39 IST

हदगाव : भारताला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली, परंतु हदगाव तालुक्यातील २० गावे अद्यापही पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत़

हदगाव : भारताला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली, परंतु हदगाव तालुक्यातील २० गावे अद्यापही पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत़ गावाचा विकास करण्यासाठी दळणवळण मार्ग महत्त्वाचा दुवा आहे़ विज्ञानामुळे संपूर्ण मानव जिवन बदलले आहे खरे, परंतु या गावांना ६७ वर्षापासून पक्का रस्ताच मिळाला नसल्याने विकासाचे देणे-घेणे या गावांना नाही़ यामधये गायतोंड, पळसवाडी, जगापूर, सावदगाव-डोंगरकडा, बरडशेवाळा-पांगरी, मार्लेगाव-कोळी, रावणगाव-कृष्णापूर, जांभळा-रावणगाव, नाव्हा-तामसा, राळावाडी, भाटेगाव-उमरी, मरडगा आदी गावांचा समावेश आहे़ही गावे २ ते ६ हजार लोकसंख्या असलेली गावे आहेत़ सर्कलच्या गावापासून २ ते ६-१० कि़मी़ अंतरावरील गावे आहेत़ २ किंवा ३ कि़मी़ लांबीचा पक्का रस्ता मिळण्यासाठी ६७ वर्षे वाट पहावी लागते़ हीच तालुक्यातील लोकप्रतिनिधीची शोकांतिका आहे़ लोकांचे दरडोई उत्पन्न वाढले़ त्यामुळे त्यांच्याकडे स्वत:ची दुचाकी, चारचाकी वाहने आली़ परंतु या गावातील लोक आदिवासी वा बहुजन असल्यामुळे त्यांचा आवाज लोकप्रतिनिधींच्या कानावरूनच जातो़ त्यांचा आवाज कोण्याही नेत्याच्या हृदयाला साद घालत नाही़ ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधींचे आक्रमक कार्यकर्ते वा सोयरेधायरे आहेत, त्या ठिकाणी आवश्यकता दुबार-तिबार रस्त्याचे काम मंजूर होते़ परंतु या गावांना एकदाही रस्ता झालाच नाही़ त्या गावांना प्राधान्य द्यावे असे कोणत्याही कार्यकर्त्याला वाटत नाही़बी-बियाणे, खत-औषधी दोन महिन्यापूर्वीच न्यावी लागते़ कारण पैसे मोजूनही रस्त्यामुळे वाहन यायला तयार नसतात़ अनेक गावांत १ कि़मी़ काम झाले़ परंतु पुढील काम मंजूर होईपर्यंत या कामाची वाट लागली़ रस्त्यामुळे अनेक मुलामुलींचे शिक्षण अर्धवट राहिले़ पूर्वी नोकरीची संधी तरुणांच्या हुकल्या़ अनेक संस्था शहरात वेगवेगळे उपक्रम राबवून शहराच्या विकासाला हातभार लावतात़ मग या खेड्यांना दत्तक घेवून त्याचा विकास करण्याचा पायंडा कोणी पाडत नाही़ रस्ता झाला तर अनेक सुखसोयींचा फायदा या खेडूतांना होईल़ (वार्ताहर)रस्ता नसल्यामुळे अनेकांना सर्पदंश, साथरोग, बाळंतपण यासाठी वाहनांची सोय न होवून उपचाराला विलंब झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला़ अशा अनेक घटना प्रत्येक गावात घडल्या़ शेतकऱ्यांना शेतीमाल शेतातून घरी वा बाजारात विक्रीला नेण्यासाठी अनेक अडचणी येतात़ यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बैलांना दुखापत होवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले़