शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांना २० दिवस सक्तीची रजा; अंमलबजावणी सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:33 IST

कोरोनामुळे केवळ ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू आहे; परंतु सुरू असलेल्या बसला फारसा प्रतिसाद नाही.

ठळक मुद्देमंदीचा काळ म्हणून रजारविवारपासून पाठविले रजेवर

औरंगाबाद : कोरोना संकटामुळे तोट्यात आलेल्या एसटीने जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना २०-२० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यास सुरुवात केली आहे. 

औरंगाबाद विभागात म्हणजे जिल्ह्यात एसटी महामंडळाचे एकूण ३ हजार कर्मचारी आहेत. यात शिपायापासून लिपिक, वाहनचालक, वाहक, यांत्रिकी विभागातील कामगारांचा समावेश होतो. या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे. कोरोनामुळे केवळ ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू आहे; परंतु सुरू असलेल्या बसला फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे तोटा वाढत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब होत आहे. यावर पर्याय म्हणून मालवाहतूक सुरू केली. त्याला प्रतिसाद मिळत आहे. असे असताना जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना २०-२० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश दिला आहे.  एसटी महामंडळाच्या परिपत्रकानुसार रजेवर पाठविण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले. 

२० रजा पसंतीनुसार : एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभरात ४० रजा देण्यात येतात. यातील निम्म्या रजा या मंदीच्या काळात देता येतात, तर उर्वरित २० रजा कर्मचारी पसंतीनुसार घेऊ शकतात. सध्या मंदीचा काळ असल्याने रजेवर पाठविणे क्रमप्राप्त असल्याचे मध्यवर्ती बसस्थानक आगार व्यवस्थापकांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

रविवारपासून पाठविले रजेवर : मध्यवर्ती बसस्थानकातील २० कर्मचाऱ्यांना रविवारपासून रजेवर पाठविण्यात आले. अशाच प्रकारे प्रत्येक आगारात कर्मचाऱ्यांना रजेवर पाठविण्यात येत आहे. २० दिवस कापण्यात येणारी रजा ही अर्जित रजा असल्याने त्याचे वेतन एसटीला द्यावे लागणार आहे, असे असेल तर मग रजा कपात करण्याचा उद्देश काय, असा प्रश्न कामगार विचारत आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादstate transportएसटी