शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
3
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
4
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
5
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
6
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
7
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
8
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
9
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
10
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
11
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
12
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
13
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
14
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
15
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
16
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
17
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
18
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
19
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
20
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

एसटी कर्मचाऱ्यांना २० दिवस सक्तीची रजा; अंमलबजावणी सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:33 IST

कोरोनामुळे केवळ ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू आहे; परंतु सुरू असलेल्या बसला फारसा प्रतिसाद नाही.

ठळक मुद्देमंदीचा काळ म्हणून रजारविवारपासून पाठविले रजेवर

औरंगाबाद : कोरोना संकटामुळे तोट्यात आलेल्या एसटीने जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना २०-२० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यास सुरुवात केली आहे. 

औरंगाबाद विभागात म्हणजे जिल्ह्यात एसटी महामंडळाचे एकूण ३ हजार कर्मचारी आहेत. यात शिपायापासून लिपिक, वाहनचालक, वाहक, यांत्रिकी विभागातील कामगारांचा समावेश होतो. या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे. कोरोनामुळे केवळ ग्रामीण भागात एसटी सेवा सुरू आहे; परंतु सुरू असलेल्या बसला फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे तोटा वाढत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब होत आहे. यावर पर्याय म्हणून मालवाहतूक सुरू केली. त्याला प्रतिसाद मिळत आहे. असे असताना जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना २०-२० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश दिला आहे.  एसटी महामंडळाच्या परिपत्रकानुसार रजेवर पाठविण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले. 

२० रजा पसंतीनुसार : एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभरात ४० रजा देण्यात येतात. यातील निम्म्या रजा या मंदीच्या काळात देता येतात, तर उर्वरित २० रजा कर्मचारी पसंतीनुसार घेऊ शकतात. सध्या मंदीचा काळ असल्याने रजेवर पाठविणे क्रमप्राप्त असल्याचे मध्यवर्ती बसस्थानक आगार व्यवस्थापकांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

रविवारपासून पाठविले रजेवर : मध्यवर्ती बसस्थानकातील २० कर्मचाऱ्यांना रविवारपासून रजेवर पाठविण्यात आले. अशाच प्रकारे प्रत्येक आगारात कर्मचाऱ्यांना रजेवर पाठविण्यात येत आहे. २० दिवस कापण्यात येणारी रजा ही अर्जित रजा असल्याने त्याचे वेतन एसटीला द्यावे लागणार आहे, असे असेल तर मग रजा कपात करण्याचा उद्देश काय, असा प्रश्न कामगार विचारत आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादstate transportएसटी