शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

म्हणे २ दिवसांआड; ५ दिवसांआडही पाणी मिळेना; छत्रपती संभाजीनगरात सर्वसामान्य प्रचंड त्रस्त

By मुजीब देवणीकर | Updated: April 15, 2024 11:50 IST

शहरात कुठे कुठे सहाव्या, तर कुठे बाराव्या दिवशी पाणीपुरवठा

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणात १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा उन्हाळ्यात पुरेल, यापेक्षा कितीतरी जास्त पाणी धरणात असतानाही महापालिकेची जास्त पाणी आणण्याची क्षमताच नाही. २०० कोटी रुपये खर्च करून ९०० मिमी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली. त्यानंतरही शहरात वाढीव ७५ एमएलडी पाणी आणणे अशक्य झाले आहे. २० फेब्रुवारीपासून शहराला दोन दिवसांआड पाणी मिळेल, अशी घोषणा मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली होती. ही घोषणा आता हवेत विरली. खंडपीठात पाच दिवसांआड शहराला पाणी देऊ, हे आश्वासनही खोटे ठरले. शहराला कुठे सहाव्या, तर कुठे बाराव्या दिवशी पाणी मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन करण्याची गरज पडू नये म्हणून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी. व्यासाची जलवाहिनी टाकली. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात अतिरिक्त ७५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमताच नाही. आता याच ठिकाणी नवीन जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी सुरू आहे. हे काम जून किंवा जुलैमध्ये पूर्ण होईल. मनपाकडे पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्याने शहराला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

जायकवाडी धरण आणि हर्सूल तलावातून दररोज १४० ते १४२ एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. प्रत्यक्षात शहरात १२० एमएलडी पाणी येत आहे. तब्बल २० एमएलडी पाणी शहरात दाखल होण्यापूर्वीच वाहून जात आहे. केवळ जलवाहिन्यांवरील गळत्यांमुळेच शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान अनेक ठिकाणी जलवाहिनीतून पाण्याची गळती सुरू असते. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे.

मनपाला पाहिजे निमित्तआरेफ कॉलनीसारख्या वसाहतीला १२व्या दिवशी पाणीपुरवठा होतो. सिडको - हडकोतही सर्वाधिक पाणीटंचाईचा त्रास आहे. भावसिंगपुरा, शहागंज, जिन्सी, पुंडलिकनगर, रेल्वे स्टेशन, पैठण गेट, सिटी चौक, धावणी मोहल्ला इ. वसाहतींना ठरलेल्या दिवशी पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. जलवाहिनी फुटल्याचे, वीजपुरवठा खंडित झाल्याची कारणे मनपाकडून सांगण्यात येतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी