शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

म्हणे २ दिवसांआड; ५ दिवसांआडही पाणी मिळेना; छत्रपती संभाजीनगरात सर्वसामान्य प्रचंड त्रस्त

By मुजीब देवणीकर | Updated: April 15, 2024 11:50 IST

शहरात कुठे कुठे सहाव्या, तर कुठे बाराव्या दिवशी पाणीपुरवठा

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणात १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा उन्हाळ्यात पुरेल, यापेक्षा कितीतरी जास्त पाणी धरणात असतानाही महापालिकेची जास्त पाणी आणण्याची क्षमताच नाही. २०० कोटी रुपये खर्च करून ९०० मिमी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली. त्यानंतरही शहरात वाढीव ७५ एमएलडी पाणी आणणे अशक्य झाले आहे. २० फेब्रुवारीपासून शहराला दोन दिवसांआड पाणी मिळेल, अशी घोषणा मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली होती. ही घोषणा आता हवेत विरली. खंडपीठात पाच दिवसांआड शहराला पाणी देऊ, हे आश्वासनही खोटे ठरले. शहराला कुठे सहाव्या, तर कुठे बाराव्या दिवशी पाणी मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन करण्याची गरज पडू नये म्हणून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी. व्यासाची जलवाहिनी टाकली. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात अतिरिक्त ७५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमताच नाही. आता याच ठिकाणी नवीन जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी सुरू आहे. हे काम जून किंवा जुलैमध्ये पूर्ण होईल. मनपाकडे पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्याने शहराला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

जायकवाडी धरण आणि हर्सूल तलावातून दररोज १४० ते १४२ एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. प्रत्यक्षात शहरात १२० एमएलडी पाणी येत आहे. तब्बल २० एमएलडी पाणी शहरात दाखल होण्यापूर्वीच वाहून जात आहे. केवळ जलवाहिन्यांवरील गळत्यांमुळेच शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान अनेक ठिकाणी जलवाहिनीतून पाण्याची गळती सुरू असते. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे.

मनपाला पाहिजे निमित्तआरेफ कॉलनीसारख्या वसाहतीला १२व्या दिवशी पाणीपुरवठा होतो. सिडको - हडकोतही सर्वाधिक पाणीटंचाईचा त्रास आहे. भावसिंगपुरा, शहागंज, जिन्सी, पुंडलिकनगर, रेल्वे स्टेशन, पैठण गेट, सिटी चौक, धावणी मोहल्ला इ. वसाहतींना ठरलेल्या दिवशी पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. जलवाहिनी फुटल्याचे, वीजपुरवठा खंडित झाल्याची कारणे मनपाकडून सांगण्यात येतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी