शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

अवकाळीचा १८४ गावांना फटका

By admin | Updated: April 14, 2015 00:31 IST

बीड : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. ९ ते १२ एप्रिल या कालावधीत झालेला अवेळी पाऊस व गारपीट यांच्यामुळे जिल्ह्यातील

बीड : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. ९ ते १२ एप्रिल या कालावधीत झालेला अवेळी पाऊस व गारपीट यांच्यामुळे जिल्ह्यातील १८४ गावांतील १ हजार ७६५ हेक्टरवरील फळबागा, शेतीपिके व भाजीपाला यांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.बीड तालुक्यातील ६ गावे, आष्टी - ६, गेवराई - १७, धारूर - २२, वडवणी - १२, अंबाजोगाई - १६, केज - ८३ व परळी - २२ या गावांमध्ये अवकाळी गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या महिन्याच्या सुरूवातीला गारपीट झाली होती. तेव्हा जवळपास ६० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाही अवकाळी पाऊस झाल्यामुळे १ हजार ७६५ हेक्टरवरील फळपिके, शेतीपिके व भाजीपाला बाधित झाल्याचा अंदाज व्यक्त झाला आहे.विशेष म्हणजे बाधित क्षेत्रामध्ये फळबागांचे नुकसान अधिक झाले असल्याचे समोर आले आहे. १ हजार १६९ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यात परळी व केज तालुक्यातील गावांमधील फळबागांचा समावेश आहे. शेतीपिकांचे अत्यल्प नुकसान झाले आहे तर भाजीपाल्याला मोठा फटका बसला आहे. ५७६ हेक्टरवरील भाजीपाला बाधित झाला आहे. केज व धारूर तालुक्यातील क्षेत्र अधिक आहे. केजमधील १९३ तर धारूर १८५ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. एकूण बाधित क्षेत्रापैकी ५० टक्क्यापेक्षा कमी असणारे क्षेत्र ५६ च्या आत तर ५० पेक्षा जास्त बाधित क्षेत्र १ हजार ७०९ हेक्टर असल्याचा अंदाज व्यक्त झाला आहे. (प्रतिनिधी)