शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

जायकवाडीत १८ टक्के साठा

By admin | Updated: August 25, 2014 00:26 IST

पैठण : धरणात धरणात १७.७२ टक्के जलसाठा झाला आहे

पैठण : जायकवाडीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पहिल्यांदाच गेल्या २४ तासांत पाऊस झाल्याने व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक ६०३३ क्युसेक्स क्षमतेने होत आहे. धरणात १७.७२ टक्के जलसाठा झाला आहे.जायकवाडीचे मुक्त व बंदिस्त असे दोन पाणलोट क्षेत्र आहेत. नाशिक व नगर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्र हे बंदिस्त पाणलोट क्षेत्रात येते. औरंगाबाद जिल्हा, नगर जिल्ह्याचा काही भाग हा मुक्त पाणलोट क्षेत्रात येतो. या क्षेत्रात पाऊस झाल्यास पाणी जायकवाडीत विनाअडथळा दाखल होते. रविवारी मुक्त पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या वैजापूर २० मि.मी., कन्नड ५५ मि.मी., श्रीरामपूर ८५ मि.मी., येवला ५२ मि.मी., कोपरगाव १८ मि.मी., लोणी २३ मि.मी., राहता ५० मि.मी., बोरवाहेगाव (ता. वैजापूर) ३८ मि.मी., देवगाव रुई ४५ मि.मी., शिर्डी ४५ मि.मी., असा समाधानकारक पाऊस झाला. या पावसाचे पाणी धरणात दाखल होत आहे. या शिवाय बंदिस्त पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक ५ मि.मी., करंजवण २२ मि.मी., गंगापूर (नाशिक) १५ मि.मी., दारणा १७ मि.मी., भंडारदरा २१ मि.मी., ओझरखेड २० मि.मी., पालखेड ३७ मि.मी., ओझर वेअर २० मि.मी., नांदूर-मधमेश्वर २३ मि.मी. निळवंडे २८ मि.मी., असा गेल्या २४ तासांत पाऊस झाला. यामुळे तेथील दारणा धरणातून २१६३ क्युसेक्स व नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातून ४४६९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे सर्व पाणी जायकवाडीत दाखल होत आहे.आज सायंकाळी धरणाची पाणी पातळी १५०१.८१ फूट झाली होती. धरणामध्ये एकूण जलसाठा ११२२.७९८ द.ल.घ.मी. एवढा झाला असून, या पैकी ३८४.६९२ द.ल.घ.मी एवढा उपयुक्त जलसाठा आहे. सोमवारपर्यंत धरणात १८ टक्क्यांपर्यंत जलसाठा होण्याची शक्यता शाखा अभियंता अशोक नरुटे यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ९९ टक्के, तर निळवंडे ९४ टक्के भरले आहे. शिवाय गेल्या २४ तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २१ मि.मी. व निळवंडेमध्ये २८ मि.मी. पाऊस झाला. यंदा या धरणातून अद्यापही जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलेले नाही. भविष्यात या भागात मोठा पाऊस झाल्यास एकदम मोठ्या क्षमतेने जायकवाडीत पाणी सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही. हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची होईल व त्यावेळी जायकवाडी व खालील भागात पूरपरिस्थिती निर्माण होते. भंडारदरा, निळवंडेसह नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडून येथे पाणी अडविण्यासाठी पॉकेट निर्माण करून ठेवल्यास पूर परिस्थिती योग्यरीत्या हाताळता येईल. त्यामुळे जायकवाडीसाठी वरील धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.