शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कंत्राटदारावर १८ कोटींची मेहरबानी; पैठण मार्गावरील सात किलोमीटर कामाला फाटा

By विकास राऊत | Updated: October 15, 2024 16:53 IST

एनएचएचआय नव्याने मागविणार निविदा; डिस्कोप (कामाला वाव नसणे) या निकषाखाली ते काम रद्द करण्यात आले असून, भविष्यात त्या कामासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पैठण या संतनगरीकडे जातांना भाविकांनी दोन दशकांची परवड सहन केल्यानंतर त्या ४५ कि.मी मार्गाच्या कामाला जानेवारी २०२३ मध्ये सुरुवात झाली. अजूनही त्या मार्गाचे काम पुर्ण झाले नसून सात कि.मी.चे काम नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने वगळून कंत्राटदारावर १८ कोटींची मेहरबानी केल्याची चर्चा आहे.

डिस्कोप (कामाला वाव नसणे) या निकषाखाली ते काम रद्द करण्यात आले असून, भविष्यात त्या कामासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत. सेठी आणि मेहरा या कंत्राटदार संस्थांकडे त्या मार्गाचे काम जेव्ही (ज्वॉइंट व्हेंचरशिप) मध्ये देण्यात आले होते. सेठी या कंत्राटदाराकडील ५ व मेहरा या कंत्राटदाराकडील सुमारे दोन कि.मी.चे काम रद्द करून मार्गाच्या कामाचा विषय एनएचएआयने थांबविला आहे. यामुळे कंत्राटदाराला लागणाऱ्या दंडातून सवलत मिळेल, शिवाय नव्याने कामाच्या निविदांचाही घाट घातला जाईल. शहर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे सात कि.मी. अंतरात रस्त्याच्या कामाला स्काेप नसल्याचे कारण एनएचएआयने पुढे केले आहे. बिडकीन परिसरातील हे काम आहे. कामाच्या गुणवत्तेबाबतदेखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कंत्राटदाराचा दोन्ही बाजूंनी फायदा?सात कि.मी. काम कमी केल्यामुळे कंत्राटदारांनी मुदतीत काम पूर्ण करण्याचा व त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा मुद्दा राहिलेला नाही. ४९० कोटी रुपयांवरून फक्त २८९ कोटींमध्ये म्हणजे ४१.०२ टक्के कमी दरात हे काम दिले होते. यातील जवळपास सर्वच रक्कम अदा केल्याची चर्चा आहे. काम कमी केल्यामुळे कंत्राटदाराचा तिथेही फायदा झाला आहे. सात कि.मी. कामासाठी एमजीपीच्या जलवाहिनीचे टाकण्याचे काम पूर्ण एनएचएआय नव्याने निविदा मागविणार आहे. तेवढ्या सात कि.मी.साठी महागड्या दराने निविदा येतील. त्यात होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार असा प्रश्न आहे. दरम्यान, कंत्राटदार मुदतवाढीसाठी अर्ज करणार असल्याचे समजते.

प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले यांना थेट सवाल...प्रश्न : मार्गातील किती काम वगळले (डी-स्कोप) केले आहे.इंगोले : कंत्राटदार जेव्ही मध्ये असून, सात कि.मी.चे काम वगळले आहे.

प्रश्न : वगळलेल्या कामाची रक्कम किती आहे.?इंगोले : १७ कोटी रुपयांच्या आसपास असेल.

प्रश्न : काम वगळण्याचे मुख्य कारण काय आहे.?इंगोले : पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनीचे काम न झाल्यामुळे काम वगळले.

प्रश्न : कामाला काही मुदतवाढ दिली आहे काय ?.इंगोले : नाही, कामाला काहीही मुदतवाढ दिलेली नाही.

प्रश्न : जर काम वगळले आहे तर कंत्राटदाराला किती रक्कम दिली?इंगोले : याबाबत एनएचएआय वरिष्ठ कार्यालय निर्णय घेतात.

प्रश्न : कंत्राटदारावर मेहरबानी केली आहे काय?इंगोले : कंत्राटदार लवादात गेला असता, शासनाचे नुकसान झाले असते. मेहरबानीचा प्रश्नच नाही.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरhighwayमहामार्ग