शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

१७७ प्रकल्पांतील पाणीसाठा वाढला !

By admin | Updated: September 10, 2014 00:47 IST

उस्मानाबाद : मागील आठ ते दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्हाभरातील १७७ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. असे असले तरी आणखी प्रकल्पांच्या घशाला कोरड कायम आहे.

उस्मानाबाद : मागील आठ ते दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्हाभरातील १७७ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला आहे. असे असले तरी आणखी प्रकल्पांच्या घशाला कोरड कायम आहे. त्यामुळे आणखी पावसाची गरज व्यक्त होत आहे.मागील दोन वर्षामध्ये पावसाच्या प्रमाणात कमालीची घट झाली. त्यामुळे विहिरी, विंधन विहिर आदी स्त्रोतांची पाणीपातळीही झपाट्याने खालवली. अर्धाअधिक पावसाळा कोरडा गेल्यानंतर आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या सुरूवातीला जिल्हाभरात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तलवात कमी-अधिक प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात एक मोठा, सतरा मध्यम तर १९३ लघू व साठवण तलाव आहेत. जिल्ह्यातील एकमेव मोठा असलेल्या सीना-कोळेगाव प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांपैकी केवळ एक प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. अन्य एका प्रकल्पात ७५ टक्क्यापेक्षा अधिक साठा आहे. दोन प्रकल्पांत ५१ ते ५७ टक्के पाणीसाठा झाला असून अतर दोन प्रकल्पांमध्ये सध्या २६ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. सहा प्रकल्पांत २५ टक्के पेक्षा कमी, चार प्रकल्प जोत्याच्याखाली असून एक प्रकल्प कोरडाच आहे. जिल्ह्यात १९३ लघू प्रकल्प असून, यातील २० प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. चार प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक साठा असून तेरा प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के साठा आहे. तेरा प्रकल्पांत २६ ते ५० टक्के पाणी साचले आहे. ४५ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. असे असले तरी आजही ६५ प्रकल्प जोत्याखाली असून उर्वरित ३३ प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे असे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)सीना-कोळेगाव प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा, मध्य प्रकल्पामध्ये कळंब तालुक्यातील रायगव्हाण तलाव कोरडा आहे. तसेच ढोकी, कोलेगाव करजखेडा, खामसवाडी, घुगी, येवती, टाकळी, केशेगाव, जाग्जी, बेंबळी, गोपाळवाडी, पाडोळी (आ),बोरगांव राजे, धुत्ता, कोंड, पेंठसागवी, सरोडी, जेवळी, माळेगाव, शिराढोण, ढोराळा, आडसूळवाडी, नागुलगांव, बारातेवाडी, येडेश्र्वरी, गिरलगाव, घुलेवाडी, डुककरवाडी, उमाचीवाडी, जांब या लघू प्रकल्पामध्ये अजिबात पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.