शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

आइस्क्रीम उद्योगाला 15 हजार कोटींचा फटका; लॉकडाऊनमुळे देशातील आइस्क्रीम उद्योग वितळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 06:00 IST

देशात गुजरातमध्ये आइस्क्रीमची सर्वाधिक विक्री होते. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र, नवी दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर, राजस्थान चौथ्या तर पाचव्या क्रमांकावर कर्नाटकचा नंबर लागतो.

प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील लहान-मोठे जवळपास १२ हजार आइस्क्रीम उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे सुमारे १५ हजार कोटींचा आर्थिक फटका या उद्योगाला बसला आहे. यात राज्यातील १५०० कोटी, तर त्यात औरंगाबादेतील ७० कोटींचा समावेश आहे.

देशात गुजरातमध्ये आइस्क्रीमची सर्वाधिक विक्री होते. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र, नवी दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर, राजस्थान चौथ्या तर पाचव्या क्रमांकावर कर्नाटकचा नंबर लागतो. आइस्क्रीमची विक्री वर्षभर होत असते. पण ‘मार्च ते मे’ ही तीन महिने हंगाम असतो. याच हंगामात लॉकडाऊन होण्याचे हे दुसरे वर्ष आहे.

आइस्क्रीमचा समावेश फूड, डेअरी इंडस्ट्रीमध्ये करावादेशाच्या एकूण जीडीपीत ५ टक्के हिस्सा डेअरी उद्योगाचा आहे. आइस्क्रीम उद्योगाला लागणारा कच्चा माल जसे दूध, दूध पावडर, क्रीम, बटर, खवा हे डेअरी उद्योगापासून मिळतात. तरीपण जीएसटीमध्ये डेअरी उद्योगाचा समावेश ५ टक्के, तर आइस्क्रीम उद्योगाला १८ टक्केच्या कर वर्गवारीत करण्यात आला आहे. आइस्क्रीम उद्योगाला फूड इंडस्ट्री किंवा डेअरी इंडस्ट्रीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.- अनिल पाटोदी अध्यक्ष, आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन

आइस्क्रीम इंडस्ट्रीच्या मागण्यालघु, मध्यम व मोठ्या आइस्क्रीम उद्योगासाठी कराची रचना वेगवेगळी असावी.या उद्योगाला कम्पोझिशन स्कीममध्ये घेण्यात यावे.उलाढाल ३० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. या उद्योगाला उभारी देण्यासाठी शासनाने लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे.शून्य टक्के व्याज दराने कर्ज द्यावे किंवा अनुदान द्यावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत