शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटींचा राज्यमार्ग अर्धवट

By admin | Updated: May 7, 2014 00:21 IST

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ ते लातूर या राज्यमार्गाचे मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.

 शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ ते लातूर या राज्यमार्गाचे मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनधारक नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पंधरा कोटीच्या खर्चाचा अर्धवट राज्यमार्ग पूर्ण कधी होणार? असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे. शिरूर अनंतपाळ-लातूर या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक २५ या रस्त्यास वर्षभरापूर्वी राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा मार्ग असताना या रस्त्यासाठी जवळपास १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शिवाय राज्यमार्ग झाल्यानंतरही दुरुस्तीसाठी निधी खर्च करण्यात आला आहे. तरीही हा रस्ता अद्यापही अर्धवट राहिला असून, मुशिराबाद येथे एकेरी सिमेंट रस्ता आहे. तर बोरी गावाजवळ दोन ठिकाणी हा रस्ता वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. मागील पावसाळ्यात तर बोरीच्या पुढे राज्यमार्गावर तळे साचले होते. तेथून नावेत बसून पुढे जाण्याची वेळ लोकांवर आली होती. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वार्तांकन केले होते. त्याची दखल घेऊन बांधकाम विभागाने मुख्य रस्त्यावरील पाण्याचे तळे हटविले होते. परंतु पुन्हा या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, रस्त्यात असंख्य खड्डे पडल्याने वाहनधारकांना या मार्गावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय लोकांचा वेळ आणि इंधनावरील आगाऊ खर्च विनाकारण होत असल्याने बांधकाम खाते याकडे कधी लक्ष देणार? असा प्रश्न प्रवाशांतून केला जात आहे. वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागते. यात अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. चारचाकी वाहनांचेही मोठे अपघात होत आहेत. (वार्ताहर)