परळी : येथील औष्णिक केंद्रात वीजनिर्मिती वाढली आहे. वीजनिर्मितीत आता २१० मेगावॅटने भर पडली आहे. एकूण वीजनिर्मिती आता ६२६ मेगावॅटपर्यंत गेली आहे. त्यामुळे केेंद्राला गतवैभव प्राप्त होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२६ मेगावॅट वीजनिर्मिती सुरु होती. सध्या पाचपैकी चार संच सुरु आहेत. संच क्र. ३ बंद आहे. संच क्र. ४ मधून १४४ मेगावॅट, ५ मधून १३१, ६ मधून १७५, ७ मधून १७५ वीजेचे उत्पादन झाले. मागील काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. त्यामुळे संच क्र. ४ बंद होता.माजलगाव धरणातील पाणी खडका धरणात सोडल्याने ९ जानेवारी २०१५ पासून संच क्र. ४ सुरु कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे एकूण वीजउत्पादन ६२६ मेगावॅट इतके झाले आहे. परळी केंद्रातील पाच पैकी चार संच सुरु झाल्याने वीजनिर्मितीत वाढ झाली आहे. उर्वरित एक संचही लवकरच सुरु होईल. केंद्राला महाऔष्णिककडे नेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे उपमुख्यअभियंता पंढरी काकडे यांनी सांगितले. पाणीटंचाईची समस्या होती परंतु माजलगाव धरणातील पाणी खडका धरणात सोडल्यामुळे प्रश्न निकाली निघाला आहे, असेही त्यांनी सांगितले़ (वार्ताहर)४परळी औष्णिक विद्युत केंद्राने वीजउत्पादनात राज्यात अव्वलस्थानी भरारी घेतली आहे. नाशिक, कोराडी, पारस या पहिल्या कं्रमाकांच्या केंद्रांना मागे टाकून परळी केंद्र पुढे गेले आहे. संच क्र. ३ सुरु झाला तर वीजउत्पादनात आणखी भर पडणार आहे.
१४४ मेगावॅट वीजनिर्मिती वाढली
By admin | Updated: January 11, 2015 00:56 IST