शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

आपसातील तडजोडीमुळे सुखाने नांदताहेत शहरातील १२,३२७ कुटुंबे

By admin | Updated: February 19, 2016 00:02 IST

प्रभुदास पाटोळे, औरंगाबाद औरंगाबादेतील कौटुंबिक न्यायालयाने गेल्या ७ वर्षांत १२,३२७ प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणली. त्यामुळे तुटण्याच्या मार्गावर असलेली शहरातील १२,३२७ कुटुंबे आज सुखाने नांदत आहेत.

प्रभुदास पाटोळे, औरंगाबादऔरंगाबादेतील कौटुंबिक न्यायालयाने गेल्या ७ वर्षांत १२,३२७ प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणली. त्यामुळे तुटण्याच्या मार्गावर असलेली शहरातील १२,३२७ कुटुंबे आज सुखाने नांदत आहेत. गेल्या सात वर्षांतील कौटुंबिक न्यायालयाची ही कामगिरी लक्षणीय आहे. या न्यायालयाच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या २३ वर्षांत शहरातील किती मोठ्या प्रमाणात दुभंगलेल्या कुटुंबांची पुनर्स्थापना करण्याची महत्त्वाची कामगिरी कौटुंबिक न्यायालयाने पार पाडली, याचा अंदाज येऊ शकतो. यासंदर्भात राज्य विवाह समुपदेशक संघटनेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सहसचिव कुंदन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील कौटुंबिक न्यायालयात २००९ साली २०१३ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. तर २०१० मध्ये १५३३ प्रकरणांमध्ये, २०११ मध्ये १६६७ प्रकरणांमध्ये, २०१२ मध्ये १८८८ प्रकरणांमध्ये, २०१३ मध्ये १९०२ प्रकरणांमध्ये, २०१४ मध्ये १८२० प्रकरणांमध्ये आणि २०१५ मध्ये (३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ) १५०४ प्रकरणांमध्ये अशा प्रकारे गेल्या ७ वर्षांमध्ये एकूण १२,३२७ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. २०१६ च्या सुरुवातील (जानेवारी २०१६ ला) औरंगाबादच्या कौटुंबिक न्यायालयात केवळ १८०७ प्रकरणे प्रलंबित होती. गेल्या दोन महिन्यांमध्ये काही प्रकरणे नव्याने दाखल झाली असू,न काही निकाली निघाली आहेत, तर काही न्यायप्रविष्ट आहेत, असे त्यांनी सांगितले.राज्यातील कौटुंबिक न्यायालये१४ सप्टेंबर १९८४ साली ‘कौटुंबिक न्यायालय कायदा’ पारित झाला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या कायद्यांतर्गतचे नियम ‘महाराष्ट्र कौटुंबिक न्यायालय नियम १९८७’ तयार केले. तसेच विधि व न्याय खात्याने १९८८ साली महाराष्ट्र शासनाचे याबाबतचे नियम बनविले. २६ जानेवारी १९८९ पासून महाराष्ट्रात कौटुंबिक न्यायालय कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्यांतर्गत कार्यरत असणारे महाराष्ट्रातील पहिले कौटुंबिक न्यायालय पुणे येथे स्थापन व कार्यरत झाले. त्यानंतर ७ आॅक्टोबर १९८९ रोजी मुंबईला दुसरे, २० फेब्रुवारी १९९३ रोजी औरंगाबादला तिसरे आणि २२ फेब्रुवारी १९९६ रोजी नागपूरला राज्यातील चौथे कौटुंबिक न्यायालय कार्यरत झाले.२००९ नंतर अमरावती, अकोला, नाशिक, ठाणे, नांदेड, सोलापूर आणि कोल्हापूर, अशी ७ कौटुंबिक न्यायालयांची स्थापना करण्यात आली. सध्या महाराष्ट्रात एकूण ११ कौटुंबिक न्यायालये कार्यरत आहेत.