शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आपसातील तडजोडीमुळे सुखाने नांदताहेत शहरातील १२,३२७ कुटुंबे

By admin | Updated: February 19, 2016 00:02 IST

प्रभुदास पाटोळे, औरंगाबाद औरंगाबादेतील कौटुंबिक न्यायालयाने गेल्या ७ वर्षांत १२,३२७ प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणली. त्यामुळे तुटण्याच्या मार्गावर असलेली शहरातील १२,३२७ कुटुंबे आज सुखाने नांदत आहेत.

प्रभुदास पाटोळे, औरंगाबादऔरंगाबादेतील कौटुंबिक न्यायालयाने गेल्या ७ वर्षांत १२,३२७ प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणली. त्यामुळे तुटण्याच्या मार्गावर असलेली शहरातील १२,३२७ कुटुंबे आज सुखाने नांदत आहेत. गेल्या सात वर्षांतील कौटुंबिक न्यायालयाची ही कामगिरी लक्षणीय आहे. या न्यायालयाच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या २३ वर्षांत शहरातील किती मोठ्या प्रमाणात दुभंगलेल्या कुटुंबांची पुनर्स्थापना करण्याची महत्त्वाची कामगिरी कौटुंबिक न्यायालयाने पार पाडली, याचा अंदाज येऊ शकतो. यासंदर्भात राज्य विवाह समुपदेशक संघटनेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सहसचिव कुंदन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील कौटुंबिक न्यायालयात २००९ साली २०१३ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. तर २०१० मध्ये १५३३ प्रकरणांमध्ये, २०११ मध्ये १६६७ प्रकरणांमध्ये, २०१२ मध्ये १८८८ प्रकरणांमध्ये, २०१३ मध्ये १९०२ प्रकरणांमध्ये, २०१४ मध्ये १८२० प्रकरणांमध्ये आणि २०१५ मध्ये (३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ) १५०४ प्रकरणांमध्ये अशा प्रकारे गेल्या ७ वर्षांमध्ये एकूण १२,३२७ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. २०१६ च्या सुरुवातील (जानेवारी २०१६ ला) औरंगाबादच्या कौटुंबिक न्यायालयात केवळ १८०७ प्रकरणे प्रलंबित होती. गेल्या दोन महिन्यांमध्ये काही प्रकरणे नव्याने दाखल झाली असू,न काही निकाली निघाली आहेत, तर काही न्यायप्रविष्ट आहेत, असे त्यांनी सांगितले.राज्यातील कौटुंबिक न्यायालये१४ सप्टेंबर १९८४ साली ‘कौटुंबिक न्यायालय कायदा’ पारित झाला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या कायद्यांतर्गतचे नियम ‘महाराष्ट्र कौटुंबिक न्यायालय नियम १९८७’ तयार केले. तसेच विधि व न्याय खात्याने १९८८ साली महाराष्ट्र शासनाचे याबाबतचे नियम बनविले. २६ जानेवारी १९८९ पासून महाराष्ट्रात कौटुंबिक न्यायालय कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्यांतर्गत कार्यरत असणारे महाराष्ट्रातील पहिले कौटुंबिक न्यायालय पुणे येथे स्थापन व कार्यरत झाले. त्यानंतर ७ आॅक्टोबर १९८९ रोजी मुंबईला दुसरे, २० फेब्रुवारी १९९३ रोजी औरंगाबादला तिसरे आणि २२ फेब्रुवारी १९९६ रोजी नागपूरला राज्यातील चौथे कौटुंबिक न्यायालय कार्यरत झाले.२००९ नंतर अमरावती, अकोला, नाशिक, ठाणे, नांदेड, सोलापूर आणि कोल्हापूर, अशी ७ कौटुंबिक न्यायालयांची स्थापना करण्यात आली. सध्या महाराष्ट्रात एकूण ११ कौटुंबिक न्यायालये कार्यरत आहेत.