शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील बारा हजार नागरिकांनी करून घेतली चारित्र्य पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 17:38 IST

आॅनलाईन अर्ज केल्यास नागरिकांना अवघ्या चार ते पाच दिवसांत त्यांच्या चारित्र्य प्रमाणपत्राचा अहवाल प्राप्त होतो. 

ठळक मुद्देकेवळ शंभर रुपये शुल्कआॅनलाईन अर्जाची सुविधा वर्षभराचा कालावधी

- बापू सोळुंके

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणाऱ्या १० हजार ३७ आणि ग्रामीण भागातील दोन हजार नागरिकांनी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करून घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची चारित्र्य पडताळणी करून घेण्यासाठी केवळ शंभर रुपये शासनाचे शुल्क असून, आॅनलाईन अर्ज केल्यास नागरिकांना अवघ्या चार ते पाच दिवसांत त्यांच्या चारित्र्य प्रमाणपत्राचा अहवाल प्राप्त होतो. 

पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात विविध बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. अशा कंपन्या कामगार अथवा अन्य कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अथवा नाही, याबाबत खात्री करून घेतात. त्याकरिता कर्मचाऱ्यांची पोलीस आयुक्त कार्यालयाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल मागवून घेतात. शासकीय सेवेत दाखल होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही गोपनीय पद्धतीने चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस विभागाकडून मागविला जातो. शिवाय रिक्षाच्या परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांनाही चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.

यावर्षी १ जानेवारी ते २५ डिसेंबर या कालावधीत शहरातील तब्बल १० हजार ३७ नागरिकांनी पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेकडून चारित्र्य पडताळणी करून घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली. शिवाय पासपोर्ट (पारपत्र) तयार करण्यासाठी आणि एस.टी.तील वाहक पदासाठी लागणारा बॅच काढण्यासाठीही चारित्र्य पडताळणी अहवालाची आवश्यकता असते. यामुळे असा पडताळणी अहवाल मागविणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.

आॅनलाईन अर्ज उपलब्धचारित्र्य पडताळणी करण्यासाठी नागरिकांना पोलीस आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज सादर करता येतो. चारित्र्य पडताळणीसाठी शंभर रुपये शुल्क असून हे चलन स्वरूपात आॅनलाईन पद्धतीने अथवा आॅफलाईन स्वरूपातही जमा करता येते. शिवाय जेव्हा एखाद्या उमेदवाराची निवड शासकीय नोकरीसाठी होते. तेव्हा त्या उमेदवाराची चारित्र्य पडताळणी संबंधित विभागाकडून परस्पर केली जाते. तेव्हा त्यासाठी कोणतेही शुल्क उमेदवाराला भरावे लागत नाही.

ग्रामीणमध्ये २ हजार नागरिकांनी केली चारित्र्य पडताळणीग्रामीण भागातील सुमारे दोन हजार नागरिकांनी स्वत:ची चारित्र्य पडताळणी करून घेतल्याचे समोर आले. ग्रामीण पोलिसांकडून आॅनलाईनची सुविधा उपलब्ध नाही, यामुळे नागरिकांना चारित्र्य पडताळणीसाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा लागतो.

चारित्र्य पडताळणी अहवाल कशासाठी- पासपोर्ट (पारपत्र) काढताना- सरकारी अथवा खाजगी नोकरीसाठी- रिक्षाचे परमिट काढण्यासाठी- स्वत:वरील दाखल गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसpassportपासपोर्ट