शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचे १२ लाख हडपले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 02:38 IST

वारंवार दिल्या सूचना; पाच महाविद्यालये पैशाचा हिशोब देईनात

- राम शिनगारे औरंगाबाद : राज्य शासनाने २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात दुष्काळग्रस्त भागातील ईबीसीधारक विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले होते. ज्या महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वसूल केले, अशा १०८ महाविद्यालयांना विद्यापीठ प्रशासनाने १ कोटी ६५ लाख ३१ हजार ४८५ रुपये एवढा निधी विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यासाठी दिला होता. यातील पाच महाविद्यालयांनी पाच वर्षे झाली तरी १२ लाख ९ हजार ९५० रुपयांचा निधी विद्यार्थ्यांमध्ये वितरित केला नसल्याची धक्कादायक बाब व्यवस्थापन परिषद सदमस्यांच्या चौकशी समितीच्या अहवालातून समोर आली आहे.राज्य शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी विद्यापीठाला ४ कोटी ५४ लाख ५० हजार ४६० रुपये दिले होते. यातील १०८ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल केले होते. हे शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना निधी उपलब्ध करून दिला. मात्र, महाविद्यालयांनी हा निधी विद्यार्थ्यांमध्ये वाटप केला नाही .पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला तरी पाच महाविद्यालयांनी हिशोब सादर केला नाही.या महाविद्यालयांचा आहे समावेशदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काच्या पैशाचा हिशोब न देणाऱ्यांमध्ये औरंगाबादच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाने ८ हजार ६५० रुपये, पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयाने २ लाख ४४ हजार ५ रुपये, आष्टी येथील भगवान महाविद्यालय २ लाख ८२ हजार ५८० रुपये, तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालयाने ८१ हजार ३० आणि नळदुर्ग कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाने २ लाख १९ हजार ९५० रुपये, अशा एकूण १२ लाख ९ हजार ७१५ रुपयांचा समावेश आहे.