शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचे १२ लाख हडपले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 02:38 IST

वारंवार दिल्या सूचना; पाच महाविद्यालये पैशाचा हिशोब देईनात

- राम शिनगारे औरंगाबाद : राज्य शासनाने २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात दुष्काळग्रस्त भागातील ईबीसीधारक विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले होते. ज्या महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वसूल केले, अशा १०८ महाविद्यालयांना विद्यापीठ प्रशासनाने १ कोटी ६५ लाख ३१ हजार ४८५ रुपये एवढा निधी विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यासाठी दिला होता. यातील पाच महाविद्यालयांनी पाच वर्षे झाली तरी १२ लाख ९ हजार ९५० रुपयांचा निधी विद्यार्थ्यांमध्ये वितरित केला नसल्याची धक्कादायक बाब व्यवस्थापन परिषद सदमस्यांच्या चौकशी समितीच्या अहवालातून समोर आली आहे.राज्य शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी विद्यापीठाला ४ कोटी ५४ लाख ५० हजार ४६० रुपये दिले होते. यातील १०८ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल केले होते. हे शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना निधी उपलब्ध करून दिला. मात्र, महाविद्यालयांनी हा निधी विद्यार्थ्यांमध्ये वाटप केला नाही .पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला तरी पाच महाविद्यालयांनी हिशोब सादर केला नाही.या महाविद्यालयांचा आहे समावेशदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काच्या पैशाचा हिशोब न देणाऱ्यांमध्ये औरंगाबादच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाने ८ हजार ६५० रुपये, पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयाने २ लाख ४४ हजार ५ रुपये, आष्टी येथील भगवान महाविद्यालय २ लाख ८२ हजार ५८० रुपये, तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालयाने ८१ हजार ३० आणि नळदुर्ग कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाने २ लाख १९ हजार ९५० रुपये, अशा एकूण १२ लाख ९ हजार ७१५ रुपयांचा समावेश आहे.