शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Maharashtra Bandh : वाळूजमध्ये उद्योगांचे ११६ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 05:36 IST

वाळूज औद्योगिक वसाहतीचे ९ आॅगस्ट रोजी बंददरम्यान ११६ कोटींचे थेट नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देबंदमुळे शासनाचा १६ कोटींचा कर बुडाला १०० कोटी रुपयांच्या उद्योग प्रक्रियेला ब्रेक लागला

- विकास राऊत औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीचे ९ आॅगस्ट रोजी बंददरम्यान ११६ कोटींचे थेट नुकसान झाले आहे. यामध्ये १६ कोटी रुपयांचा शासनाचा करही बुडाला आहे. ४ हजार ५०० लहान-मोठे उद्योग वाळूज एमआयडीसीमध्ये आहेत. सकाळच्या शिफ्टमध्ये काही उद्योग सुरू झाले होते; परंतु आंदोलकांनी ते बंद पाडले. ९ वाजेपासून १०० टक्के उद्योग बंद झाले होते. त्यामुळे हे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

उद्योगांची एक उत्पादन प्रक्रिया असते. त्या पूर्ण साखळी प्रक्रियेवर बंदमुळे परिणाम झाला. बंदमुळे उद्योगांच्या उलाढालीवर परिणाम होणे हे औरंगाबादसाठी घातक आहे. उद्योग वर्तुळात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. उद्योगांना टार्गेट करून दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले. 

पैठण एमआयडीसीमध्ये ‘युनिव्हर्सल लगेज’ या कंपनीमध्ये एक घटना घडली होती. त्या एका घटनेमुळे ती औद्योगिक वसाहतच पूर्णत: संपली. ९ तारखेच्या घटनेची माहिती उद्योग वर्तुळातील मल्टिनॅशनल कंपन्यांच्या मुख्यालयांपर्यंत गेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही घटना नोंदविली गेली. याचा परिणाम डीएमआयसीत येणाऱ्या गुंंतवणुकीवरदेखील होणे शक्य आहे. बंद, तोडफोड, नुकसानीच्या घटनांमुळे औरंगाबादचा विकास होण्यावर परिणाम होईल. कर्मचाऱ्यांच्या गाड्या कंपनीच्या आत जाऊ न देण्यापर्यंत आंदोलन ठीक होते; परंतु सगळ्या औद्योगिक वसाहतीलाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न झालेला दिसत असल्याचे उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले. 

वाळूजचे नुकसान झाल्यास औरंगाबाद ५० टक्क्यांवर येईल वाळूज औद्योगिक वसाहतीचे नुकसान झाले, तर औरंगाबादचे उत्पन्न ५० टक्क्यांवर येईल. १२ लाखांच्या शहराची लोकसंख्या गृहीत धरली, तर ६ लाख लोकसंख्या उद्योगांवर अवलंबून आहे.उलाढालीवर बंदचा मोठा परिणाम होतो. औरंगाबादच्या उद्योग वर्तुळाची ३० हजार कोटींच्या मूल्यवर्धित कराच्या तुलनेत उलाढाल आहे. १० टक्क्यांच्या करतुलनेत ३ हजार कोटी रुपयांचा आकडा येतो. ३०० दिवस उत्पादनाचे दिवस धरून ३० हजार भागाकारच्या तुलनेने उत्पादन प्रक्रिया गृहीत धरली, तर १०० कोटींचे थेट नुकसान झाल्याचे दिसत असल्याचे मत उद्योजक कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

महसूल विभाग आणि एमआयडीसीकडून पंचनामे सुरू वाळूज औद्योगिक वसाहतीत ९ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र बंददरम्यान आंदोलकांनी केलेल्या तोडफोडीत उद्योगांचे किती नुकसान झाले, याचा आकडा आवाक्याबाहेर असून, महसूल प्रशासन आणि एमआयडीसीने शुक्रवारी नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.वाळूज एमआयडीसी गंगापूर तहसील आणि औरंगाबाद तहसील हद्दीमध्ये येते. उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी सांगितले की, गंगापूर तालुक्यात एमआयडीसीचा काही भाग आहे. त्या भागात असलेल्या उद्योगांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. 

बहुतांश उद्योग हे औरंगाबाद तहसील हद्दीमध्ये येतात. तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी सांगितले, पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. विमा कंपन्यांचे प्रतिनिधीदेखील पंचनामे करीत आहेत. किती नुकसान झाले याची माहिती लवकरच समोर येईल. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांच्यासह अधिकाऱ्यांनी तोडफोड झालेल्या कंपनीची शुक्रवारी दिवसभर पाहणी केली. पाहणी करून त्याचा अहवाल एमआयडीसी मुख्यालयात पाठविण्यात आला आहे. एमआयडीसीच्या अग्निशमन केंद्राचा सुमारे ४५ लाख रुपयांचा फायरबंब आंदोलकांनी लावलेल्या आगीत जळून खाक झाल्याचे वायाळ यांनी सांगितले.

गुरुवारच्या आंदोलनात रस्त्यावर झालेल्या दगडफेक, जाळपोळीमुळे साचलेला कचरा, रस्त्यांवर आडवे टाकलेले विजेचे खांब एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काढले. आंदोलकांनी जे रस्ते बंद केले होते, ते सुरू करण्यात आल्याचे वायाळ यांनी सांगितले. नुकसानीबाबत कंपन्यांनी पोलिसांत तक्रार देण्यास सुरुवात केली आहे. सर्व कंपन्यांच्या तक्रारीनंतरच एकूण किती नुकसान झाले याचा आकडा समोर येऊ शकेल. लहान-मोठ्या मिळून ७० कंपन्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद