शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी ११४ कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 13:43 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरूस्तीपेक्षा खड्डे बुजविण्याला प्राधान्य दिले असून यासाठी प्रादेशिक विभागाने ११४ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. एवढा निधी देणे जमत नसल्यास किमान तातडीच्या दुरूस्तीसाठी २३ कोटी रूपये तरी द्या, अशी विनंतीही शासनाला करण्यात आली आहे.

औरंगाबाद : आधीच रस्ते खराब आणि त्यात पावसाची भर यामुळे मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांतील  रस्त्यांची अक्षरश:  चाळण  झालेली  आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरूस्तीपेक्षा खड्डे बुजविण्याला प्राधान्य दिले असून यासाठी प्रादेशिक विभागाने ११४ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. एवढा निधी देणे जमत नसल्यास किमान तातडीच्या दुरूस्तीसाठी २३ कोटी रूपये तरी द्या, अशी विनंतीही शासनाला करण्यात आली आहे.

बांधकाम विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांकडून पावसाने बाधित रस्ते व पुलांच्या तात्पुरत्या दुरूस्तीसाठी प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार मुख्य अभियंता डी. डी. उकीर्डे यांच्या कार्यालयाने शासनाकडे ११४ कोटी रूपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्यांची सर्वाधिक वाईट अवस्था झालेली आहे. जिल्ह्यात औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव आणि पैठण तसेच कन्नड, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद असे दोन विभाग असून या दोन्ही विभागांकडून ८ कोटी व ४ कोटी असा१२ कोटी रूपयांचा प्रस्ताव सादर करण्यात  आला आहे. 

आठ ते दहा दिवसांत निधी प्राप्त होईल, अशी अपेक्षा असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले. तर  दुसरीकडे आगोदरच रस्त्यांच्या  कामांची शेकडो बिले शासनाकडे प्रलंबित असल्याने खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी निधी मिळतो की नाही याबद्दल साशंकताच वाटावी अशी परिस्थिती आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाroad safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग