शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

‘ग्रीनफिल्ड’चे ११३१ कोटी शहरासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:07 IST

स्मार्ट सिटी योजनेत चिकलठाणा येथे ११३४ कोटी रुपये खर्च करून एक सुंदर वसाहत निर्माण करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. हा प्रकल्प राबविणे अशक्यप्राय असून, प्रकल्पातील ११३१ कोटी रुपये शहरात विविध विकास कामांसाठी वापरण्यास मुभा द्यावी, असा निर्णय बुधवारी स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत चिकलठाणा येथे ११३४ कोटी रुपये खर्च करून एक सुंदर वसाहत निर्माण करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. हा प्रकल्प राबविणे अशक्यप्राय असून, प्रकल्पातील ११३१ कोटी रुपये शहरात विविध विकास कामांसाठी वापरण्यास मुभा द्यावी, असा निर्णय बुधवारी स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. निधी वळविण्याचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत लवकरच केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.केंद्र शासनाने २०१५ मध्ये स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली. पहिल्या वर्षी ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा योजनेत समावेश झाला नाही. दुसऱ्या वर्षी केंद्राने औरंगाबाद शहराची निवड केली. स्मार्ट सिटीच्या १७३० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्राने मंजुरीही दिली. स्मार्ट सिटी प्रकल्प सुरू करावा म्हणून शासनाने दोन वर्षांपूर्वीच महापालिकेला २३० कोटी रुपयांचा निधीही दिला. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक वारंवार होत नसल्याने हा प्रकल्प रखडला आहे.या प्रकल्पात शहर बस खरेदी करण्यात आली. दिवाळीपर्यंत शहरात बसेस दाखल होतील. सेफ सिटीअंतर्गत विविध विकास कामे करण्यासाठी निविदा काढली आहे. स्मार्ट योजनेत अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रीनफिल्ड होय. बुधवारी स्मार्ट सिटीचे मेन्टॉर तथा गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बैठक घेण्यात आली. बैठकीत ग्रीनफिल्डसाठी राखीव असलेला ११३४ कोटी रुपयांचा निधी शहरात विविध विकास कामे करण्यासाठी वळविण्यात यावा, अशी आग्रही मागणी सर्व संचालक मंडळाने केली. पोरवाल यांनीही क्षणार्धात मंजुरी दिली. केंद्र शासनाने या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिल्यास शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे करणे महापालिकेला शक्य होेईल.बैठकीस उपमहापौर विजय औताडे, विरोधी पक्षनेता जमीर कादरी, सभागृहनेता विकास जैन, गटनेते भाऊसाहेब जगताप, प्रमोद राठोड, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची उपस्थिती होती.ग्रीनफिल्ड प्रकल्प काय होता...ग्रीनफिल्डअंतर्गत चिकलठाणा येथे ५०० एकर जागेचे भूसंपादन करण्यात येईल. येथे सुंदर आयडियल एक छोटेसे शहर तयार करण्यात येईल. या वसाहतीत गुळगुळीत रस्ते, २४ तास पाणी, ड्रेनेज, टेलिफोन केबल अंडरग्राऊंड करण्यात येईल. २४ तास वीजपुरवठा, विजेच्या तारा जमिनीतून जातील.दूषित पाणी वाहण्यासाठी नाल्या झाकलेल्या असतील. घरे भूकंपरोधक असतील. फुटपाथ, लहान रुग्णालय, पार्क आदी कामे या ठिकाणी करण्यात येतील. आयटी कंपन्या, उदयोन्मुख तरुणांना रोजगार, असे दिवास्वप्न या प्रकल्पातून दाखविण्यात आले होते. या प्रकल्पासाठी तब्बल ११३४ कोटी रुपयांची तरतूद केली होती.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका