शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

११० कोटींचा प्रकल्पच अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:24 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ११० कोटी रुपयांचा एलईडी प्रकल्प सुरू केला. प्रकल्पातील करारानुसार कंपनीला दरमहा अडीच कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले होते. महापालिकेने कंपनीकडून तब्बल ४० कोटी रुपयांचे पथदिवे बसवून घेतले. कंपनीला एक रुपयाही देण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकल्पावरही अंधाराचे साम्राज्य पसरत आहे.

ठळक मुद्देएलईडी पथदिवे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ११० कोटी रुपयांचा एलईडी प्रकल्प सुरू केला. प्रकल्पातील करारानुसार कंपनीला दरमहा अडीच कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले होते. महापालिकेने कंपनीकडून तब्बल ४० कोटी रुपयांचे पथदिवे बसवून घेतले. कंपनीला एक रुपयाही देण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकल्पावरही अंधाराचे साम्राज्य पसरत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये म्हणून दोन वर्षांपूर्वी महापालिकेने एका रात्रीतून दिल्ली येथील कंपनीला ११० कोटी रुपयांच्या कामाची वर्कआॅर्डर दिली होती. यानंतर महापालिकेच्या अकाऊंटसोबत कंपनीचा स्क्रू अकाऊंट उघडण्यात आला. दरमहा यामध्ये अडीच कोटी रुपये टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. ८ कोटी रुपये संबंधित अकाऊंटमध्येही टाकले.कंपनीचे काम सुरू झाल्यावर ही रक्कम देण्यात येईल, असे मनपातर्फे सांगण्यात आले. कंपनीनेही मोठ्या उत्साहात शहरातील ४० हजार पथदिव्यांना अत्याधुनिक एलईडी दिवे बसविणे सुरू केले. १२ हजार पथदिवे आतापर्यंत बसविण्यात आले आहेत. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर हे दिवे बसविले.आता अंतर्गत दिवे बसविण्यात यावेत म्हणून नगरसेवक आग्रही आहेत. ४० कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीने आतापर्यंत केली आहे. त्या तुलनेत महापालिकेने करारानुसार एक रुपयाही कंपनीला अदा केला नाही. त्यामुळे यापुढे काम करावे किंवा नाही, याचा विचार कंपनीच्या व्यवस्थापनाने सुरू केला आहे. कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अवमान करणारी याचिका दाखल केल्यास परत मनपा संकटात सापडू शकते. कारण यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या तत्कालीन दोन आयुक्तांना तिहार जेलमध्ये पाठविण्याचा इशारा दिला होता.आरोप करणारे नगरसेवककंपनीने बसविलेले पथदिवे निकृष्ट दर्जाचे आहेत, प्रकाश चांगला पडत नाही, असे अनेक आरोप नगरसेवकांकडून करण्यात येत होते. कंपनीने जेव्हा शहरातील प्रमुख रस्त्यांवर आकर्षक एलईडी दिवे बसविले, त्यानंतर आरोप करणारे नगरसेवकच आमच्या वॉर्डातही एलईडी दिवे बसवा, असा आग्रह धरीत आहेत.मनपा हमी देण्यास तयार नाहीकंपनी आणि महापालिका यांच्यात करार झाला आहे. करारानुसार महापालिका कंपनीला पैसे देण्यास तयार नाही. महापालिकेच्या तिजोरीत पैसेच नाहीत, असे सांगण्यात येत आहे.एकीकडे निधी नाही, दुसरीकडे कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचे काम करून घेण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी प्रकल्पावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका