शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

११० कोटींचा प्रकल्पच अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:24 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ११० कोटी रुपयांचा एलईडी प्रकल्प सुरू केला. प्रकल्पातील करारानुसार कंपनीला दरमहा अडीच कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले होते. महापालिकेने कंपनीकडून तब्बल ४० कोटी रुपयांचे पथदिवे बसवून घेतले. कंपनीला एक रुपयाही देण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकल्पावरही अंधाराचे साम्राज्य पसरत आहे.

ठळक मुद्देएलईडी पथदिवे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ११० कोटी रुपयांचा एलईडी प्रकल्प सुरू केला. प्रकल्पातील करारानुसार कंपनीला दरमहा अडीच कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले होते. महापालिकेने कंपनीकडून तब्बल ४० कोटी रुपयांचे पथदिवे बसवून घेतले. कंपनीला एक रुपयाही देण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकल्पावरही अंधाराचे साम्राज्य पसरत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये म्हणून दोन वर्षांपूर्वी महापालिकेने एका रात्रीतून दिल्ली येथील कंपनीला ११० कोटी रुपयांच्या कामाची वर्कआॅर्डर दिली होती. यानंतर महापालिकेच्या अकाऊंटसोबत कंपनीचा स्क्रू अकाऊंट उघडण्यात आला. दरमहा यामध्ये अडीच कोटी रुपये टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. ८ कोटी रुपये संबंधित अकाऊंटमध्येही टाकले.कंपनीचे काम सुरू झाल्यावर ही रक्कम देण्यात येईल, असे मनपातर्फे सांगण्यात आले. कंपनीनेही मोठ्या उत्साहात शहरातील ४० हजार पथदिव्यांना अत्याधुनिक एलईडी दिवे बसविणे सुरू केले. १२ हजार पथदिवे आतापर्यंत बसविण्यात आले आहेत. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर हे दिवे बसविले.आता अंतर्गत दिवे बसविण्यात यावेत म्हणून नगरसेवक आग्रही आहेत. ४० कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीने आतापर्यंत केली आहे. त्या तुलनेत महापालिकेने करारानुसार एक रुपयाही कंपनीला अदा केला नाही. त्यामुळे यापुढे काम करावे किंवा नाही, याचा विचार कंपनीच्या व्यवस्थापनाने सुरू केला आहे. कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अवमान करणारी याचिका दाखल केल्यास परत मनपा संकटात सापडू शकते. कारण यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या तत्कालीन दोन आयुक्तांना तिहार जेलमध्ये पाठविण्याचा इशारा दिला होता.आरोप करणारे नगरसेवककंपनीने बसविलेले पथदिवे निकृष्ट दर्जाचे आहेत, प्रकाश चांगला पडत नाही, असे अनेक आरोप नगरसेवकांकडून करण्यात येत होते. कंपनीने जेव्हा शहरातील प्रमुख रस्त्यांवर आकर्षक एलईडी दिवे बसविले, त्यानंतर आरोप करणारे नगरसेवकच आमच्या वॉर्डातही एलईडी दिवे बसवा, असा आग्रह धरीत आहेत.मनपा हमी देण्यास तयार नाहीकंपनी आणि महापालिका यांच्यात करार झाला आहे. करारानुसार महापालिका कंपनीला पैसे देण्यास तयार नाही. महापालिकेच्या तिजोरीत पैसेच नाहीत, असे सांगण्यात येत आहे.एकीकडे निधी नाही, दुसरीकडे कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचे काम करून घेण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी प्रकल्पावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका