शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

११९३ शाळा प्रगत !

By admin | Updated: April 18, 2016 00:54 IST

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, हा यामागचा उद्देश.

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, हा यामागचा उद्देश. त्यानुसार जिल्हाभरातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या मिळून सुमारे १ हजार १९३ शाळा प्रगत झाल्या आहेत. सदरील शाळांची माहिती संकेतस्थळावर भरण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.२२ जून २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शाळा प्रगत आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी तब्बल निकष देण्यात आले आहेत. यामध्या प्रामुख्याने पट, वर्षाची सरासरी उपस्थिती, शाळाबाह्य बालके, प्रत्यक्ष प्रवेशित बालके, शाळा परिसर, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणकार, चित्र वाचन, वाक्यांचे वाचन, शब्द तयार करणे, तीन शब्दांपासून वाक्य बनविणे, सोप्या शब्दांपासून गोष्ट तयार करणे, घड्यारातील काटे पाहून अचूक वेळ सांगणे, तीन शब्दांपासून चार ओळींची कविता तयार करणे आदी २५ बाबींचा समावेश आहे. या प्रत्येक बाबीसाठी पाच गुण निर्धारित केले आहेत. या निकषांच्या आधारांवर ८० गुण मिळाल्यास तसेच संकलित दोनच्या चाचणीमध्ये प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने ४० टक्के गुण प्राप्त केल्यास संबंधित शाळेस प्रगत शाळा म्हणून घोषित करण्यात येते. जिल्हाभरात सर्व माध्यम आणि व्यवस्थापनाच्या मिळून सुमारे १ हजार ७४१ एवढ्या शाळा आहेत. आजवर यापैकी तब्बल १ हजार १९३ शाळांनी ‘प्रगत’ झाल्याचा दावा केला आहे. तशी शाळानिहाय माहिती शासनाच्या संकेतस्थळावर टाकली आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.जिल्हाभरात सुमारे १ हजार ७४१ एवढ्या शाळा आहेत. या सर्व शाळांनी उपरोक्त उपक्रमांतर्गत माहिती शासनाच्या संकेतस्थळावर टाकणे अपेक्षित आहे. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने पत्रव्यवहारही करण्यात येत आहे. असे असतानाही जिल्हाभरातील सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापनाच्या मिळून सुमारे साडेपाचशेवर शाळांकडून अद्याप संकेतस्थळावर माहिती टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित शाळा प्रगत होणार कधी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केल्या जावू लागला आहे.जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर नजर टाकल्यानंतर चिंताजनक चित्र समोर येते. काही शाळांनी गुणवत्ता उंचावली असली तरी इतर शाळांच्या बाबतीत अत्यंत विदारक स्थिती आहे. चौथीच्या वर्गातील एकेका विद्यार्थ्याला साधी बेरीज, वजाबाकीही येत नाही. हा अनुभव लोकप्रतिनिधींसह काही अधिकाऱ्यांनीही शाळा भेटीवेळी घेतलेला आहे. असे असतानाच सुमारे अकराशेवर शाळांनी आमच्याकडे एकही विद्यार्थी अप्रगत राहिलेला नाही, असा दावा करून माहितीही संकेतस्थळावर भरली आहे. त्यामुळे ही माहिती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती पडताळून पहाण्याची गरज शिक्षणप्रेमींतून व्यक्त केली जात आहे.