शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

देशभरात ५० खाटांचे १०५ आयुष रुग्णालये उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 23:29 IST

AYUSH Ministry : इंटिग्रेटिव्ह मेडिसिनची आज गरज असून त्यात मोठे काम करण्याची देशात क्षमता

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : देशभरात ५० खाटांचे १०५ आयुष रुग्णालये ( AYUSH Hospitals ) उभारण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे रुग्णालय उभारण्यात येतात. केंद्र सरकारकडून निधी दिला जातो, तर राज्य सरकार उभारणी केली जाते. राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यास औरंगाबादेतही हे रुग्णालय होईल. त्यादृष्टीने चर्चा केली जाईल, असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले.

वैद्य राजेश कोटेचा यांनी बुधवारी डाॅ. हेडगेवार रुग्णालयास भेट दिली. त्या वेळी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. प्रारंभी राजेश कोटेचा यांचा रुग्णालयातर्फे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयुष्य मंत्रालयाचे सल्लागार डाॅ. मनोज नेसरी, डाॅ. सतीश कुलकर्णी, डाॅ. अनंत पंढरे, डाॅ. राजश्री रत्नपारखी, डाॅ. अश्विनीकुमार तुपकरी आदी उपस्थित होते.

कोटेचा म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे. मात्र, तिसरी लाट येणारच नाही, असेही म्हणता येणार नाही. तिसऱ्या लाटेसाठी तयारी करण्यात आली असून, केंद्र सरकार त्यासाठी सज्ज आहे. कोरोना प्रादुर्भावात इतर उपचार पद्धतींबरोबर आयुर्वेदानेही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अनेक अभ्यासातून ते सिद्ध झाले आहे, असे कोटेचा म्हणाले. इंटिग्रेटिव्ह मेडिसिनची आज गरज असून त्यात मोठे काम करण्याची देशात क्षमता असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल