शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात १८९ दिवसात कोरोनाचे १००० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 16:59 IST

1000 deaths of corona virus in Aurangabad district मृत्यूदरात घट; मात्र, १५२ दिवसांपासून दररोज होताहेत मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यात ५ एप्रिल ते १२ मेदरम्यान कोरोनामुळे एकूण १७ जणांचा मृत्यू झाला होता. जून महिन्यात मृत्यूदर ५.४१ टक्क्यांवर गेला. १५ जुलै रोजी मृत्यूदर ३.९१ टक्क्यांवर आला. आता मृत्यूदर २.८० टक्के आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या एकूण मृत रुग्णांची संख्या रविवारी १ हजार झाली. १८९ दिवसांत कोरोनाने १ हजार लोकांना प्राण गमवावे लागले. धक्कादायक म्हणजे १५२ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनामुळे दररोज मृत्यू होत आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास आरोग्य यंत्रणेला आता कुठे यश येत आहे; परंतु एखाद्या आजाराने एवढ्या कमी दिवसांत इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांचे बळी जाणे, हे दुदैर्वी आहे.

जिल्ह्यात १५ मार्च रोजी पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे निदान झाले होते. त्यानंतर ५ एप्रिल रोजी कोरोनामुळे एका बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मराठवाड्यात कोरोनाचा हा पहिला  बळी ठरला होता. ५ एप्रिल ते १२ मेदरम्यान कोरोनामुळे एकूण १७ जणांचा मृत्यू झालेला होता. मात्र, १३ मेपासून कोरोनामुळे प्रत्येक दिवस घातवार ठरत आहे. कारण या दिवसापासून जिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. अवघ्या ७ महिन्यांच्या कालावधीत मृत्यूच्या संख्येने एक हजाराचा आकडा गाठला.

कोरोनाविरुद्ध खाजगी असो अथवा शासकीय रुग्णालये, सर्व जण कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी ७ महिन्यांपासून दिवस-रात्र लढा देत आहेत. या सगळ्यात आता कुठे रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे; परंतु मृत्यू काही केल्या थांबताना दिसत नाही. या परिस्थितीवर नियंत्रण कसे आणायचे आणि मृत्यू का वाढत आहेत, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेलाही पडत आहे.

एका रुग्णाची आत्महत्याघाटीत उपचार सुरू असताना एका कोरोनाबाधित रुग्णाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी घडली. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या मृत रुग्णांच्या माहितीत या रुग्णाचा समावेश केलेला नाही. हा आत्महत्या केलेला रुग्ण धरून  एकूण १ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पहिल्या मृत रुग्णाचा मुलगा म्हणाला...मृत्यूच्या वाढत्या परिस्थितीला जेवढे प्रशासन जबाबदार आहे, तेवढेच नागरिकही जबाबदार आहेत. कारण एकीकडे प्रशासनाने अनलॉक केले आणि दुसरीकडे नागरिकांनी प्रोटोकॉलचे पालन न करता बाहेर पडायला सुरुवात केली. परिणामस्वरूप सद्य:स्थिती आपल्यासमोर आहे. राहिला प्रश्न जबाबदार कोणाला ठरवायचे, तर याच विचारात गुंतून राहिलो तर जबाबदारी घेणारेसुद्धा राहणार नाहीत. परिस्थितीची दाहकता प्रत्येकालाच समजणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दिशेने आपली आणि आप्त जणांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

असा राहिला मृत्यूदरजिल्ह्यात ५ एप्रिल ते १२ मेदरम्यान कोरोनामुळे एकूण १७ जणांचा मृत्यू झाला होता. या तारखेपर्यंत  कोरोनाचा मृत्यूदर २.५२ टक्के होता. मात्र, जून महिन्यात मृत्यूदर ५.४१ टक्क्यांवर गेला. त्यानंतर १५ जुलै रोजी मृत्यूदर ३.९१ टक्क्यांवर आला. आता मृत्यूदर २.८० टक्के आहे. मृत्यूदर कमी होत असला तरी कोरोनामुळे दररोज मृत्यू होतच आहेत.

पूवीर्पेक्षा मृत्यूदर कमीकोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मृत्यूदर अधिक होता; परंतु मृत्यूदर आता खूप कमी झालेला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी विविध औषधी, इंजेक्शन उपलब्ध झालेले आहेत. आगामी कालावधीत मृत्यूदर आणखी कमी होईल.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

रुग्ण गंभीर अवस्थेत येतातकोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ७ महिन्यांपासून प्रत्येकाकडून दिवस-रात्र परिश्रम घेतले जात आहे. रुग्ण गंभीर अवस्थेत दाखल होतात. ग्रामीण भागातूनही रुग्ण शहरात येतात, याचाही विचार करण्याची गरज आहे. रुग्णांनी वेळीच उपचार घेण्याची गरज आहे.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

भीतीपोटी दुर्लक्षरुग्णांसाठी सध्या आॅक्सिजन, व्हेंटिलेटर बेड पुरेसे उपलब्ध आहेत. रुग्णांनी कमी त्रास असताना तात्काळ उपचार घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. अनेक जण भीतीपोटी वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यातून आजाराचे स्वरूप गंभीर होते.-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू