शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

भूमिहीन शेतमजुरांना शेतीसाठी १०० टक्के अनुदान; किती जणांना मिळाली शेती?

By विजय सरवदे | Updated: January 18, 2024 18:45 IST

जमिनीचे भाव गगनाला भिडल्यामुळे पाच वर्षांत शंभराच्या आतच लाभार्थी

छत्रपती संभाजीनगर : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन कुटुंबांना शेतजमीन उपलब्ध करून देण्यात येते. परंतु योजनेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या रेडिरेकनर दरानुसारच जमीन खरेदी तरतूद असल्यामुळे बहुतांश शेतकरी या दरात जमीन विकायला तयार नाहीत. त्यामुळे समाज कल्याण विभागापुढे ही योजना राबविण्याचा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, मागील पाच वर्षांत शंभराच्या आतच लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळू शकला आहे.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. यानुसार भूमिहीन शेतमजुरांना १०० टक्के अनुदानावर शेती घेऊन दिली जाते. दुर्दैव असे की, जमीन विक्री करणाऱ्यांचीच संख्या कमी होत आहे. सध्या कोरडवाहू शेतीचे दर बाजार भावानुसार १० ते १५ लाख रुपये प्रतिएकरपर्यंत पोहोचला आहे. प्रत्यक्षात या योजनेद्वारे ४ लाख दराने जमीन खरेदी करण्याचा निकष आहे. दुसरीकडे बागायती शेतीसाठी ७ लाखांपर्यंत खरेदीसाठी कमाल मर्यादा घालून दिली आहे. परिणामी, एवढ्या कमी किमतीत शेती विकण्यास कोणी तयार होत नसल्याचे चित्र आहे.

काय आहे योजना?अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांचे सामाजिक, आर्थिक जीवनमान उंचवावे, यासाठी ४ एकर कोरडवाहू अथवा २ एकर बागायती जमीन देण्याची या योजनेत तरतूद आहे.

योजनेचे निकष काय?या योजनेचा लाभार्थी हा अनु. जाती, नवबौद्ध घटकातील असावा. तो भूमिहीन शेतमजूर व दारिद्र्यरेषेखालील असावा, विधवा अथवा परितक्त्यांना प्राधान्याने या योजनेचा लाभ द्यावा, खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनीवर अतिक्रमण नसावे, जमीन कसन्यालायक असावी, असे या योजनेचे निकष आहेत.

भूमिहीन लाभार्थीला किती शेती मिळते?या योजनेंतर्गत पात्र लाभार्थीला ४ एकर कोरडवाहू अथवा २ एकर बागायती जमीन मिळते.

अर्ज कोठे करायचा?या योजनेसाठी सहायक समाज कल्याण अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो.

१५ वर्षांपासून योजना राबविण्यात अडचणीया योजनेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या रेडिरेकनर दरानुसार जमीन खरेदी केली जाते. पण जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाचा हा दर परवडत नाही, हीच मोठी अडचण आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग