शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
3
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
4
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी
5
७ वर्षाचे नाते, मग लग्न, सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले; कंटाळून इंजिनिअरने उचलले टोकाचे पाऊल
6
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
7
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावाचे स्टँड काढून टाकण्याचे आदेश
8
अमेरिका, जर्मनी, चीन... सगळेच मागे, जगात सर्वाधिक सोने कोणाकडे? आकडा वाचून धक्का बसेल
9
पालकांनो, मुलांना सांगताय... पण तुम्ही स्वतः काय करता आहात? कुटुंबासाठी मोबाईल असा ठरतोय घातक
10
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
11
एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले
12
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
13
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
14
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
15
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
16
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
17
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
18
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
19
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
20
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'

भूमिहीन शेतमजुरांना शेतीसाठी १०० टक्के अनुदान; किती जणांना मिळाली शेती?

By विजय सरवदे | Updated: January 18, 2024 18:45 IST

जमिनीचे भाव गगनाला भिडल्यामुळे पाच वर्षांत शंभराच्या आतच लाभार्थी

छत्रपती संभाजीनगर : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन कुटुंबांना शेतजमीन उपलब्ध करून देण्यात येते. परंतु योजनेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या रेडिरेकनर दरानुसारच जमीन खरेदी तरतूद असल्यामुळे बहुतांश शेतकरी या दरात जमीन विकायला तयार नाहीत. त्यामुळे समाज कल्याण विभागापुढे ही योजना राबविण्याचा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, मागील पाच वर्षांत शंभराच्या आतच लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळू शकला आहे.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. यानुसार भूमिहीन शेतमजुरांना १०० टक्के अनुदानावर शेती घेऊन दिली जाते. दुर्दैव असे की, जमीन विक्री करणाऱ्यांचीच संख्या कमी होत आहे. सध्या कोरडवाहू शेतीचे दर बाजार भावानुसार १० ते १५ लाख रुपये प्रतिएकरपर्यंत पोहोचला आहे. प्रत्यक्षात या योजनेद्वारे ४ लाख दराने जमीन खरेदी करण्याचा निकष आहे. दुसरीकडे बागायती शेतीसाठी ७ लाखांपर्यंत खरेदीसाठी कमाल मर्यादा घालून दिली आहे. परिणामी, एवढ्या कमी किमतीत शेती विकण्यास कोणी तयार होत नसल्याचे चित्र आहे.

काय आहे योजना?अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांचे सामाजिक, आर्थिक जीवनमान उंचवावे, यासाठी ४ एकर कोरडवाहू अथवा २ एकर बागायती जमीन देण्याची या योजनेत तरतूद आहे.

योजनेचे निकष काय?या योजनेचा लाभार्थी हा अनु. जाती, नवबौद्ध घटकातील असावा. तो भूमिहीन शेतमजूर व दारिद्र्यरेषेखालील असावा, विधवा अथवा परितक्त्यांना प्राधान्याने या योजनेचा लाभ द्यावा, खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनीवर अतिक्रमण नसावे, जमीन कसन्यालायक असावी, असे या योजनेचे निकष आहेत.

भूमिहीन लाभार्थीला किती शेती मिळते?या योजनेंतर्गत पात्र लाभार्थीला ४ एकर कोरडवाहू अथवा २ एकर बागायती जमीन मिळते.

अर्ज कोठे करायचा?या योजनेसाठी सहायक समाज कल्याण अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो.

१५ वर्षांपासून योजना राबविण्यात अडचणीया योजनेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या रेडिरेकनर दरानुसार जमीन खरेदी केली जाते. पण जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाचा हा दर परवडत नाही, हीच मोठी अडचण आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग